शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

यशोदातून होणार ८३ हजार हेक्टरचे सिंचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 22:35 IST

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत शासनाने नदी, खोरे पुनरूज्जीवन प्रकल्प हाती घेतला आहे. सुमारे चार वर्षे मुदत असलेल्या या प्रकल्पातून ४० टक्के काम पूर्णत्वास गेले असून उर्वरित कामेही प्रगतिपथावर आहेत.

ठळक मुद्दे१०० कोटींच्या खर्चातून १५३ गावांत होणार कामे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत शासनाने नदी, खोरे पुनरूज्जीवन प्रकल्प हाती घेतला आहे. सुमारे चार वर्षे मुदत असलेल्या या प्रकल्पातून ४० टक्के काम पूर्णत्वास गेले असून उर्वरित कामेही प्रगतिपथावर आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या नदीच्या माध्यमातून चार तालुक्यातील तब्बल ८३ हजार ९३ हेक्टरमधील शेती सिंचीत होऊ शकणार आहे.आर्वी तालुक्यातील विरूळ (आकाजी) येथून उगम पावलेली यशोदा नदी हिंगणघाट तालुक्यातील शिरसगाव (येरणगाव) येथे वर्धा नदीला जाऊन मिळते; पण मागील काही वर्षांत यशोदा नदी लुप्त झाल्याचेच दिसून येत आहे. या नदीला नाल्याचे तथा झुडपी जंगलाचे स्वरूप आले होते. यामुळे जिल्ह्यातील एक मोठा जलस्त्रोत मृत होण्याच्या मार्गावर होता. ही बाब लक्षात घेऊन शासनाने जलयुक्त शिवार अभियानांतर्गत नदी खोरे पुनरूज्जीवन प्रकल्प हाती घेतला. यात वर्धा जिल्ह्यातील यशोदा नदी पुनरूज्जीवन प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पासाठी सुमारे १०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आलेला आहे. यात ५५ टक्के वाटा शासनाचा, ४० टक्के वाटा रतन टाटा ट्रस्ट आणि जमनालाल बजाज फाऊंडेशनचा तर पाच टक्के वाटा लोकसहभागातून जमा करायचा आहे. या प्रकल्पामध्ये वर्धा तालुक्यातील ७५, देवळी तालुक्यातील ५५, आर्वी तालुक्यातील दोन तथा हिंगणघाट तालुक्यातील २१ अशी १५३ गावे समाविष्ट करण्यात आलेली आहेत. २०१७-१८ मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पाला चार वर्षे म्हणजे २०२२ पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.सध्या कमलनयन बजाज फाऊंडेशनच्यावतीने यशोदा नदीला मिळणाऱ्या नाल्यांच्या खोलीकरणाची कामे हाती घेण्यात आलेली आहेत. वर्धा तालुक्यातील चिकणी, जामणी तथा अन्य एका गावातील नाल्यांच्या खोलीकरण तथा सरळीकरणाची कामे करण्यात आलेली आहेत. या कामांमुळे मृत जलस्त्रोत जिवंत होत असल्याचे तथा जलसंचय होत असल्याचेही पाहावयास मिळत आहे. याच प्रकल्पांतर्गत वर्धा नदीच्या पात्राच्या खोलीकरणाचे कामही हाती घेण्यात आले आहे. हे काम नांदोरा (डफरे) येथे सुरू करण्यात आले असून अन्य गावांतही कामे केली जात आहेत.शासन, रतन टाटा ट्रस्ट व जमनालाल बजाज फाऊंडेशनने हाती घेतलेल्या यशोदा नदी पुनरूज्जीवन प्रकल्पामुळे सिंचनाच्या क्षेत्रात लक्षनिय वाढ होणार आहे. असेच प्रकल्प जिल्ह्यातील अन्य नद्यांबाबत राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. वर्धा नदीचे पात्रही अनेक ठिकाणी उधळ झाले असून केरकचरा साचलेला आहे. शिवाय नालेही बुजण्याच्या स्थितीत आहेत. बोर, वणा नदीचेही तसेच हाल होत आहे. या नद्या मोठ्या जलस्त्रोत असल्याने त्यांचा विचार होणेही गरजेचे झाले आहे.वर्षभरात ४० टक्के कामे झाली पूर्णचिकणी (जामणी) - जलयुक्त शिवार अंतर्गत राबविल्या जात असलेल्या यशोदा नदी पुनरूज्जीवन प्रकल्पाची कामे चिकणी, जामणी परिसरात धडाक्याने करण्यात आली. या भागात यशोदा नदीला मिळणाऱ्या नाल्यांचे खोलीकरण, सरळीकरण करण्यात आले आहे. कमलनयन बजाज फाऊंडेशनच्यावतीने ही कामे केली जात असून एक वर्षात ४० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे तीन वर्षात पूर्ण होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये बजाज फाऊंडेशनकडून हा प्रकल्प राबविला जात आहे. यात वर्धा, देवळी, हिंगणघाट आणि आर्वी तालुक्याचा समावेश आहे. एकूण १५३ गावांत सदर प्रकल्प राबवित असून २०२२ मध्ये ही कामे पूर्ण होतील, असे सांगण्यात आले आहे.पावसाळ्यापूर्वी देवळी शहरातील कामे गरजेचीदेवळी - जिल्ह्यातील आर्वी, देवळी, वर्धा व हिंगणघाट तालुक्यातून वाहणारी यशोदा नदी अनेक ठिकाणी बुजली आहे. काही ठिकाणी केरकचरा तर काही ठिकाणी पात्राचे रूपांतर झुडपी जंगलात झाल्याचे दिसून येत आहे. देवळी येथे यशोदा नदीवरच स्मशानभूमी आहे. या ठिकाणी यशोदा नदीचे पात्र आहे की नाही, असाच भास होतो. या भागात नदीचे रूपांतर नाल्यात तथा झुडपी जंगलात झाल्याचे दिसून येते. शिवाय रस्त्याच्या दुसऱ्या बाजूलाही यशोदा नदीच्या पात्रात केवळ झुडपांचेच साम्राज्य दिसून येते. यामुळे देवळी तालुक्यातील यशोदा नदी पुनरूज्जीवन प्रकल्पातील कामे प्रथम हाती घेणे गरजेचे झाले आहे. पावसाळ्यापूर्वी ही कामे झाल्यास मोठ्या प्रमाणात जलसंचयास मदत होणार असून शेतकºयांचे दरवर्षी पुरामुळे होणारे नुकसानही टाळता येणार आहे.