कोतवाल नोंदी जीर्ण झाल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय

By Admin | Updated: June 18, 2014 00:21 IST2014-06-18T00:21:31+5:302014-06-18T00:21:31+5:30

येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावे लागत असल्याने जात प्रमाणपत्र तसेच वंशावळीची माहिती देणारे प्रमाणपत्र सादर करावे लागते, याकरिता विद्यार्थ्यांची

Inconvenience to the students due to the collapse of the records | कोतवाल नोंदी जीर्ण झाल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय

कोतवाल नोंदी जीर्ण झाल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय

कामे अपूर्ण : प्रमाणपत्रआभावी विद्यार्थ्यांचे नुकसान
पिंपळखुटा : येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावे लागत असल्याने जात प्रमाणपत्र तसेच वंशावळीची माहिती देणारे प्रमाणपत्र सादर करावे लागते, याकरिता विद्यार्थ्यांची तहसील कार्यालयात गर्दी होत आहे, परंतु या प्रमाणपत्रांच्या नोंदीच मिळत नसल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहे.
विविध सदर प्रमाणपत्राकरिता कोतवाल वहितील नोंदणीनुसार जातीचे प्रमाणपत्र मिळत असल्याने कोतवाली नोंदी बघाव्या लागतात. पण शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांच्या कोतवाली नोंदणीची कागदे जीर्ण झाली आहे. त्यामुळे कोतवाली नोंदीच्या नकला मिळणे दुरापास्त झाले आहे. या कारणाने अनेकांचे शैक्षणिक नुकसान होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. याकरिता शासनाने पर्यायी कागदपत्रावरुन जात प्रमाणपत्र द्यावे अशी मागणी सध्या पालक करीत आहे.
शेकडो वर्षातील वंशावळी तसेच जाती कोणत्या याबाबतच्या नोंदी कोतवालांनी केल्या आहे. सदर नोंदीच्या आधारे जात तसेच वंशावळी प्रमाणपत्र तहसील कार्यालयाकडून दिल्या जात असते. परंतु आर्वी तालुक्यातील कोतवाली नोंद वहीची जिर्णावस्था झाल्याने अनेकांच्या नोंदी गहाळ झाली आहे.
कोतवाल नोंदीअभावी दाखले मिळत नाही. याकरिता महसुल प्रशासनाने योग्य निर्णय घेवून जीर्ण झालेल्या नोंदी संगणीकृत करुन अद्ययावत करणे गरजेचे आहे. चातु वर्षात विद्यार्थ्यांना वंशावळी व जात प्रमाणपत्रापासून वंचित ठेवू नये अन्यथा विद्यार्थ्यांचे नुकसान होवू शकते याकरिता शासनाने पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी जोर धरत आहे. (वार्ताहर)

Web Title: Inconvenience to the students due to the collapse of the records

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.