शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

भाजप निरीक्षकांनी घेतली झाडाझडती; आमदारांशी ‘वन बाय वन’ चर्चा, अंतर्गत कुरघोडी उघड  

By रवींद्र चांदेकर | Updated: June 22, 2024 16:40 IST

पराभवाची कारणमीमांसा, पदाधिकाऱ्यांची कानउघडणी.

रवींद्र चांदेकर, वर्धा : लोकसभेत झालेला पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. या पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी पक्षाने विधान परिषद सदस्य प्रवीण दटके यांची पक्ष निरीक्षक म्हणून नियुक्ती केली. त्यांनी शनिवारी जिल्ह्यातील पक्षाचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांशी ‘वन बाय वन’ चर्चा करून झाडाझडती घेतली. यात पक्षातील अंतर्गत कुरघोडीही उघड झाली.

लोकसभेतील पराभवाची भाजपने गंभीर दखल घेतली आहे. भाजपचे उमेदवार रामदास तडस यांचा शरद पवार गटाच्या नवख्या उमेदवाराने पराभव केला. त्यामुळे हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागला. सुमारे वर्षभरापासून बूथ बांधणी करूनही पराभव पत्करावा लागल्याने भाजपाचे अंतर्गत नियोजन कोलमडल्याचे उघड झाले आहे. बूथ प्रमुख, शक्ती प्रमुख आणि जिल्हा पदाधिकारी लोकसभेच्या परीक्षेत फेल झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळेच पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी पक्षाने आमदार प्रवीण दटके यांना जिल्ह्यात पाठविले आहे. आमदार दटके यांनी शनिवारी आर्वी मार्गावरील एका ‘पॅलेस’मध्ये आमदार आणि पदाधिकाऱ्यांशी ‘वन बाय वन’ चर्चा करून पराभवाची कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

सर्वप्रथम बैठकीत केंद्रात नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार स्थापन झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला. त्यानंतर आमदार दटके यांनी आमदारांना एक-एक बोलावून चर्चा केली. वर्धेचे आमदार डॉ. पंकज भोयर आणि आर्वीचे दादाराव केचे यांनी त्यांच्यासमोर आपली भूमिका मांडली. 

हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार एका अंत्ययात्रेत असल्याने उशिरा पोहोचले होते. आमदारांनी आपापल्यापरीने पराभवाची कारणे सांगितली. त्यानंतर जिल्हा पदाधिकाऱ्यांकडून ‘वन बाय वन’ पराभवाची कारणे जाणून घेण्यात आली. यात काही आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षातील अंतर्गत नियोजनावर बोट ठेवल्याचे सांगितले जाते. पक्ष निरीक्षक आमदार प्रवीण दटके यांनी चर्चेत पदाधिकाऱ्यांची कानउघडणी केल्याचे सांगितले जात आहे. निरीक्षक झाडाझडती घेत असताना पक्षातील अंतर्गत कुरघाेडी उघड झाल्याचे सांगितले जाते.

जिल्ह्यात ‘भाजप’चे संघटन मजबूत असताना पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला. विशेष म्हणजे, अनेक पदाधिकाऱ्यांच्या गावातच पक्षाच्या उमेदवाराला कमी मते मिळाली. खुद्द जिल्हाध्यक्षांच्या गावातही पक्षाला साजेशी कामगिरी करता आली नाही. अनेक मंडळ प्रमुख, बूथ प्रमुख, शक्ती प्रमुखांच्या गावातही भाजप उमेदवाराला अपेक्षित मते पडली नाही. त्यामुळे पराभव पत्करावा लागला. या सर्वांचा आढावा घेण्यासाठीच निरीक्षक म्हणून आमदार प्रवीण दटके यांना जिल्ह्यात पाठविण्यात आले. त्यानुसार त्यांनी आढावा घेऊन पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्याचे सांगितले जाते.

नियोजनशून्यतेचा पक्षाला फटका-

लोकसभा निवडणुकीत पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि लोकसभा प्रमुख यांच्या नियोजनशून्यतेचा फटका बसला. त्यामुळे उमेदवाराचा पराभव झाल्याचे मत एका आमदारांनी पक्ष निरीक्षकांसमोर मांडल्याची माहिती आहे. त्यांच्या या दाव्याने निरीक्षकही आश्चर्यचकीत झाले. काही पदाधिकाऱ्यांनीही पराभवामागील कारणे सांगताना पक्षातील ‘असमन्वया’चा मुद्दा उपस्थित केल्याचे सांगितले जाते. ही चर्चा ‘वन बाय वन’ असल्याने काही पदाधिकाऱ्यांनी अनेक बाबींवर अचूक ‘बोट’ ठेवले. यातून पक्षात सर्व ‘ऑलवेल’ नसल्याचे स्पष्ट झाले.

हिंगणघाट, आर्वीत मतांचा मोठा खड्डा लोकसभा निवडणुकीत भाजपला हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातून मोठी आघाडी मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, ही अपेक्षा फोल ठरली आहे. या विधानसभा मतदारसंघात भाजप २० हजार ५५ मतांनी माघारला. आर्वीतही भाजप उमेदवार १९ हजार ९५५ मतांनी पिछाडीवर राहिले. भाजप उमेदवाराचा गृह मतदारसंघ असलेल्या देवळीत तर ते चक्क तब्बल ३२ हजार २२ मतांनी माघारले. देवळी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार असल्याने ही बाब गौण समजली जात आहे. केवळ वर्धा विधानसभेत भाजप उमेदवाराच्या मतांमध्ये केवळ नऊ हजार ६६९ मतांचा अल्पसा खड्डा पडला. या सर्व बाबींचा पक्ष निरीक्षकांनी आढावा घेतला. त्यावरून आता पुढील विधानसभेची ‘रणनीती’ आखली जाणार असल्याची माहिती आहे.

टॅग्स :wardha-acवर्धाlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालBJPभाजपा