शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

अतिक्रमणधारकांवर कारवाईची कुऱ्हाड

By admin | Updated: January 10, 2015 01:54 IST

गावातील मार्गांवर अतिक्रमण करून जागा बळकाविणाऱ्यांना ग्रामपंचायत प्रशासनाने आठ जणांना नोटीस बजावली असल्याने धाबे दणानले आहे.

विजयगोपाल : गावातील मार्गांवर अतिक्रमण करून जागा बळकाविणाऱ्यांना ग्रामपंचायत प्रशासनाने आठ जणांना नोटीस बजावली असल्याने धाबे दणानले आहे. येथील वॉर्ड क्रमांक दोन भागत अतिक्रमणधारकांची संख्या अधिक आहे. वर्दळीच्या मार्गावर अतिक्रमण केल्याने आवागमनास त्रास होत असे. याबाबत नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरून कारवाई करण्यात आली.येथील विठ्ठलनगर परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून येणारा-जाणारा रस्ताच बंद केला आहे. ग्रामस्थांना यामुळे गैरसोय होत असे. या समस्येबाबत नागरिकांनी तहसीलदार व ग्रामपंचायत प्रशासनाला वारंवार निवेदन दिले. या तक्रारीची दखल घेत ग्रामपंचायत प्रशासनाने हा निर्णय घेतला. आवागमनास बंद असलेल्या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार अतिक्रमण धारकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाच्या या कारवाईमुळे नागरिकांना पुर्ववत आवागमन कराता येणार आहे. विठ्ठल वार्डातील रस्त्यावर अतिक्रमण करून रस्ता बंद केला. अतिक्रमणधारकांवर प्रशासनाचा वचक नसल्याने अनेकांनी रस्त्यावर पक्के घर बांधली आहे. हीच री ओढत गावात अन्यत्र अतिक्रमण होत होते. यामुळे भविष्यात गावात रस्ते उरणार की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम (५३) अन्वये गावातील आठ अतिक्रमणधारकांना रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याच्या नोटीस बजाविण्यात आल्या. याची अंमलबजावणी न केल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.(वार्ताहर)