शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

नितिमान समाज निर्मितीसाठी कायद्याचे पालन आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 22:35 IST

माणुस कायद्यासाठी नसून कायदा हा माणसासाठी निर्माण झालेला आहे. माणसाचे सामाजिक जीवन आबाधित राहण्यासाठी विशीष्ट नियमावली तया करण्यात आली असून त्याला कायदा असे नाव देण्यात आले आहे.

ठळक मुद्देसदावर्ते : समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : माणुस कायद्यासाठी नसून कायदा हा माणसासाठी निर्माण झालेला आहे. माणसाचे सामाजिक जीवन आबाधित राहण्यासाठी विशीष्ट नियमावली तया करण्यात आली असून त्याला कायदा असे नाव देण्यात आले आहे. प्रत्येक नागरिकांने आपली कर्तव्ये योग्य प्रकारे काळजीपूर्वक पार पाडून नितिमान समाजनिर्मितीसाठी योगदान द्यावे, कारण नितिमान समाज निर्मितीसाठी कायद्याची नितांत आवश्यकता आहे, असे उद्गार अ‍ॅड. अजित सदावर्ते यांनी काढले. स्थानिक यशवंत महाविद्यालयातील समाजशास्त्र अभ्यास मंडळाच्या उद्घाटन समारंभप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विलास देशमुख होते. तसेच प्रमुख पाहुणे विधी विभाग प्रमुख डॉ. रविशंकर मोर, समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. दिलीप देशमुख, प्रा. संदीप रायबोले मंचावर उपस्थित होते.प्रमुख पाहुणे डॉ. रविशंकर मोर यांनी स्त्रियांनी स्वत:ला दुय्यम समजू नये तर समाजाचा एक सशक्त घटक म्हणून तिने आपली जबाबदारी पार पाडावी. स्वत:च्या पायावर उभे राहून इतरांच्या कल्याणाचा विचारही तिने करावा, असे सांगून स्त्री-पुरूष भेदभाव न मानता समाजहित लक्षात घेऊन प्रत्येकाने आपे कर्तव्य पार पडावे, असे त्यांनी म्हटले. प्रास्ताविक प्रा. संदीप रायबोले यांनी केले.तसेच पाहुण्यांचा परिचय करून दिला. समाजशास्त्र मंडळाच्या अध्यक्षा शिवाणी काटोले, उपाध्यक्ष सुवर्णा ठाकरे, कोषाध्यक्ष सीमरन खान व सदस्य किरण पाटमासे, सोनल गुडवार, स्वाती मरापे, वैष्णवी झाडे यांचे प्रमुख पाहुण्याच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले. संचालन प्रवीण गवते यांनी तर आभार शीतल लगडे यांनी मानले. यावेळी विद्याथी उपस्थित होते.

टॅग्स :collegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी