शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

यशोदेच्या पुनरूज्जीवनामुळे जल पातळीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 00:14 IST

जलयुक्त शिवार अंतर्गत कमलनयन बजाज फाऊंडेशन व टाटा ट्रस्टच्यावतीने यशोदा नदी खोरे पुनरूजीवन प्रकल्प उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमादरम्यान जलसंवर्धनाचे काम योग्य पद्धतीने झाल्याने भूगर्भातील जलपातळीत वाढ झाली असून याचा लाभ सध्या शेतकऱ्यांना मिळत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिलासा : जलयुक्त शिवार योजनेतून झाले जलसंवर्धनाचे प्रभावी काम

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जा.) : जलयुक्त शिवार अंतर्गत कमलनयन बजाज फाऊंडेशन व टाटा ट्रस्टच्यावतीने यशोदा नदी खोरे पुनरूजीवन प्रकल्प उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमादरम्यान जलसंवर्धनाचे काम योग्य पद्धतीने झाल्याने भूगर्भातील जलपातळीत वाढ झाली असून याचा लाभ सध्या शेतकऱ्यांना मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना हे काम दिलासा देणारे ठरले असे म्हटल्यास वावगे ठरू नये.यशोदा नदी व इतरही नदी नाल्यांचे जलस्त्रोत बंद झाले होते. नदी पात्राला काटेरी तथा बेशरमच्या झाडांच्या झुडपांनी वेढले होते. यामुळे नदी पात्र कोरडी झाली होती. शिवाय पाणी साठवण क्षमताही कमी झाली होती. याचाच परिणाम परिसरातील विहिरींवर होत भूगर्भातील जलपातळीत घट झाली होती. शेतात विहीर असूनही बहूदा शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणीच उपलब्ध राहत नव्हते. त्यातच या भागातील नदी व नाल्यामधील गाळ काढून त्यांची पाणी साठवण क्षमता वाढण्याचे काम जलयुक्त शिवार योजनेच्या अंतर्गत हाती घेण्यात आले. जलसंवर्धन व पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन हा हेतून केंद्रस्थानी ठेवून युद्धपातळीवर नियोजनबद्ध काम करण्यात आले. याचा लाभ सध्या चिकणी, जामणी, निमगाव, पढेगाव शिवारात दिसून येत आहे. सदर गावांमध्ये जलयुक्त शिवार योजनेतून कमलनयन बजाज फाऊंडेशन तथा टाटा ट्रस्ट यांच्या सहकार्याने नदीचे पात्राचे खोलीकरण, रूंदीकरण व सरळीकरण करण्यात आले. यामुळे त्यांची पाणी साठवण क्षमता वाढली आहे. याचा लाभ शेतकºयांसह पशुपालकांना होत आहे.

टॅग्स :Waterपाणी