शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीवर ‘मर अन् दहीया’चे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 00:06 IST

मागील तीन वर्षांपासून नापिकीचा फटकाच शेतकऱ्यांना सहन करावा लागल्याचे वास्तव आहे. पूर्वीच अस्मानी व सुल्तानी संकटांमुळे मेटाकुटीस आलेल्या कपाशी उत्पादक शेतकºयांची आता कपाशीवर आलेल्या मर अन् दहीया रोगाने चिंता वाढविली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची चिंता वाढली : एक-दोन वेचणीत कपाशीच्या उलंगवाडीची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : मागील तीन वर्षांपासून नापिकीचा फटकाच शेतकऱ्यांना सहन करावा लागल्याचे वास्तव आहे. पूर्वीच अस्मानी व सुल्तानी संकटांमुळे मेटाकुटीस आलेल्या कपाशी उत्पादक शेतकऱ्यांची आता कपाशीवर आलेल्या मर अन् दहीया रोगाने चिंता वाढविली आहे. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे यंदा कपाशी उत्पादकांना एक किंवा दोन वेचणीनंतर कपाशीची उलंगवाडी करावी लागेल अशी शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे.मागील वर्षी गुलाबी बोंडअळीने जिल्ह्यात चांगलाच कहर केला. त्यावेळी समाधानकारक उत्पन्न झाले नसल्याचेही शेतकरी सांगतात. यंदा पून्हा मोठा धोका पत्कारून परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. शिवाय बोंडअळीला अटकाव घालण्यासाठी हंगामाच्या सुरूवातीला कामगंध सापळ्यांचा वापरही केला. परंतु, सध्या कपाशी पिकावर मर अन् दहीया या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. या रोगाचा प्रादुर्भात या भागातील शेतकरी गजानन डायरे, प्रदीप भोयर, किशोर बेलसरे, प्रकाश डफरे, गणेश बेलसरे, नरेश झोड, मोरेश्वर घोडे यांच्या शेतातील उभ्या कपाशी पिकावर दिसून येत आहे. यावर्षी अल्प पाऊस झाला असला तरी पिकांची स्थिती चांगली होती. परंतु, ५ ते ६ दिवसांपासून काही कपाशी उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशीचे झाडे वाळत असल्याचे दिसून येत आहे. या रोगामुळे कपाशीच्या झाडांची पाने लालसर, काळपट येवून झाडच वाळत असल्याचे शेतकरी सांगतात. झाडे वाळत असल्यामुळे पाती, फुलं, येणे बंद झाले आहे. शिवाय रोगाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी जी बोंड भरली आहेत ते बोंडे फुटणे सुरू झाले आहे. यामुळे कापूस उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. इतकेच नव्हे तर एक किंवा दोन वेच्यातच कपाशीची उलंगवाडी करावी लागेल असा कयास शेतकऱ्यांकडून वर्तविला जात आहे. सध्या स्थितीत चांगलेच ऊन तपत आहे. तसेच जमिनीतील ओलावाही पाहिजे तसा नसल्याचे शेतकरी सांगतात. पांढरी माशी व चुरडा बरेच दिवस पऱ्हाटीवर राहिल्यामुळे पानातील रस पूर्णत: त्यांनी शोसून घेतला. शिवाय झाडे वाळत आहेत. त्यामळे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना वेळीच मार्गदर्शन करण्याची मागणी आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी