शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

जमीन संपादनाच्या मोबदल्यात अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 21:48 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीय राजमार्ग क्र. ३६१ मध्ये संपादित केलेल्या आणि होणाºया जमिनीचा मोबदला चौरस मीटरप्रमाणे देण्यात यावा, अशी मागणी सालोड हिरापूर येथील शेतकऱ्यांसह भूमिपूत्र संघर्ष वाहिनीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

ठळक मुद्देचौरस मीटरप्रमाणे रक्कम द्या : भूमिपूत्र संघर्ष वाहिनीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीय राजमार्ग क्र. ३६१ मध्ये संपादित केलेल्या आणि होणाºया जमिनीचा मोबदला चौरस मीटरप्रमाणे देण्यात यावा, अशी मागणी सालोड हिरापूर येथील शेतकऱ्यांसह भूमिपूत्र संघर्ष वाहिनीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.राष्ट्रीय राजमार्ग क्र. ३६१ मध्ये संपादित होणाऱ्या जमिनीचा दर मोबदल्याच्या स्वरूपात हेक्टर आर प्रमाणे देण्यात आलेला आहे; पण याच प्रकल्पासाठी संपूर्ण यवतमाळ, लातूर, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकºयांना नॅशनल हायवेज अ‍ॅक्ट १९५६ च्या तरतुदीनुसार चौरस मिटर व त्यावरील चार गुणक प्रमाणे मोबदला देण्यात आला आहे. याबाबत शेतकरी व भूमिपुत्र संघर्ष वाहिनेने जिल्हाधिकाऱ्यांना यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील खडका (भूसंपादन मामला क्र. ६/४७/२०१५-१६) येथील पारित करण्यात आलेला अंतिम निवाडा सादर केला आहे. वर्धा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे. शिवाय सध्या शेतकऱ्यांना कोरड्या दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहे. शेती संपादीत करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांचे रोजगाराचे साधन हिरावले जाणार आहे. त्यांना मिळालेला मोबदला पुढील आयुष्य जगण्यासाठी व निर्वाहासाठी आधार आहे. त्यामुळे भूसंपादनाच्या या विषयाकडे लक्ष घालून वर्धा जिल्ह्यातील राष्ट्रीय राजमार्ग क्र. ३६१ मध्ये संपादीत होणाऱ्या जमिनीचा दर चौरस मिटर व त्यावरील चारचा गुणक प्रमाणे लावून मोबदला देण्यात यावा. अन्यथा भूमिपुत्र संघर्ष वाहिनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करेल, असा इशारा संघर्ष वाहिनीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित फाळके पाटील यांनी दिला आहे. सोमवारी या शेतकºयांना घेवून भूमिपुत्र संघर्ष वाहिनी विभागीय आयुक्त नागपूर यांची भेट घेणार आहे. यासंदर्भात शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. याप्रसंगी योगेश घोगरे, प्रवीण पेठे, रितेश घोगरे, प्रवीण काटकर, राम डायगव्हाणे, शेतकरी उदय देशमुख, संजय मेहत्रे, अविनाश कुबडे, कुणाल देशमुख, निलेश वाघ, धनंजय चरडे, नरेंद्र वघळे, प्रताप चरडे, जाहीद खाँ पठाण, मुशीर पठाण, दत्तात्रय चरडे, सतीश देशमुख, रामानंद नागतोडे, जगदीश बदरीया, किशोर मडावी, गणेश वघळे, लक्ष्मण बदरिया, दत्तात्रय राऊत, अरविंद देशमुख, विलास मेहत्रे, रत्नाकर चरडे, विनोद फटींग, रवी रूईकर, मनोहर हजारे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :highwayमहामार्गFarmerशेतकरी