शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

आंतरिक आध्यात्मिक सुखात मानवी प्रगतीचे मापदंड

By admin | Updated: December 20, 2015 02:12 IST

विकास हा भौतिक सुखात नसून तो आंतरिक आध्यात्मिकतेने मिळणाऱ्या आंतरिक सुखात आहे.

श्रीशजी देवपुजारी : प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये ‘वैश्विक समस्यांचे समाधान’ विषयावर व्याख्यानहिंगणघाट : विकास हा भौतिक सुखात नसून तो आंतरिक आध्यात्मिकतेने मिळणाऱ्या आंतरिक सुखात आहे. हे आध्यात्मिक सुख भारतीय प्राचीन धर्म ग्रंथात आहे व ते ग्रंथ संस्कृत भाषेत आहे. प्राचीन शास्त्र अधिक प्रगत असून प्राचीन खजिना उलगडण्यासाठी संस्कृत भाषेची कास धरा, असे आवाहन संस्कृत भारतीचे अखिल भारतीय संघटनमंत्री श्रीशजी देवपुजारी यांनी केले. आज जगापुढे पर्यावरण व दहशतवाद या दोन मुख्य समस्या आहे, असे सांगताना देवपुजारी म्हणाले की, भौतिक विकासाच्या चुकीच्या विचाराने आम्ही जगात प्रचंड प्रदूषण निर्माण करीत आहोत. आवश्यकता नसताना मानव जुन्या वस्तू फुंकून नवीन वस्तू खरेदी करीत आहे. या वस्तू खरेदी केल्याने आपला भौतिक विकास झाला, असे समजतात. या आर्थिक विकासाच्या सुत्रामुळे रोज उत्पादन सुरू आहे. यामुळे आकाशात विषारी वायू, विषारी रसायणे, नदी, तलाव, समुद्रात सोडत आहे. रोजच्या कचऱ्यामुळे वसुंधरा प्रदूषित झाली आहे. जगातील प्रगतशील देश वातावरणात सर्वाधिक प्रदूषण निर्माण करीत आहे. ते आपल्या भौतिक सुविधांचे उत्पादन वाढविताना प्रदूषणाकडे दुर्लक्ष करताना आपल्या वाट्याचे प्रदूषण कमी करण्याचे दायित्व लाहन देशांकडे देतात. हा सर्व विनाश पाश्चिमात्य तत्वज्ञानामुळे होत आहे. ही समस्या सोडविण्याची खरी ताकद भारतीय तत्वज्ञानात आहे; पण हे ज्ञान संस्कृत असल्याने आपल्याला संस्कृत भाषा अवगत झाली पाहिजे. तरच आपण जगाला योग्य मार्गदर्शन करून जगाच्या समस्या सोडवू. दशहतवाद यावर बोलताना देवपुजारी म्हणाले की, सर्व धर्मातील लोकांनी आपले संप्रदाय, धार्मिक ग्रंथ, मांडलेले धार्मिक तत्वज्ञान व धार्मिक श्रद्धास्थान हेच जगात श्रेष्ठ आहे. या अतिरेकी विचारामुळे जगात दहशतवाद निर्माण झाला आहे. मूळात सर्व धर्म ग्रंथात समानतेचे व अहिंसेचे विचार मांडले आहे; पण काही प्रवृत्तीने आपलेच विचार तत्वज्ञान जगात श्रेष्ठ व बाकी दुय्यम आहे, आपल्या विचाराच्या प्रतिकूल विचारांना नष्ट करायचे यातून दशहतवाद निर्माण झाला. या समस्या सोडविण्याची ताकद फक्त भारताकडे आहे. यासाठी भारतीय धर्मग्रंथांचा अभ्यास करावा व तसे जीवन जगावे, तरच संपूर्ण जग समस्यामुक्त होईल. यासाठी आधुनिक शास्त्रापेक्षा प्राचीन शास्त्राचे शास्त्रायान करून संस्कृत भाषेची कास धरा, असे आवाहनही त्यांनी केले.(तालुका प्रतिनिधी)