शहरं
Join us  
Trending Stories
1
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
2
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
3
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
4
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
5
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
6
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
7
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
8
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
9
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
10
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
12
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
13
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
14
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
15
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
16
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
17
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
18
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
19
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
20
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा

ज्ञानातूनच सुसभ्य समाजाची निर्मिती होते

By admin | Updated: July 2, 2014 23:25 IST

ज्ञान वितरित केल्याने ज्ञान वाढते व ज्ञानातूनच सुसभ्य समाजाची निर्मिती होते. म्हणून स्वत:चा, समाजाचा आणि देशाचा विकास करण्यासाठी शिक्षित व सुसंस्कारित समाजाची आवश्यकता आहे,

वर्धा : ज्ञान वितरित केल्याने ज्ञान वाढते व ज्ञानातूनच सुसभ्य समाजाची निर्मिती होते. म्हणून स्वत:चा, समाजाचा आणि देशाचा विकास करण्यासाठी शिक्षित व सुसंस्कारित समाजाची आवश्यकता आहे, असे विचार बौद्ध धम्मगुरू भदन्त आर्य नागार्जून सुरई ससाई यांनी व्यक्त केले.डॉ. आंबेडकर कॉलेज आॅफ सोशल वर्क येथे सर्वसोयीयुक्त सुभेदार रामजी आंबेडकर कम्यूनिटी लायब्ररीचे उद्घाटन भदन्त सुरई ससाई यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते़ कार्यक्रमाला भूजल सर्वेक्षण विभागाचे वैज्ञानिक त्रिलोक हजारे, प्रा. बोधी, डॉ. चेतना सवाई, भन्ते धम्मसागर, राही गायकवाड, प्राचार्य डॉ. मिलिंद सवाई उपस्थित होते. बहुजन समाजातील विद्यार्थी व नागरिकांनी या लायब्ररीचा लाभ घेऊन आपले ज्ञान वाढविण्याचे आवाहन डॉ. चेतना सवाई यांनी केले़ भदन्त धम्मसागर यांनी डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत शिक्षित समाजाची रचना निर्माण करण्यासाठी अशा लायब्ररीची गरज असल्याचे सांगितले. वरिष्ठ भूवैज्ञानिक त्रिलोक हजारे यांनी युवकांना स्पर्धेच्या जगात आपले स्थान निर्माण करण्यासाठी भरपूर वाचन करावे, असा सल्ला दिला. डॉ. आंबेडकर कॉलेज आॅफ सोशलवर्कमध्ये अत्याधुनिक व्यवस्थेसह क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व इथोथीथास अय्यंकाली संशोधन केंद्राचेही उद्घाटन भन्ते सुरई ससाई यांनी केले. याप्रसंगी टाटा इन्स्टीट्यूट आॅफ सोशल सायन्सेस मुंबईचे प्रा. बोधी, निलेश थूल, अतुल आनंद, मुकेश शेंडे, सुकन्या शेट्टी, राही गायकवाड, मिशिगन युनिवर्सीटी अमेरिका येथील ताहा अब्दुल रोफ, केरळचे जी.आय. सॅम्युअल, चेन्नईचे चंद्रशेखर, जोशुआ इसाक, हिंदी विद्यापीठाचे अभय तायडे, अवधेश कुमार व लायब्ररीचे संचालक जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दिल्लीचे अनुपकुमार यांनी स्पर्धा परीक्षा व संशोधनाबाबत मार्गदर्शन केले.या केंद्रातून बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचे निशुल्क मार्गदर्शन केले जात आहे. सोबतच संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग व विदेशात शिकण्याची तयारी आणि इतर स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी टाटा समाजविज्ञान संस्था मुंबई, दिल्ली विद्यापीठ, हैद्राबाद विद्यापीठ व चेन्नईचे विद्वान शिक्षक मार्गदर्शन करतील. या लायब्ररीमध्ये भारतात प्रकाशित होणारे सर्व जर्नल्स, वर्तमानपत्रे व भरपूर साहित्य आणि पुस्तके उपलब्ध करून देण्यात आले आहे.या लायब्ररीमध्ये सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत सर्व नागरिकांना नि:शुल्क प्रवेश असून याचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजक अनुपकुमार दिल्ली व डॉ. चेतना सवाई यांनी केले. यावेही प्राध्यापक, कर्मचारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)