शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

स्थलांतरीत पक्षांचे आगमन मंदावले

By admin | Updated: February 7, 2015 01:22 IST

जिल्ह्यात मान्सूनच्या आगमनानंतर व हिवाळ्यात स्थलांतरीत पक्षांचे आगमन होते. गत काही वर्षात या पक्षांचे आगमन मंदावले आहे.

श्रेया केने वर्धा जिल्ह्यात मान्सूनच्या आगमनानंतर व हिवाळ्यात स्थलांतरीत पक्षांचे आगमन होते. गत काही वर्षात या पक्षांचे आगमन मंदावले आहे. जिल्ह्यात पक्षांचा अधिवास धोक्यात आला असून त्याला वनविभागाचे उदासीन धोरणही कारणीभूत ठरत आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच पक्षीगणना करण्यात आली असल्याने पक्षांच्या स्थलांतराणाचा मुद्दा चर्चेत आला आहे.बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी व जिल्हा वनसंरक्षक कार्यालय यांच्यावतीने जिल्ह्यातील पक्षांची गणना करण्यात आली. यावेळी पक्षी अभ्यासकांचे सहकार्य घेण्यात आले. वनविभागाने केलेल्या नोंदी तसेच पक्षी अभ्यासकांच्या नोंदीवरून पक्षांची प्रगणना होत असे, जिल्ह्यामतील काही प्रमुख पाणवठे, मदन उन्नई प्रकल्प, बोर प्रकल्प, जंगलाचा भाग येथे स्थलांतरीत पक्ष्यांचे आगमन होते. मुख्यत: मान्सून व हिवाळ्यात पक्षांचे आगमन होते. गत काही वर्षांपासून नियमित स्थलांतरीत होणाऱ्या पक्षांचे आगमनच होत नसल्याची बाब नोंदीतून समोर आली आहे. पक्षी अभ्यासकांच्या मते, सुमारे १५ ते २० वर्षांपूर्वी माळढोक पक्षी येत असत; मात्र माळरान संपुष्टात आल्याने या पक्षाचे आगमनच नाही. पक्षात पॉण्डस बर्ड, इंटरस्टेट, लोकल असे प्रकार असतात, जिल्ह्यात लोकल आणि पॉण्डस बर्डचे स्थलांतरण अधिक आहेत. प्रामुख्याने करकोचा, बदक, तांबट, घुबड, पिंगळा, शिकरा यांचा समावेश आहे.जैवविविधता समिती नाममात्रजिल्हास्तरावर जैवविविधता समिती गठित केली जाते. पक्षी हा विषय या अंतर्गत हाताळण्यात येतो. याशिवाय जिल्ह्यात आढळणाऱ्या जैवविविधतेचा विचार यात केला जातो. जैवविविधतेच्या रक्षणार्थ करावयाच्या उपाययोजना, नोंदी, संवर्धन याबाबी समाविष्ट आहेत. जिल्ह्यात मात्र समिती गठीत करण्यापलीकडे मजल गेली नाही. वनविभागानेही जिल्ह्याचा आराखडा तयार केलेला नाही. जैवविविधतेबाबत सजगता दाखविण्यात येत नसल्याचे यावरून दिसते.शेतकऱ्यांमध्ये जागृतीची गरजपक्षी हे शेतकऱ्यांचे मित्र आहेत. निसर्गाचा समतोल राखण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पक्षी करीत असले तरी पक्ष्यांमुळे पिकाची नासाडी होते हा गैरसमज बळावत आहेत. परिणामी शॉक लावून किंवा जाळ्यांचा वापर करून पक्ष्यांना मारण्यात येत आहे. प्रत्यक्षात पक्षी पिकांवरील किडे, अळ्या फस्त करून शेतकऱ्यांना अप्रत्यक्ष सहाय्य करतात. याबाबत जागृती केल्यास पक्षांच्या शिकारीचे प्रमाण कमी होईल. कृषी विभागाकडून त्यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती पक्षी अभ्यासक प्रभाकर पुसदकर यांनी ‘लोकमत’ला दिली.पक्षांचा अधिवास धोक्यातपक्षांचा अधिवास (हॅबीटर) मानवी हस्तक्षेपामुळे बऱ्याच प्रमाणात धोक्यात आला आहे. शिवाय ग्लोबल वॉर्मिंगमुळे अधिवास नष्ट होवू लागले आहे. पक्षांना जिथे खाद्य मिळते आणि अंडी घालण्यासाठी सुरक्षित जागा असते. त्याला अधिवास असे म्हणतात.शेतीत मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर केला जात आहे. कीटक नाशकांचा फवारणीमुळे विषारी द्रव्य नदीच्या प्रवाहात मिसळतात. धरणाच्या बॅकवाटरमध्ये असेच प्रदुषण झाल्याने पक्षांचे खाद्य नष्ट झाले.