शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार अभियानाचे ‘पुढे पाठ, मागे सपाट’

By admin | Updated: April 23, 2016 02:07 IST

भूगर्भातील जलपातळी वाढावी आणि शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी या उदात्त हेतुने राज्य शासनाने....

चार कोटींची कामे : तांत्रिक अधिकारी नसल्याने खोळंबा आष्टी (शहीद) : भूगर्भातील जलपातळी वाढावी आणि शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी या उदात्त हेतुने राज्य शासनाने सन २०१५-१६ पासून जलयुक्त शिवार ही महत्त्वाकांक्षी योजना कार्यान्वित केली. यासंदर्भात कृषी विभागाकडे कुठल्याही प्रकारची तांत्रिक कुशल यंत्रणा नसल्यामुळे या योजनेचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. जिल्ह्यात वर्षभरात कोट्यवधी रुपयांची कामे झाली. त्याचे फलित २५ टक्के सुध्दा झाले नसल्याचे चित्र आहे. आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यात वर्षभरामध्ये ३ कोटी १२ लक्ष रुपयांचे नाला खोलीकरण व बंधारा बांधकाम झाले. नाला खोलीकरण अंदाजपत्रकात जास्त व प्रत्यक्षात कमी असल्याने नियोजन कोलमडले. पावसाळा झाल्यावर अनेक नाल्यातील पाणी वाहून गेले. त्यामुळे सिंचनासाठी त्याचा उपयोग झाला नाही. नाला खोलीकरण व बंधारे बांधकाम करण्याची जबाबदारी कृषी सहाय्यकांवर देण्यात आली. लाखो रुपये खर्च करतेवेळी तांत्रिक कर्मचारी असणे आवश्यक होते; मात्र तसे झाले नाही. मोजमापपुस्तिका रेकॉर्ड करणे, इस्टीमेंट बनविण्याची जबाबदारी कृषी सहाय्यकांना ठरवून देण्यात आली. हा प्रकार पुर्णत: चुकीचा ठरला. नियोजनाचा अभाव यातील प्रमुख कारण दिसत आहे. शेताच्या काठावर खोदकाम केल्यावर माती व्यवस्थीत लावण्यात आली नाही. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाने तीच माती नाल्यात पडली आहे. सद्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने जंगलातील पाण्याचे स्त्रोत संपुष्टात आले आहे. वन्यप्राण्यांना पिण्यासाठी पाणी नाही. अशावेळी जलयुक्त शिवारातील नाल्यामध्ये पाण्याची अपेक्षा होती. मात्र येथेही निराशाच झाली. कृषी विभागाने पाण्याची साठवण करण्यावर भर दिल्याचे दिसत नाही. केवळ उद्दिष्ट पूर्ती करण्यासाठी टार्गेट म्हणून काम केल्याची माहिती एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा २०१६-१७ मध्ये सुरू झाला आहे. यासाठी ई-निविदा निघाल्या. सदर निविदा ३५ टक्के कमी दराने जात असल्यामुळे या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. शासनाने शासकीय निधीचे व्यवस्थीत नियोजन करावे आणि शेतकऱ्यांचा फायदा होईल, अशी कामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.(प्रतिनिधी)