शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
3
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
4
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
5
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
6
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
7
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
8
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
9
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
10
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
11
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
12
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
13
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
14
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
15
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
16
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
17
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
18
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
19
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
20
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!

पश्चिम विदर्भातील मजुरांचा लोंढा वर्ध्यात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 13:16 IST

यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा फटका पश्चिम विदर्भात मोठ्या प्रमाणात बसल्याने शेतमजुरांचा रोजगारही हिरावला आहे. त्यामुळे तेथील मजुरांनी पोटाची खळगी भरण्याकरिता आता आपला मोर्चा वर्धा जिल्ह्याकडे वळविला आहे.

ठळक मुद्देरोजगाराच्या शोधात स्थलांतरणशेकडो परिवार कापूस वेचणीच्या कामात व्यस्त

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा फटका पश्चिम विदर्भात मोठ्या प्रमाणात बसल्याने शेतमजुरांचा रोजगारही हिरावला आहे. त्यामुळे तेथील मजुरांनी पोटाची खळगी भरण्याकरिता आता आपला मोर्चा वर्धा जिल्ह्याकडे वळविला आहे. जिल्ह्यातील विविध गावांमध्ये शंभरावर परिवार दाखल झाले असून कापूस वेचणीच्या कामात व्यस्त असल्याने मजुरांचा प्रश्न आता सुटला आहे.खरीप हंगामात पावसाचे उशिरा आगमन झाले. त्यातच परतीच्या पावसानेही दणका दिल्यामुळे कपाशीचे बोंड फुटायला उशीर लागला. आता सर्वत्रच कापूस वेचणीला सुरुवात झाली असल्याने गावांमध्ये मजूर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे गावातील मजुरांचेही दर वाढल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटात आणखीच भर पडली आहे. अशातच हाताला काम नसलेल्या पश्चिम विदर्भातील वाशीम जिल्ह्यासह इतरही भागातील मजूर कुटुंबीय जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यांच्या टोळ्या गावातच मिळेल त्यांच्याकडे आसरा घेऊन राहात असल्याने शेतकऱ्यांना मजुरांचा प्रश्न मिटला असून कापूस वेचणीला जोर आला आहे. आता बाहेर जिल्ह्यातून आलेले मजूर सकाळपासूनच कामाला लागत असून त्यांना १४० रुपये मनकी (दहा किलो) मजुरी दिली जात असल्याने गावातील मजुरांचे दरही आवाक्यात आले आहेत. या मजुरांमुळे शेतकऱ्यांची अडचण बऱ्या प्रमाणात सुटली असून आता हे मजूर उलंगवाडी होईपर्यंत इकडेच वास्तव्यास राहणार आहे.

शेतकरीच करतात राहण्याची व्यवस्थाविदर्भाच पांढर सोनं असलेल्या कापसाने यावर्षी शेतकऱ्यांचे आर्थिक बजेटच बिघडविले आहे. यावर्षी पºहाटी पाच ते सहा फूट उंच वाढली असली तरी बोंडं मात्र वीसच्या आतच दिसून येत आहेत. त्यामुळे एक-दोन वेच्यातच उलंगवाडी होण्याची चिन्हे आहेत.यामुळे उत्पादनातही कमालीची घट झाली असताना मजुरांच्या कमतरतेमुळे वाढीव दर देण्याचा भारही शेतकऱ्यांवर पडला आहे. रोजगाराच्या शोधात जिल्ह्याबाहेरील मजूर दाखल झाल्याने शेतकऱ्यांचा हा भार बऱ्याप्रमाणात कमी झाला आहे.बाहेरगावावरून आलेल्या मजुरांची राहण्याची व्यवस्था शेतकऱ्यांनीच केली आहे. काही मजुरांनी गावात पाल टाकून आसरा घेतला आहे. हे सर्व मजूर सकाळपासून कामाला लागत असल्याने एका दिवसात जास्त कापूस शेतकऱ्यांच्या घरात येत आहे.

टॅग्स :agricultureशेती