शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

पिकांवर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 00:26 IST

गत काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण आहे. सदर परिस्थितीमुळे सध्यास्थितीत सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकांवर काही प्रमाणात रसशोषक किडींचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देढगाळी वातावरणाचे दुष्परिणाम : शेतकऱ्यांच्या अडचणीत पडली भर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गत काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण आहे. सदर परिस्थितीमुळे सध्यास्थितीत सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकांवर काही प्रमाणात रसशोषक किडींचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. सध्याची ढगाळी वातावरणाची परिस्थिती आणखी आठवडाभर कायम राहिल्यास विविध पिकांवर सदर किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येण्याची शक्यता आहे. या परिस्थितीमुळे शेतकºयांच्या अडचणीत भर पडली असून शेतकºयांना कृषी विभागाच्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन करण्याची गरज आहे. शिवाय तशी मागणीही आहे.सध्याचे ढगाळी वातावरण पिकांवरील सदर किडींच्या प्रादुर्भावाला पोषक ठरत आहे. जिल्ह्यातील काही भागातील पिकांवर सध्या पांढरी माशी, तुडतुडे, चक्रभुंगा, मावा आदी किडींचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यंदाही उत्पादनात घट होईल अशी भीती शेतकºयांकडून वर्तविली जात आहे. सोयाबीन पिकावर चक्रभुंगा तर कपाशी पिकावर काही परिसरात तुडतुड्यांचा प्रादुर्भाव असल्याचे कृषी विभागाच्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. शेतकºयांनी संभाव्य नुकसान टाळण्यासाठी कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच उपाय-योजना करण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षांपासून शेतकºयांना निसर्गाच्या लहरीपणाचा फटकाच सहन करावा लागत आहे.मादी घालते सुमारे २०० अंडीजिल्ह्यातील काही भागातील कपाशी पिकांवर सध्या तुडतुडांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सदर किटकजन्य प्रजातीतील मादी ही सुमारे २०० अंडी घालते. ढगाळी वातावरण त्यांच्यासाठी पोषक ठरत असल्याने त्या अंडीतून मोठ्या प्रमाणात किटकही बाहेर पडतात. त्यामुळे पिकांवर मोठ्या प्रमाणात तुडतुड्यांचा प्रादुर्भाव दिसून येत असून कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच उपाययोजना करणे गरजेचे आहे.जिल्ह्यातील विविध पिकांवर सध्या चक्रभुंगा, मावा, तुडतुडे या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शेतकºयांनी त्याला घाबरून न जाता सदर प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी मोनोप्रोटोफॉसची फवारणी टाळत निंबोळी अर्काची फवारणी करावी. तसेच कृषी विभागाच्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच उपाययोजना करावी.- डॉ. विद्या मानकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.पुढेही ढगाळी वातावरण राहण्याची शक्यतासध्यास्थितीत भारतावरून मान्सून वारे वाहत आहेत. त्यामुळे वर्धा जिल्ह्यासह देशातील विविध भागात ढगाळी वातावरण आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. शिवाय पुढील आठवड्यात पाऊस येण्याचीही शक्यता असल्याचे हवामान खात्याच्या तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. शेतकºयांसह सर्वसामान्यांना मुसळधार पावसाची प्रतीक्षाच आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती