शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
2
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
3
Ram Sutar: शिल्पकलेचा उपासक गेला! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
4
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दात म्हणाला-
5
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
6
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
7
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
8
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
9
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
10
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
11
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
12
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
13
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
14
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
15
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
16
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
17
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
18
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
19
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
20
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
Daily Top 2Weekly Top 5

सेवाग्राम' विकास आराखड्यात मूळ गाव विकासापासून वंचितच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 17:11 IST

Wardha : गाव विकासाबाबत उदासीनता, नागरिकांची बैठक घेत मांडल्या समस्या

लोकमत न्यूज नेटवर्क सेवाग्राम : सेवाग्राम गाव ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले. सेवाग्राम विकास आराखड्यात अनेक कामे झाली. यात शंका नाही. पण गावाचा उल्लेख असतानाही मूळ गाव मात्र विकासात्मक कामापासून वंचित राहिले. अन्य गावांचा विकास होत आहे; पण याच गावातील समस्यांबाबत आणि विकासाबाबत उदासीनता का? असा प्रश्न आता गावकऱ्यांसमोर आहे

महात्मा गांधींनी देशाच्या विकासाचे गमक गाव विकासात असल्याचे सांगितले होते. त्या नुसार गाव विकास होणे अपेक्षित होते. मात्र ज्यांची कर्मभूमी राहिली त्या महात्मा गांधींच्या गावात अद्यापही सोई-सुविधा उपलब्ध झाल्या नाही. यात रस्त्यावरील दुकानदारांना पर्यायी जागा, पाणंद रस्ते, स्मशानभूमी, देवस्थान, स्वच्छता, नाला, अरुंद पुलामुळे शेतात जाणारे पाणी, जीर्ण जलकुंभ, जिल्हा परिषद शाळेचे मैदान आदी समस्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षातही कायम आहे. 

गाव विकासासाठी कोट्यवधी रुपये खर्चाचा सेवाग्राम विकास आराखडा राबविण्यात आला. यातून बापूंची कुटी वगळता आजूबाजूचा परिसर, रस्ता, स्ट्रीट लाइटसह अन्य विकासाची कामे करण्यात आली. मात्र मुख्य गाव यातून वगळण्यात आले. बापूंच्या स्वप्नातील गावाची संकल्पना राबविता अली असती मात्र तसे केले नाही. खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य असे सर्व असतानाही शासकीय यंत्रांना विकास करू शकली नाही. त्यामुळे गावात मूलभूत समस्या अजूनही कायम आहे. यामुळे गाव मागेच राहिल्याचे शल्य आहे. या अनुषंगाने गावातील समस्या मार्गी लावण्यासाठी गावात बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी नाना अणकर, रूपेश कडू. दिलीप शेंद्रे, संजय चव्हाण, सुशील कोल्हे, अभय ताकसांडे, नीलेश तिजारे, संजय देशमुख, मुन्ना शेख, संजय गवई, सुरेंद्र कांबळे, विजय नेहारे, सुधाकर शेंडे, विशाल कांबळे, गजानन ताकसांडे, त्र्यंबक नेहारे इ. सह युवा वर्ग उपस्थित राहून चर्चेत सहभागी झाले. 

वेळप्रसंगी सत्याग्रहाचे उपसणार हत्यारगावातील समस्या मार्गी लावणे प्रमुख काम असून या समस्यांवर विचारमंथन करण्यासाठी गावातील हनुमान मंदिर देवस्थान येथे रविवारी २० रोजी बैठक पार पडली. यात मेडिकल चौकातील सौंदर्याकरण, स्वच्छतागृह, रस्त्यावरील दुकानदारांना पर्यायी जागा, पाणंद रस्ते, स्मशानभूमी, देवस्थान, स्वच्छता, नाला, अरुंद पुलामुळे शेतात जाणारे पाणी, जीर्ण जलकुंभ, जिल्हा परिषद शाळेचे मैदान इ. विषयांवर चर्चा करीत लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत आणि शासकीय यंत्रांना यांच्याशी पत्रव्यवहार मार्गी लावण्यासंदर्भात एकमत झाले. पत्रव्यवहाराने विषय मार्गी न लागल्यास वेळप्रसंगी सत्याग्रहाचे हत्यार उपसणार असल्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. 

 

टॅग्स :wardha-acवर्धा