शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यात जेथे पूर परिस्थिती, तेथे तहसीलदारांची उपस्थिती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2022 05:00 IST

कोळपे यांनी स्वत: या पुराच्या पाण्यात उतरून बचाव पथकाच्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देऊन पुरात अडकलेल्या सर्व मजुरांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर पवनूर येथील वनराई बंधारा फुटल्याने पवनुरसह तीन गावांत पाणी शिरले होते. याची माहिती तहसीलदार कोळपे यांना सायंकाळी मिळताच कोणताही विलंब न करता ते तातडीने सायंकाळीच गावात पोहोचून त्यांनी नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम सुरू केले. 

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सर्वत्र हाहाकार उडविल्याने प्रशासनाचीही चांगलीच धावपळ उडाली आहे. कोणत्या गावात, शेतात, घरात पाणी शिरले तर मदतीकरिता महसूल विभागाकडे बोट दाखविले जाते म्हणूनच वर्धा तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याची माहिती मिळताच तहसीलदार रमेश कोळपे यांनी लागलीच उपस्थित राहून आपले कर्तव्य बजावले. त्यांनी तीन घटनांमध्ये स्वत: पुढाकार घेत काहींचे प्राण वाचविल्याने ‘हे तहसीलदार नाही तर खुद्द देवदूतच’ अशा प्रतिक्रियाही घटनास्थळी उपस्थितांनी व्यक्त केल्यात.अधिकारी हे लोकसेवक असून त्यांच्या कामातूनच ते लोकप्रिय होत असतात. अधिकाऱ्यांनी कर्तव्यदक्षतेची चुणूक दाखविली तर नागरिकही त्यांना डोक्यावरच घेतात. असाच प्रकार वर्ध्यातील तहसीलदार रमेश कोळपे यांच्याबाबत घडला आहे. वर्धा तालुक्यातील कोसळधारमुळे देवळी-पुलगाव मार्गावरील धोत्रा शिवारातील नाल्याला पूर आल्याने शेतात कामानिमित्त गेलेले दहा ते पंधरा मजूर शेतातील बांधावर अडकून पडले होते. याची माहिती मिळताच तहसीलदार रमेश कोळपे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे व उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप आपल्या चमूसह घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी कोळपे यांनी स्वत: या पुराच्या पाण्यात उतरून बचाव पथकाच्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देऊन पुरात अडकलेल्या सर्व मजुरांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर पवनूर येथील वनराई बंधारा फुटल्याने पवनुरसह तीन गावांत पाणी शिरले होते. याची माहिती तहसीलदार कोळपे यांना सायंकाळी मिळताच कोणताही विलंब न करता ते तातडीने सायंकाळीच गावात पोहोचून त्यांनी नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम सुरू केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळपासून त्या गावात उपस्थित राहून पुढील कार्यवाही केली. त्यानंतर दोन दिवसांतच पवनार येथील धामनदीपात्रात एक युवक अडकल्याने तेथेही ते आपल्या कर्मचाऱ्यांसह दाखल झाले. याही ठिकाणी त्यांनी आपल्या कर्तव्यासह धाडसी वृत्तीचा परिचय सर्वांना करून दिला. स्वत: नदीपात्रात उतरुन त्यांनी युवकाला सुखरुप बाहेर काढण्याची मोहीम फत्ते केली. एका आठवड्यात पूरपरिस्थितीमुळे एका पाठोपाठ तीन घटना घडल्या या तिन्ही घटनेमध्ये वर्ध्याचे तहसीलदार रमेश कोळपे कर्तव्यदक्षतेने खरचं ‘हिरो’ ठरले आहे.

उपविभागीय अधिकाऱ्यांचीही साथ- वर्धा हे जिल्ह्याचे मुख्यालय असल्याने येथील प्रशासनाला नेहमीच अलर्ट राहावे लागते. त्यामुळे येथील उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांच्या नेतृत्वात वर्धा, देवळी व सेलू या तिन्ही तालुक्यात आपत्ती काळात विशेष  कर्तव्य बजावले जात असल्याचे आतापर्यंतच्या कार्यपद्धतीवरुन दिसून येत आहे. कोरोनाकाळ असो की आता पूरपरिस्थिती उपविभागीय अधिकारी बगळे नेहमीच तिन्ही तालुक्यावर लक्ष ठेवून असतात. या आठवड्यात तालुक्यात तीन ठिकाणी पूर परिस्थितीमुळे आपत्ती निर्माण झाल्याने तहसीलदार रमेश कोळपे यांच्या पाठीशी तेही खंबीरपणे उभे राहिले आहे. इतकेच नाही धोत्रा येथील बचाव कार्यात तेही आघाडीवर होते. त्यांनीही पाण्यात उतरुन उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप यांच्या सहकार्याने खिंड लढविली.

 

टॅग्स :floodपूरTahasildarतहसीलदार