शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

पिकांवर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 00:26 IST

गत काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण आहे. सदर परिस्थितीमुळे सध्यास्थितीत सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकांवर काही प्रमाणात रसशोषक किडींचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देढगाळी वातावरणाचे दुष्परिणाम : शेतकऱ्यांच्या अडचणीत पडली भर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गत काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण आहे. सदर परिस्थितीमुळे सध्यास्थितीत सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकांवर काही प्रमाणात रसशोषक किडींचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. सध्याची ढगाळी वातावरणाची परिस्थिती आणखी आठवडाभर कायम राहिल्यास विविध पिकांवर सदर किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येण्याची शक्यता आहे. या परिस्थितीमुळे शेतकºयांच्या अडचणीत भर पडली असून शेतकºयांना कृषी विभागाच्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन करण्याची गरज आहे. शिवाय तशी मागणीही आहे.सध्याचे ढगाळी वातावरण पिकांवरील सदर किडींच्या प्रादुर्भावाला पोषक ठरत आहे. जिल्ह्यातील काही भागातील पिकांवर सध्या पांढरी माशी, तुडतुडे, चक्रभुंगा, मावा आदी किडींचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यंदाही उत्पादनात घट होईल अशी भीती शेतकºयांकडून वर्तविली जात आहे. सोयाबीन पिकावर चक्रभुंगा तर कपाशी पिकावर काही परिसरात तुडतुड्यांचा प्रादुर्भाव असल्याचे कृषी विभागाच्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. शेतकºयांनी संभाव्य नुकसान टाळण्यासाठी कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच उपाय-योजना करण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षांपासून शेतकºयांना निसर्गाच्या लहरीपणाचा फटकाच सहन करावा लागत आहे.मादी घालते सुमारे २०० अंडीजिल्ह्यातील काही भागातील कपाशी पिकांवर सध्या तुडतुडांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सदर किटकजन्य प्रजातीतील मादी ही सुमारे २०० अंडी घालते. ढगाळी वातावरण त्यांच्यासाठी पोषक ठरत असल्याने त्या अंडीतून मोठ्या प्रमाणात किटकही बाहेर पडतात. त्यामुळे पिकांवर मोठ्या प्रमाणात तुडतुड्यांचा प्रादुर्भाव दिसून येत असून कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच उपाययोजना करणे गरजेचे आहे.जिल्ह्यातील विविध पिकांवर सध्या चक्रभुंगा, मावा, तुडतुडे या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शेतकºयांनी त्याला घाबरून न जाता सदर प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी मोनोप्रोटोफॉसची फवारणी टाळत निंबोळी अर्काची फवारणी करावी. तसेच कृषी विभागाच्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच उपाययोजना करावी.- डॉ. विद्या मानकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.पुढेही ढगाळी वातावरण राहण्याची शक्यतासध्यास्थितीत भारतावरून मान्सून वारे वाहत आहेत. त्यामुळे वर्धा जिल्ह्यासह देशातील विविध भागात ढगाळी वातावरण आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. शिवाय पुढील आठवड्यात पाऊस येण्याचीही शक्यता असल्याचे हवामान खात्याच्या तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. शेतकºयांसह सर्वसामान्यांना मुसळधार पावसाची प्रतीक्षाच आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती