शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

वर्ध्यात उद्योगचक्र गतिमान; १६० उद्योगांना मिळाली चालना, तरुणांनी अर्ज करावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 18:10 IST

गतवर्षात उद्योग वाढले : गुंतवणुकीतही झाली मोठी भर

चैतन्य जोशी लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत २०२४ मध्ये स्टार्टअप उद्योगांना चालना मिळाली आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील तरुणांनी यात सहभागी होत १६० स्टार्टअप उद्योग सुरू केले आहेत. यातून ७ कोटी ४९ लाख रुपयांची गुंतवणूक झाली आहे, तर यात सहभागी झालेल्या नवउद्योजकांना या योजनेच्या माध्यमातून अनुदानही मिळाले आहे.

जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीत मोठे उद्योग येण्यास तयार नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली असताना तरुण, नवउद्योजकांनी मात्र, स्टार्टअप उद्योगांची कास धरली आहे. छोट्या मोठ्चा व्यवसाय, उद्योगांच्या माध्यमातून सक्षम होण्याचा प्रयत्न तरुण उद्योजक करत आहे. सध्या जिल्ह्यातील विविध औद्योगिक वसाहतीत विस्तारासाठी जागेची अडचण आहे. ज्या भागात मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहे, तेथे दळणवळण, पाणी आदी सुविध उपलब्ध होण्यात अडचणी आहेत. त्यामुळे जिल्ह्यात गेल्या दहा वर्षात मोठा उद्योग आलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. 

मंजुरी देण्यास बँकांची टाळाटाळ जिल्हा उद्योग केंद्राकडे २ हजार २१५ नव उद्योजकांनी ऑनलाइन अर्ज केले होते. यापैकी १ हजार ३९४ अर्ज मंजुरीसाठी विविध बँकांकडे पाठविण्यात आले होते. बँकांनी यापैकी १६० उद्योग अर्जाना मंजुरी दिली. तर ६८१ अर्ज 'रिजेक्ट' केले. आर्थिक वर्ष संपण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी असतानाही प्रलंबित असलेल्या ७१३ अर्जाना मंजुरी देण्यासाठी बँकांकडून टाळाटाळ केली जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे बँकांन देखील हात आखडता न घेता ढिला सोडण्याची गरज आहे.

या व्यवसायासाठी मिळते कर्ज... जिल्हा उद्योग केंद्राकडून उत्पादन, सेवा उद्योग, कृषी पूरक व्यवसाय, कृषीवर आधारीत उद्योग, ई वाहतूक व त्यावरील आधारीत व्यवसाय, फिरते विक्री केंद्र तसेच खाद्यान्न केंद्रा आदी उद्योग व्यवसायासाठी अनुदान दिले जाते. तीन वर्षापर्यंत उद्योग सुरु असल्यास अनुदान मिळू शकते.

६०० उद्योग सुरु करण्याचे 'टार्गेट' मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात गतवर्षी जिल्हा उद्योग केंद्राला ६०० उद्योग सुरू करण्याचे टार्गेट होते. आतापर्यंत जिल्हा उद्योग केंद्राने जिल्ह्यातील १६० उद्योगांना मान्यता दिली आहे. यासाठी लाखोंचे अनुदानही दिले आहे.

कुटीर उद्योगाला प्रोत्साहन कुटीर उद्योगाला चालना देण्यासाठीही जिल्हा उद्योग केंद्राकडून प्रयत्न होत आहेत. घरगुती शेती उत्पन्न व शेती प्रक्रिया उद्योगांचा यात समावेश आहे. जिल्हा उद्योग केंद्राकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, त्यामुळे नव उद्योजकांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे.

स्वयंपूर्णतेकडे वाटचाल तरुण, नव उद्योजकांनी विविध व्यवसायांचे प्रशिक्षण घेऊन आपला स्टार्टअप उद्योग सुरू करून स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरू केली असल्याचे आशादायक चित्र निर्माण झाले आहे. या स्टार्टअपच्या माध्यमातून ७ कोटी ४९ लाख रुपयांची गुंतवणूक झाली आहे. त्यामुळे या स्टार्टअपच्या माध्यमातून जिल्ह्यात छोट्या, मोठ्या उद्योगांना चालना मिळाली आहे, यातून रोजगार निर्मितीलाही चालना मिळाली आहे.

टॅग्स :wardha-acवर्धा