शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

आंतरिक आध्यात्मिक सुखात मानवी प्रगतीचे मापदंड

By admin | Updated: December 20, 2015 02:12 IST

विकास हा भौतिक सुखात नसून तो आंतरिक आध्यात्मिकतेने मिळणाऱ्या आंतरिक सुखात आहे.

श्रीशजी देवपुजारी : प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये ‘वैश्विक समस्यांचे समाधान’ विषयावर व्याख्यानहिंगणघाट : विकास हा भौतिक सुखात नसून तो आंतरिक आध्यात्मिकतेने मिळणाऱ्या आंतरिक सुखात आहे. हे आध्यात्मिक सुख भारतीय प्राचीन धर्म ग्रंथात आहे व ते ग्रंथ संस्कृत भाषेत आहे. प्राचीन शास्त्र अधिक प्रगत असून प्राचीन खजिना उलगडण्यासाठी संस्कृत भाषेची कास धरा, असे आवाहन संस्कृत भारतीचे अखिल भारतीय संघटनमंत्री श्रीशजी देवपुजारी यांनी केले. आज जगापुढे पर्यावरण व दहशतवाद या दोन मुख्य समस्या आहे, असे सांगताना देवपुजारी म्हणाले की, भौतिक विकासाच्या चुकीच्या विचाराने आम्ही जगात प्रचंड प्रदूषण निर्माण करीत आहोत. आवश्यकता नसताना मानव जुन्या वस्तू फुंकून नवीन वस्तू खरेदी करीत आहे. या वस्तू खरेदी केल्याने आपला भौतिक विकास झाला, असे समजतात. या आर्थिक विकासाच्या सुत्रामुळे रोज उत्पादन सुरू आहे. यामुळे आकाशात विषारी वायू, विषारी रसायणे, नदी, तलाव, समुद्रात सोडत आहे. रोजच्या कचऱ्यामुळे वसुंधरा प्रदूषित झाली आहे. जगातील प्रगतशील देश वातावरणात सर्वाधिक प्रदूषण निर्माण करीत आहे. ते आपल्या भौतिक सुविधांचे उत्पादन वाढविताना प्रदूषणाकडे दुर्लक्ष करताना आपल्या वाट्याचे प्रदूषण कमी करण्याचे दायित्व लाहन देशांकडे देतात. हा सर्व विनाश पाश्चिमात्य तत्वज्ञानामुळे होत आहे. ही समस्या सोडविण्याची खरी ताकद भारतीय तत्वज्ञानात आहे; पण हे ज्ञान संस्कृत असल्याने आपल्याला संस्कृत भाषा अवगत झाली पाहिजे. तरच आपण जगाला योग्य मार्गदर्शन करून जगाच्या समस्या सोडवू. दशहतवाद यावर बोलताना देवपुजारी म्हणाले की, सर्व धर्मातील लोकांनी आपले संप्रदाय, धार्मिक ग्रंथ, मांडलेले धार्मिक तत्वज्ञान व धार्मिक श्रद्धास्थान हेच जगात श्रेष्ठ आहे. या अतिरेकी विचारामुळे जगात दहशतवाद निर्माण झाला आहे. मूळात सर्व धर्म ग्रंथात समानतेचे व अहिंसेचे विचार मांडले आहे; पण काही प्रवृत्तीने आपलेच विचार तत्वज्ञान जगात श्रेष्ठ व बाकी दुय्यम आहे, आपल्या विचाराच्या प्रतिकूल विचारांना नष्ट करायचे यातून दशहतवाद निर्माण झाला. या समस्या सोडविण्याची ताकद फक्त भारताकडे आहे. यासाठी भारतीय धर्मग्रंथांचा अभ्यास करावा व तसे जीवन जगावे, तरच संपूर्ण जग समस्यामुक्त होईल. यासाठी आधुनिक शास्त्रापेक्षा प्राचीन शास्त्राचे शास्त्रायान करून संस्कृत भाषेची कास धरा, असे आवाहनही त्यांनी केले.(तालुका प्रतिनिधी)