शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

आंतरिक आध्यात्मिक सुखात मानवी प्रगतीचे मापदंड

By admin | Updated: December 20, 2015 02:12 IST

विकास हा भौतिक सुखात नसून तो आंतरिक आध्यात्मिकतेने मिळणाऱ्या आंतरिक सुखात आहे.

श्रीशजी देवपुजारी : प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये ‘वैश्विक समस्यांचे समाधान’ विषयावर व्याख्यानहिंगणघाट : विकास हा भौतिक सुखात नसून तो आंतरिक आध्यात्मिकतेने मिळणाऱ्या आंतरिक सुखात आहे. हे आध्यात्मिक सुख भारतीय प्राचीन धर्म ग्रंथात आहे व ते ग्रंथ संस्कृत भाषेत आहे. प्राचीन शास्त्र अधिक प्रगत असून प्राचीन खजिना उलगडण्यासाठी संस्कृत भाषेची कास धरा, असे आवाहन संस्कृत भारतीचे अखिल भारतीय संघटनमंत्री श्रीशजी देवपुजारी यांनी केले. आज जगापुढे पर्यावरण व दहशतवाद या दोन मुख्य समस्या आहे, असे सांगताना देवपुजारी म्हणाले की, भौतिक विकासाच्या चुकीच्या विचाराने आम्ही जगात प्रचंड प्रदूषण निर्माण करीत आहोत. आवश्यकता नसताना मानव जुन्या वस्तू फुंकून नवीन वस्तू खरेदी करीत आहे. या वस्तू खरेदी केल्याने आपला भौतिक विकास झाला, असे समजतात. या आर्थिक विकासाच्या सुत्रामुळे रोज उत्पादन सुरू आहे. यामुळे आकाशात विषारी वायू, विषारी रसायणे, नदी, तलाव, समुद्रात सोडत आहे. रोजच्या कचऱ्यामुळे वसुंधरा प्रदूषित झाली आहे. जगातील प्रगतशील देश वातावरणात सर्वाधिक प्रदूषण निर्माण करीत आहे. ते आपल्या भौतिक सुविधांचे उत्पादन वाढविताना प्रदूषणाकडे दुर्लक्ष करताना आपल्या वाट्याचे प्रदूषण कमी करण्याचे दायित्व लाहन देशांकडे देतात. हा सर्व विनाश पाश्चिमात्य तत्वज्ञानामुळे होत आहे. ही समस्या सोडविण्याची खरी ताकद भारतीय तत्वज्ञानात आहे; पण हे ज्ञान संस्कृत असल्याने आपल्याला संस्कृत भाषा अवगत झाली पाहिजे. तरच आपण जगाला योग्य मार्गदर्शन करून जगाच्या समस्या सोडवू. दशहतवाद यावर बोलताना देवपुजारी म्हणाले की, सर्व धर्मातील लोकांनी आपले संप्रदाय, धार्मिक ग्रंथ, मांडलेले धार्मिक तत्वज्ञान व धार्मिक श्रद्धास्थान हेच जगात श्रेष्ठ आहे. या अतिरेकी विचारामुळे जगात दहशतवाद निर्माण झाला आहे. मूळात सर्व धर्म ग्रंथात समानतेचे व अहिंसेचे विचार मांडले आहे; पण काही प्रवृत्तीने आपलेच विचार तत्वज्ञान जगात श्रेष्ठ व बाकी दुय्यम आहे, आपल्या विचाराच्या प्रतिकूल विचारांना नष्ट करायचे यातून दशहतवाद निर्माण झाला. या समस्या सोडविण्याची ताकद फक्त भारताकडे आहे. यासाठी भारतीय धर्मग्रंथांचा अभ्यास करावा व तसे जीवन जगावे, तरच संपूर्ण जग समस्यामुक्त होईल. यासाठी आधुनिक शास्त्रापेक्षा प्राचीन शास्त्राचे शास्त्रायान करून संस्कृत भाषेची कास धरा, असे आवाहनही त्यांनी केले.(तालुका प्रतिनिधी)