शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ११ वाजेपर्यंत कुठे किती झाले मतदान?
2
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा
3
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
4
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
5
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
6
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
7
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
8
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
9
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास
10
Som Pradosh 2024: नशिबाची साथ मिळत नसेल तर आज सोम प्रदोष व्रत करा,भाग्य बदलेल; वाचा व्रतविधी!
11
Nrusinha Jayanti 2024: २१ मे नृसिंह जयंती: भगवान विष्णुंच्या नृसिंह अवतारामागे दडलेले रहस्य जाणून घ्या!
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
13
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
14
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
15
ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 
16
Maharashtra Lok Sabha Election 2024 राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
17
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
18
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
19
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
20
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात

बौद्ध धम्म परिषदेचे थाटात उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 11:55 PM

येथील डॉ. आत्मारामजी उपाख्य बाबूजी जवादे स्मृती परिसरामध्ये द्विदिवसीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले असून शनिवारी उद्घाटनपर कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात धम्मध्वज ध्वजारोहण व बुद्ध वंदना भदंत सत्यानंद महाथेरो येणाळा, अरण्यवास यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देविविध विषयांवर चर्चा : संघटनात्मक कार्यावर देणार भर

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : येथील डॉ. आत्मारामजी उपाख्य बाबूजी जवादे स्मृती परिसरामध्ये द्विदिवसीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले असून शनिवारी उद्घाटनपर कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात धम्मध्वज ध्वजारोहण व बुद्ध वंदना भदंत सत्यानंद महाथेरो येणाळा, अरण्यवास यांच्या हस्ते करण्यात आले.व्यासपीठावर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक आंबेडकर, माजी उपजिल्हाधिकारी अशोक गेडाम, शिक्षण महर्षी जयानंद खडसे, प्राचार्य आर. के. पाटील, उपप्राचार्य गुडधे, पर्यवेक्षक दिनेश वाघ, सुधीर राऊत, बन्सोड, देवतळे, रुईकर आदींची उपस्थिती होती.त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शहरातील पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांनी बुद्धवंदना व नृत्य सादर केले. धम्म परिषदेचे उद्घाटन अनिल जवादे यांनी केले. उपस्थित पाहुण्यांचे स्वागत माजी प्राचार्य गोरख भगत यांच्या हस्ते करण्यात आले. सर्वप्रथम गोरख भगत यांनी दैनंदिन जीवनातील अनुभव सांगितले. तसेच डॉ. आंबेडकर यांच्या विचारातून स्थापन केलेल्या समता सैनिक दल, आरपीआयची आजची दिशा आणि दशा या विषयावर माहिती दिली.मार्गदर्शन करताना अनिल जवादे यांनी डॉ. आंबेडकर यांनी बौद्ध दिक्षा घेतलेल्या नागपूरच्या दीक्षा भूमीला बौध्द धम्मपिठ स्थापनेत बौद्ध संघाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रमातील विशेष अतिथी सेवानिवृत्त सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांनी बौद्धधम्मा पुढील आव्हाने यावर माहिती दिली. शिवाय पंचशीलाचे आचरण करावे स्पष्ट केले. प्राचार्य शेंडे यांनी एकविसाव्या शतकात संपूर्ण भारत बौद्ध मय होईल, असे सांगितले. सत्कारमूर्ती राजरत्न आंबेडकर यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, आम्ही दलित व नवबौद्ध नसून आम्ही केवळ बौद्ध आहोत, असे सांगत विषयाला अनुसरून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष भदंत आनंद महाथेरो (आग्रा) यांनी राजकीय पक्ष स्वार्थासाठी बौद्ध बांधवांचा कसा वापर करतात हे स्पष्ट केले. सांकृतिक कार्यक्रमाने धम्म परिषदेच्या पहिल्या दिवसाचा समारोप झाला. या धम्म परिषदेला शहरासह परिसरातील बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिषदेचा समारोप रविवारी होणार आहे.