शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

वर्ध्यात १७७ 'आपले सरकार सेवा केंद्रा'ला लावले टाळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 17:22 IST

कामात अनियमितता भोवली : एकही ट्रान्झेक्शन न झालेल्या आयडी केल्या बंद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सर्वसामान्यांना विविध दाखल्यांकरिता तालुक्याच्या ठिकाणी जाऊन कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत; त्यांचा वेळ आणि पैसा वाचावा आणि गावागावांतच सेवा उपलब्ध व्हावी, याकरिता शासनाने 'आपले सरकार सेवा केंद्र' सुरू केले होते; परंतु काही केंद्र संचालकांनी या सेवेला हरताळ फासून दुकानदारी चालविल्याचे निदर्शनास येताच प्रशासनाने तपासणी मोहीम आरंभली. तपासणीअंती अनियमितता आढळून आल्याने तिन्ही उपविभागांतील एकूण १७७ 'आपले सरकार सेवा केंद्रां'चे परवाने रद्द करून त्यांना कायमचे टाळे ठोकले आहेत.

जिल्ह्यातील तिन्ही उपविभागांतील आठही तालुक्यांमध्ये शासनाकडून टप्प्याटप्प्यांत ८३० आपले सरकार सेवा केंद्रे सुरू केली होती. या केंद्रांतून विविध प्रमाणपत्रे व दाखले उपलब्ध करून दिले जातात. विशेषतः कोणत्या दाखल्याकरिता किती कालावधी व किती रक्कम आकारली जावी, याचीही नियमावली शासनाकडून ठरवून दिली होती; परंतु बहुतांश आपले सरकार सेवा केंद्र संचालकांनी या केंद्रांच्या माध्यमातून आपली दुकानदारी चालविली होती. अवाच्या सव्वा शुल्क आकारणे, तसेच नियमबाह्य प्रमाणपत्र देण्याचे प्रकारही जिल्ह्यात उघडकीस आले. गेल्यावर्षी या गंभीर बाबी चव्हाट्यावर आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तिन्ही उपविभागीय अधिकाऱ्यांना त्यांच्या अधिकार क्षेत्रातील आपले सरकार सेवा केंद्राची तपासणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार उपविभागीय अधिकाऱ्यांनी तहसीलदारांना सूचना करून तपासणी करण्यात आली. अहवाल प्राप्त झाल्यानंतर आपले सरकार सेवा केंद्र संचालकांची सुनावणी घेतली. त्यानंतर १७७ केंद्रांचे परवाने रद्द केले.

गरिबांचा वेळ, पैसा वाचण्यासाठी निर्मितीशासनाने जवळपास प्रशासनाच्या सर्व सुविधा ऑनलाइन केली आहे. यात जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासह लहान-मोठ्या कामासाठी उपयोगात येणाऱ्या सर्व कागदपत्रांचा समावेश आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजविण्याची गरज राहिली नाही. यामुळे वेळ आणि पैसा दोन्हींची बचत होते आहे.

या सुविधा देणे अपेक्षितआपले सेवा केंद्र सुरू करण्यात आल्यानंतर सर्वसामान्यांना उत्पन्नाचा दाखला, अधिवास, शपथपत्र, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, अल्पभूधारक शेतकरी असल्याचे प्रतिज्ञापत्र, अकृषक परवाना, वारस प्रमाणपत्र, वंशावळ प्रमाणत्र देणे अपेक्षित आहे.

तालुकानिहाय केंद्रउपविभाग                           केंद्रांची संख्या वर्धा                                           ७४आर्वी                                          २८हिंगणघाट                                    ७५

रद्द केलेले परवानेतालुका                      केंद्र                      रद्द केलेले केंद्रआर्वी                            ७९                              १३आष्टी                            ४९                              ०२कारंजा                         ५२                               १३देवळी                         १०६                              १७सेलू                             १०१                              २७वर्धा                             १९८                             ३०हिंगणघाट                     १४३                             ३४समुद्रपूर                       १०२                             ४१

"जिल्ह्यात ज्या आपले सरकार केंद्र संचालकांनी आयडी घेतल्यापासून एकही ट्रान्झेक्शन केलेले नाही अशा १७७ केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आलेआहेत. यामुळे नवीन केंद्र संचालकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे."- राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी, वर्धा.

आयडी घेतल्यापासून एकही ट्रॅन्झक्शन नाही; परवाना रद्दआयडी घेतल्यापासून एकही ट्रान्झेक्शन नाही गावातील नागरिकांना प्रशाकीय सुविधा मिळाव्यात, यासाठी जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने ८३० केंद्र सुरू करण्यात आले होते. मात्र, यातील तब्बल १७७ आपले सेवा केंद्राच्या आयडीवरून एकही ट्रान्झेक्शन झाले नसल्याने या आयडी बंद करण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :wardha-acवर्धा