शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

जमीन संपादनाच्या मोबदल्यात अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 21:48 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीय राजमार्ग क्र. ३६१ मध्ये संपादित केलेल्या आणि होणाºया जमिनीचा मोबदला चौरस मीटरप्रमाणे देण्यात यावा, अशी मागणी सालोड हिरापूर येथील शेतकऱ्यांसह भूमिपूत्र संघर्ष वाहिनीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

ठळक मुद्देचौरस मीटरप्रमाणे रक्कम द्या : भूमिपूत्र संघर्ष वाहिनीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीय राजमार्ग क्र. ३६१ मध्ये संपादित केलेल्या आणि होणाºया जमिनीचा मोबदला चौरस मीटरप्रमाणे देण्यात यावा, अशी मागणी सालोड हिरापूर येथील शेतकऱ्यांसह भूमिपूत्र संघर्ष वाहिनीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.राष्ट्रीय राजमार्ग क्र. ३६१ मध्ये संपादित होणाऱ्या जमिनीचा दर मोबदल्याच्या स्वरूपात हेक्टर आर प्रमाणे देण्यात आलेला आहे; पण याच प्रकल्पासाठी संपूर्ण यवतमाळ, लातूर, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकºयांना नॅशनल हायवेज अ‍ॅक्ट १९५६ च्या तरतुदीनुसार चौरस मिटर व त्यावरील चार गुणक प्रमाणे मोबदला देण्यात आला आहे. याबाबत शेतकरी व भूमिपुत्र संघर्ष वाहिनेने जिल्हाधिकाऱ्यांना यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील खडका (भूसंपादन मामला क्र. ६/४७/२०१५-१६) येथील पारित करण्यात आलेला अंतिम निवाडा सादर केला आहे. वर्धा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे. शिवाय सध्या शेतकऱ्यांना कोरड्या दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहे. शेती संपादीत करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांचे रोजगाराचे साधन हिरावले जाणार आहे. त्यांना मिळालेला मोबदला पुढील आयुष्य जगण्यासाठी व निर्वाहासाठी आधार आहे. त्यामुळे भूसंपादनाच्या या विषयाकडे लक्ष घालून वर्धा जिल्ह्यातील राष्ट्रीय राजमार्ग क्र. ३६१ मध्ये संपादीत होणाऱ्या जमिनीचा दर चौरस मिटर व त्यावरील चारचा गुणक प्रमाणे लावून मोबदला देण्यात यावा. अन्यथा भूमिपुत्र संघर्ष वाहिनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करेल, असा इशारा संघर्ष वाहिनीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित फाळके पाटील यांनी दिला आहे. सोमवारी या शेतकºयांना घेवून भूमिपुत्र संघर्ष वाहिनी विभागीय आयुक्त नागपूर यांची भेट घेणार आहे. यासंदर्भात शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. याप्रसंगी योगेश घोगरे, प्रवीण पेठे, रितेश घोगरे, प्रवीण काटकर, राम डायगव्हाणे, शेतकरी उदय देशमुख, संजय मेहत्रे, अविनाश कुबडे, कुणाल देशमुख, निलेश वाघ, धनंजय चरडे, नरेंद्र वघळे, प्रताप चरडे, जाहीद खाँ पठाण, मुशीर पठाण, दत्तात्रय चरडे, सतीश देशमुख, रामानंद नागतोडे, जगदीश बदरीया, किशोर मडावी, गणेश वघळे, लक्ष्मण बदरिया, दत्तात्रय राऊत, अरविंद देशमुख, विलास मेहत्रे, रत्नाकर चरडे, विनोद फटींग, रवी रूईकर, मनोहर हजारे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :highwayमहामार्गFarmerशेतकरी