शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

तालुक्यात जेथे पूर परिस्थिती, तेथे तहसीलदारांची उपस्थिती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2022 05:00 IST

कोळपे यांनी स्वत: या पुराच्या पाण्यात उतरून बचाव पथकाच्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देऊन पुरात अडकलेल्या सर्व मजुरांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर पवनूर येथील वनराई बंधारा फुटल्याने पवनुरसह तीन गावांत पाणी शिरले होते. याची माहिती तहसीलदार कोळपे यांना सायंकाळी मिळताच कोणताही विलंब न करता ते तातडीने सायंकाळीच गावात पोहोचून त्यांनी नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम सुरू केले. 

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सर्वत्र हाहाकार उडविल्याने प्रशासनाचीही चांगलीच धावपळ उडाली आहे. कोणत्या गावात, शेतात, घरात पाणी शिरले तर मदतीकरिता महसूल विभागाकडे बोट दाखविले जाते म्हणूनच वर्धा तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याची माहिती मिळताच तहसीलदार रमेश कोळपे यांनी लागलीच उपस्थित राहून आपले कर्तव्य बजावले. त्यांनी तीन घटनांमध्ये स्वत: पुढाकार घेत काहींचे प्राण वाचविल्याने ‘हे तहसीलदार नाही तर खुद्द देवदूतच’ अशा प्रतिक्रियाही घटनास्थळी उपस्थितांनी व्यक्त केल्यात.अधिकारी हे लोकसेवक असून त्यांच्या कामातूनच ते लोकप्रिय होत असतात. अधिकाऱ्यांनी कर्तव्यदक्षतेची चुणूक दाखविली तर नागरिकही त्यांना डोक्यावरच घेतात. असाच प्रकार वर्ध्यातील तहसीलदार रमेश कोळपे यांच्याबाबत घडला आहे. वर्धा तालुक्यातील कोसळधारमुळे देवळी-पुलगाव मार्गावरील धोत्रा शिवारातील नाल्याला पूर आल्याने शेतात कामानिमित्त गेलेले दहा ते पंधरा मजूर शेतातील बांधावर अडकून पडले होते. याची माहिती मिळताच तहसीलदार रमेश कोळपे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे व उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप आपल्या चमूसह घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी कोळपे यांनी स्वत: या पुराच्या पाण्यात उतरून बचाव पथकाच्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देऊन पुरात अडकलेल्या सर्व मजुरांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर पवनूर येथील वनराई बंधारा फुटल्याने पवनुरसह तीन गावांत पाणी शिरले होते. याची माहिती तहसीलदार कोळपे यांना सायंकाळी मिळताच कोणताही विलंब न करता ते तातडीने सायंकाळीच गावात पोहोचून त्यांनी नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम सुरू केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळपासून त्या गावात उपस्थित राहून पुढील कार्यवाही केली. त्यानंतर दोन दिवसांतच पवनार येथील धामनदीपात्रात एक युवक अडकल्याने तेथेही ते आपल्या कर्मचाऱ्यांसह दाखल झाले. याही ठिकाणी त्यांनी आपल्या कर्तव्यासह धाडसी वृत्तीचा परिचय सर्वांना करून दिला. स्वत: नदीपात्रात उतरुन त्यांनी युवकाला सुखरुप बाहेर काढण्याची मोहीम फत्ते केली. एका आठवड्यात पूरपरिस्थितीमुळे एका पाठोपाठ तीन घटना घडल्या या तिन्ही घटनेमध्ये वर्ध्याचे तहसीलदार रमेश कोळपे कर्तव्यदक्षतेने खरचं ‘हिरो’ ठरले आहे.

उपविभागीय अधिकाऱ्यांचीही साथ- वर्धा हे जिल्ह्याचे मुख्यालय असल्याने येथील प्रशासनाला नेहमीच अलर्ट राहावे लागते. त्यामुळे येथील उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांच्या नेतृत्वात वर्धा, देवळी व सेलू या तिन्ही तालुक्यात आपत्ती काळात विशेष  कर्तव्य बजावले जात असल्याचे आतापर्यंतच्या कार्यपद्धतीवरुन दिसून येत आहे. कोरोनाकाळ असो की आता पूरपरिस्थिती उपविभागीय अधिकारी बगळे नेहमीच तिन्ही तालुक्यावर लक्ष ठेवून असतात. या आठवड्यात तालुक्यात तीन ठिकाणी पूर परिस्थितीमुळे आपत्ती निर्माण झाल्याने तहसीलदार रमेश कोळपे यांच्या पाठीशी तेही खंबीरपणे उभे राहिले आहे. इतकेच नाही धोत्रा येथील बचाव कार्यात तेही आघाडीवर होते. त्यांनीही पाण्यात उतरुन उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप यांच्या सहकार्याने खिंड लढविली.

 

टॅग्स :floodपूरTahasildarतहसीलदार