शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

पिकांवर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 00:26 IST

गत काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण आहे. सदर परिस्थितीमुळे सध्यास्थितीत सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकांवर काही प्रमाणात रसशोषक किडींचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देढगाळी वातावरणाचे दुष्परिणाम : शेतकऱ्यांच्या अडचणीत पडली भर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गत काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण आहे. सदर परिस्थितीमुळे सध्यास्थितीत सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकांवर काही प्रमाणात रसशोषक किडींचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. सध्याची ढगाळी वातावरणाची परिस्थिती आणखी आठवडाभर कायम राहिल्यास विविध पिकांवर सदर किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येण्याची शक्यता आहे. या परिस्थितीमुळे शेतकºयांच्या अडचणीत भर पडली असून शेतकºयांना कृषी विभागाच्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन करण्याची गरज आहे. शिवाय तशी मागणीही आहे.सध्याचे ढगाळी वातावरण पिकांवरील सदर किडींच्या प्रादुर्भावाला पोषक ठरत आहे. जिल्ह्यातील काही भागातील पिकांवर सध्या पांढरी माशी, तुडतुडे, चक्रभुंगा, मावा आदी किडींचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यंदाही उत्पादनात घट होईल अशी भीती शेतकºयांकडून वर्तविली जात आहे. सोयाबीन पिकावर चक्रभुंगा तर कपाशी पिकावर काही परिसरात तुडतुड्यांचा प्रादुर्भाव असल्याचे कृषी विभागाच्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. शेतकºयांनी संभाव्य नुकसान टाळण्यासाठी कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच उपाय-योजना करण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षांपासून शेतकºयांना निसर्गाच्या लहरीपणाचा फटकाच सहन करावा लागत आहे.मादी घालते सुमारे २०० अंडीजिल्ह्यातील काही भागातील कपाशी पिकांवर सध्या तुडतुडांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सदर किटकजन्य प्रजातीतील मादी ही सुमारे २०० अंडी घालते. ढगाळी वातावरण त्यांच्यासाठी पोषक ठरत असल्याने त्या अंडीतून मोठ्या प्रमाणात किटकही बाहेर पडतात. त्यामुळे पिकांवर मोठ्या प्रमाणात तुडतुड्यांचा प्रादुर्भाव दिसून येत असून कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच उपाययोजना करणे गरजेचे आहे.जिल्ह्यातील विविध पिकांवर सध्या चक्रभुंगा, मावा, तुडतुडे या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शेतकºयांनी त्याला घाबरून न जाता सदर प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी मोनोप्रोटोफॉसची फवारणी टाळत निंबोळी अर्काची फवारणी करावी. तसेच कृषी विभागाच्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच उपाययोजना करावी.- डॉ. विद्या मानकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.पुढेही ढगाळी वातावरण राहण्याची शक्यतासध्यास्थितीत भारतावरून मान्सून वारे वाहत आहेत. त्यामुळे वर्धा जिल्ह्यासह देशातील विविध भागात ढगाळी वातावरण आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. शिवाय पुढील आठवड्यात पाऊस येण्याचीही शक्यता असल्याचे हवामान खात्याच्या तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. शेतकºयांसह सर्वसामान्यांना मुसळधार पावसाची प्रतीक्षाच आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती