शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
6
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
7
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
8
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
9
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
10
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
11
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
12
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
13
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
14
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
15
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
16
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
17
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
18
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
19
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
20
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात

यशोदेच्या पुनरूज्जीवनामुळे जल पातळीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 00:14 IST

जलयुक्त शिवार अंतर्गत कमलनयन बजाज फाऊंडेशन व टाटा ट्रस्टच्यावतीने यशोदा नदी खोरे पुनरूजीवन प्रकल्प उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमादरम्यान जलसंवर्धनाचे काम योग्य पद्धतीने झाल्याने भूगर्भातील जलपातळीत वाढ झाली असून याचा लाभ सध्या शेतकऱ्यांना मिळत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिलासा : जलयुक्त शिवार योजनेतून झाले जलसंवर्धनाचे प्रभावी काम

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जा.) : जलयुक्त शिवार अंतर्गत कमलनयन बजाज फाऊंडेशन व टाटा ट्रस्टच्यावतीने यशोदा नदी खोरे पुनरूजीवन प्रकल्प उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमादरम्यान जलसंवर्धनाचे काम योग्य पद्धतीने झाल्याने भूगर्भातील जलपातळीत वाढ झाली असून याचा लाभ सध्या शेतकऱ्यांना मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना हे काम दिलासा देणारे ठरले असे म्हटल्यास वावगे ठरू नये.यशोदा नदी व इतरही नदी नाल्यांचे जलस्त्रोत बंद झाले होते. नदी पात्राला काटेरी तथा बेशरमच्या झाडांच्या झुडपांनी वेढले होते. यामुळे नदी पात्र कोरडी झाली होती. शिवाय पाणी साठवण क्षमताही कमी झाली होती. याचाच परिणाम परिसरातील विहिरींवर होत भूगर्भातील जलपातळीत घट झाली होती. शेतात विहीर असूनही बहूदा शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणीच उपलब्ध राहत नव्हते. त्यातच या भागातील नदी व नाल्यामधील गाळ काढून त्यांची पाणी साठवण क्षमता वाढण्याचे काम जलयुक्त शिवार योजनेच्या अंतर्गत हाती घेण्यात आले. जलसंवर्धन व पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन हा हेतून केंद्रस्थानी ठेवून युद्धपातळीवर नियोजनबद्ध काम करण्यात आले. याचा लाभ सध्या चिकणी, जामणी, निमगाव, पढेगाव शिवारात दिसून येत आहे. सदर गावांमध्ये जलयुक्त शिवार योजनेतून कमलनयन बजाज फाऊंडेशन तथा टाटा ट्रस्ट यांच्या सहकार्याने नदीचे पात्राचे खोलीकरण, रूंदीकरण व सरळीकरण करण्यात आले. यामुळे त्यांची पाणी साठवण क्षमता वाढली आहे. याचा लाभ शेतकºयांसह पशुपालकांना होत आहे.

टॅग्स :Waterपाणी