शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

दिवाळीच्या फराळाला महागाईचा तडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2020 5:00 AM

डाळी आणि खाद्यतेलाचे भाव वाढल्याने साहजिकच बेसणाचे  व तेलाचे भाव वाढले.  यामुळे आता चकली तीनशे रुपये किलो झाली आहे. मागील वर्षीच्या दीपावलीच्या तुलनेत यंदा दिवाळी फराळाचे भाव २० ते २० रुपयांपर्यंत वधारले आहे. गत काही वर्षांत रेडिमेड फराळ खरेदीकडे ग्राहकांचा कल आहे. मागणी होत असल्याने आता फराळाची दुकानेही विविध भागात रस्त्याच्या कडेला सजू लागली आहेत. मात्र, महागाईमुळे दुकानांवर फारशी गर्दी नाही.

ठळक मुद्देखाद्यतेल, डाळी महागल्याचा परिणाम ; फराळ विक्रेत्यांकडे ग्राहकांनी फिरविली पाठ

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातीलच नव्हे, तर ग्रामीण भागातील गाडा रुतला होता.  आता हा रुतलेला गाडा पूर्व पदावर यायला सुरुवात झाली आहे. डाळी, खाद्यतेल व इतर कडधान्य महागल्याने यंदा दिवाळीचा फराळ महागला असल्याचे चित्र असून यावर्षी दिवाळीच्या फराळाला महागाईचा  मोठा तडाखा बसला आहे.डाळी आणि खाद्यतेलाचे भाव वाढल्याने साहजिकच बेसणाचे  व तेलाचे भाव वाढले.  यामुळे आता चकली तीनशे रुपये किलो झाली आहे. मागील वर्षीच्या दीपावलीच्या तुलनेत यंदा दिवाळी फराळाचे भाव २० ते २० रुपयांपर्यंत वधारले आहे. गत काही वर्षांत रेडिमेड फराळ खरेदीकडे ग्राहकांचा कल आहे. मागणी होत असल्याने आता फराळाची दुकानेही विविध भागात रस्त्याच्या कडेला सजू लागली आहेत. मात्र, महागाईमुळे दुकानांवर फारशी गर्दी नाही.  हवे असणारे फराळ घरीच तयार करण्याकडे अनेकांचा कल दिसून ये त आहे.  त्यामुळे फराळ विक्रेत्यांंनाही मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. 

उपाहारगृहचालक आता दिवाळीच्या फराळाच्या कामात व्यस्त आर्वीत 95 बचत गट आहे त्यापैकी आधार महिला बचत गट आणि  चार ते पाच महिला बचत गट फराळाचे साहित्य बनवून द्यायचे विक्री करायचे मात्र यावर्षी  कोरोनाच्या प्रभावाने थोडा प्रतिबंध लागला आहे. यंदा फराळाची मागणीमध्ये घट झाल्याचे चित्र असून शंकरपाळे शेव करंजी चकली अनारसे यांच्या मागणीत मात्र वाढ झाली आहे 

दरवर्षी फराळाच्या मोठ्या प्रमाणावर ऑर्डर मिळतात. ऑर्डरनुसार ग्राहकांना आमच्या बचतगटामार्फत फराळ तयार करून दिले जाते. मात्र, यंदा दिवाळी सणावरही कोरोना विषाणू संक्रमणाचे सावट घोंगावत आहे. दिवाळी पाच-सहा दिवसांवर असताना ग्राहकांनी अद्याप फराळाच्या ऑर्डर दिलेल्या नाहीत. ऑर्डर मिळाल्यास फराळ तयार करून देऊ.निर्मला गोडबोले, श्रीकृष्ण महिला बचत गट

तयार बुंदीच्या मागणीमध्ये घट खाद्यतेल आणि डालड्याच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे.  त्यामुळे व्यावसायिकांकडून मोतीचूर लाडू आणि बुंदी तयार करताना भेसळीची शक्यता असल्याने मोतीचूर लाडू आणि बुंदीच्या मागणीत यंदा घट झालेली आहे. शंकरपाळे, शेव, करंजी, अनारसे यांच्या मागणीत मात्र, वाढ झाली आहे.

यंदा दिवाळीच्या पाशवभूमीवर  फराळाचे दर 20 ते 50 रुपयांपर्यंत वाढले आहे. खाण्याचा  तेल आणि डालडा सह   सर्वच धान्यात किराणा सामानात वाढ झाल्याने भाव वधारले आहे.दिवाळी पाच-सहा दिवसांवर आहे. मात्र, फराळ खरेदीकडे अद्याप नागरिकांचा कल दिसून येत नाही. कोरोनामुळे यंदा फराळाला मागणी कमीच राहणार असल्याचे  व्यावसायिक विनोदसिंग राजपूत यांनी सांगितले.

टॅग्स :Diwaliदिवाळी