शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीवर ‘मर अन् दहीया’चे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 00:06 IST

मागील तीन वर्षांपासून नापिकीचा फटकाच शेतकऱ्यांना सहन करावा लागल्याचे वास्तव आहे. पूर्वीच अस्मानी व सुल्तानी संकटांमुळे मेटाकुटीस आलेल्या कपाशी उत्पादक शेतकºयांची आता कपाशीवर आलेल्या मर अन् दहीया रोगाने चिंता वाढविली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची चिंता वाढली : एक-दोन वेचणीत कपाशीच्या उलंगवाडीची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : मागील तीन वर्षांपासून नापिकीचा फटकाच शेतकऱ्यांना सहन करावा लागल्याचे वास्तव आहे. पूर्वीच अस्मानी व सुल्तानी संकटांमुळे मेटाकुटीस आलेल्या कपाशी उत्पादक शेतकऱ्यांची आता कपाशीवर आलेल्या मर अन् दहीया रोगाने चिंता वाढविली आहे. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे यंदा कपाशी उत्पादकांना एक किंवा दोन वेचणीनंतर कपाशीची उलंगवाडी करावी लागेल अशी शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे.मागील वर्षी गुलाबी बोंडअळीने जिल्ह्यात चांगलाच कहर केला. त्यावेळी समाधानकारक उत्पन्न झाले नसल्याचेही शेतकरी सांगतात. यंदा पून्हा मोठा धोका पत्कारून परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. शिवाय बोंडअळीला अटकाव घालण्यासाठी हंगामाच्या सुरूवातीला कामगंध सापळ्यांचा वापरही केला. परंतु, सध्या कपाशी पिकावर मर अन् दहीया या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. या रोगाचा प्रादुर्भात या भागातील शेतकरी गजानन डायरे, प्रदीप भोयर, किशोर बेलसरे, प्रकाश डफरे, गणेश बेलसरे, नरेश झोड, मोरेश्वर घोडे यांच्या शेतातील उभ्या कपाशी पिकावर दिसून येत आहे. यावर्षी अल्प पाऊस झाला असला तरी पिकांची स्थिती चांगली होती. परंतु, ५ ते ६ दिवसांपासून काही कपाशी उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशीचे झाडे वाळत असल्याचे दिसून येत आहे. या रोगामुळे कपाशीच्या झाडांची पाने लालसर, काळपट येवून झाडच वाळत असल्याचे शेतकरी सांगतात. झाडे वाळत असल्यामुळे पाती, फुलं, येणे बंद झाले आहे. शिवाय रोगाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी जी बोंड भरली आहेत ते बोंडे फुटणे सुरू झाले आहे. यामुळे कापूस उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. इतकेच नव्हे तर एक किंवा दोन वेच्यातच कपाशीची उलंगवाडी करावी लागेल असा कयास शेतकऱ्यांकडून वर्तविला जात आहे. सध्या स्थितीत चांगलेच ऊन तपत आहे. तसेच जमिनीतील ओलावाही पाहिजे तसा नसल्याचे शेतकरी सांगतात. पांढरी माशी व चुरडा बरेच दिवस पऱ्हाटीवर राहिल्यामुळे पानातील रस पूर्णत: त्यांनी शोसून घेतला. शिवाय झाडे वाळत आहेत. त्यामळे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना वेळीच मार्गदर्शन करण्याची मागणी आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी