शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

खरीपाकरिता हवे ७0 हजार मेट्रीक टन खत

By admin | Updated: May 15, 2014 23:50 IST

मान्सून जवळ येत आहे. यात खरीपाच्या पेरणीकरिता शेतकर्‍यांनी मशागतीच्या कामांना वेग दिला आहे. शेतकर्‍यांच्या कामांची गती वाढत असताना कृषी विभागाच्यावतीनेही

 वर्धा : मान्सून जवळ येत आहे. यात खरीपाच्या पेरणीकरिता शेतकर्‍यांनी मशागतीच्या कामांना वेग दिला आहे. शेतकर्‍यांच्या कामांची गती वाढत असताना कृषी विभागाच्यावतीनेही आढावा तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यात यंदा होत असलेल्या पेर्‍याच्या तुलनेत खरीप हंगामाकरिता ७0 हजार मेट्रीक टन खतांची गरज आहे.

शेतीच्या मशागतीच्या कामांना शेतकर्‍यांनी गती दिली आहे. यात ज्यांची आर्थिक सोय आहे त्यांनी बियाण्यांची व खतांची खरेदी सुरू केली आहे तर ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांनी पैशाची जुळवाजुळव करण्याचे काम सुरू केले आहे. काही शेतकरी पेरणी करतेवेळीच खताची मात्रा देतात. तर काही पेरणी झाल्यानंतर खताचा वापर करतात. यामुळे हंगामाच्या सुरुवातीपासूनच खतांची मागणी वाढते. यामुळे खतांचा काळाबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शेतकर्‍यांना आवश्यक असलेल्या खतांसोबत लिकींग झाल्याने शेतकर्‍यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला असल्याचे समोर आले आहे. या हंगामात जिल्ह्यात चार लाख हेक्टरवर खरीपाचा पेरा होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाच्यावतीने वर्तविण्यात आला आहे. याकरिता एकूण ७0 हजार ४00 मे. टन खतांची गरज भासणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आवश्यक असलेल्या खताची मागणी जिल्हा कृषी विभागाच्यावतीने करण्यात आली आहे.

आजच्या घडीला जिल्ह्यात ३२ हजार मेट्रीक टन खत उपलब्ध असल्याची माहिती कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. यात शेतकर्‍यांना पेरणीनंतर अत्यावश्यक असलेला युरीया २0 हजार मेट्रीक टनाच्या आसपास आहे. यामुळे शेतकर्‍यांना चिंता करण्याची गरज नसल्याचे कृषी विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)