शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

कपाशीवर ‘मर अन् दहीया’चे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 00:06 IST

मागील तीन वर्षांपासून नापिकीचा फटकाच शेतकऱ्यांना सहन करावा लागल्याचे वास्तव आहे. पूर्वीच अस्मानी व सुल्तानी संकटांमुळे मेटाकुटीस आलेल्या कपाशी उत्पादक शेतकºयांची आता कपाशीवर आलेल्या मर अन् दहीया रोगाने चिंता वाढविली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची चिंता वाढली : एक-दोन वेचणीत कपाशीच्या उलंगवाडीची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : मागील तीन वर्षांपासून नापिकीचा फटकाच शेतकऱ्यांना सहन करावा लागल्याचे वास्तव आहे. पूर्वीच अस्मानी व सुल्तानी संकटांमुळे मेटाकुटीस आलेल्या कपाशी उत्पादक शेतकऱ्यांची आता कपाशीवर आलेल्या मर अन् दहीया रोगाने चिंता वाढविली आहे. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे यंदा कपाशी उत्पादकांना एक किंवा दोन वेचणीनंतर कपाशीची उलंगवाडी करावी लागेल अशी शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे.मागील वर्षी गुलाबी बोंडअळीने जिल्ह्यात चांगलाच कहर केला. त्यावेळी समाधानकारक उत्पन्न झाले नसल्याचेही शेतकरी सांगतात. यंदा पून्हा मोठा धोका पत्कारून परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. शिवाय बोंडअळीला अटकाव घालण्यासाठी हंगामाच्या सुरूवातीला कामगंध सापळ्यांचा वापरही केला. परंतु, सध्या कपाशी पिकावर मर अन् दहीया या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. या रोगाचा प्रादुर्भात या भागातील शेतकरी गजानन डायरे, प्रदीप भोयर, किशोर बेलसरे, प्रकाश डफरे, गणेश बेलसरे, नरेश झोड, मोरेश्वर घोडे यांच्या शेतातील उभ्या कपाशी पिकावर दिसून येत आहे. यावर्षी अल्प पाऊस झाला असला तरी पिकांची स्थिती चांगली होती. परंतु, ५ ते ६ दिवसांपासून काही कपाशी उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशीचे झाडे वाळत असल्याचे दिसून येत आहे. या रोगामुळे कपाशीच्या झाडांची पाने लालसर, काळपट येवून झाडच वाळत असल्याचे शेतकरी सांगतात. झाडे वाळत असल्यामुळे पाती, फुलं, येणे बंद झाले आहे. शिवाय रोगाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी जी बोंड भरली आहेत ते बोंडे फुटणे सुरू झाले आहे. यामुळे कापूस उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. इतकेच नव्हे तर एक किंवा दोन वेच्यातच कपाशीची उलंगवाडी करावी लागेल असा कयास शेतकऱ्यांकडून वर्तविला जात आहे. सध्या स्थितीत चांगलेच ऊन तपत आहे. तसेच जमिनीतील ओलावाही पाहिजे तसा नसल्याचे शेतकरी सांगतात. पांढरी माशी व चुरडा बरेच दिवस पऱ्हाटीवर राहिल्यामुळे पानातील रस पूर्णत: त्यांनी शोसून घेतला. शिवाय झाडे वाळत आहेत. त्यामळे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना वेळीच मार्गदर्शन करण्याची मागणी आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी