शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
3
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
4
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
5
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
7
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
8
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
9
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
11
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
14
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
15
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
16
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
17
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
18
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
19
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
20
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश

सेवाग्राम' विकास आराखड्यात मूळ गाव विकासापासून वंचितच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 17:11 IST

Wardha : गाव विकासाबाबत उदासीनता, नागरिकांची बैठक घेत मांडल्या समस्या

लोकमत न्यूज नेटवर्क सेवाग्राम : सेवाग्राम गाव ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले. सेवाग्राम विकास आराखड्यात अनेक कामे झाली. यात शंका नाही. पण गावाचा उल्लेख असतानाही मूळ गाव मात्र विकासात्मक कामापासून वंचित राहिले. अन्य गावांचा विकास होत आहे; पण याच गावातील समस्यांबाबत आणि विकासाबाबत उदासीनता का? असा प्रश्न आता गावकऱ्यांसमोर आहे

महात्मा गांधींनी देशाच्या विकासाचे गमक गाव विकासात असल्याचे सांगितले होते. त्या नुसार गाव विकास होणे अपेक्षित होते. मात्र ज्यांची कर्मभूमी राहिली त्या महात्मा गांधींच्या गावात अद्यापही सोई-सुविधा उपलब्ध झाल्या नाही. यात रस्त्यावरील दुकानदारांना पर्यायी जागा, पाणंद रस्ते, स्मशानभूमी, देवस्थान, स्वच्छता, नाला, अरुंद पुलामुळे शेतात जाणारे पाणी, जीर्ण जलकुंभ, जिल्हा परिषद शाळेचे मैदान आदी समस्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षातही कायम आहे. 

गाव विकासासाठी कोट्यवधी रुपये खर्चाचा सेवाग्राम विकास आराखडा राबविण्यात आला. यातून बापूंची कुटी वगळता आजूबाजूचा परिसर, रस्ता, स्ट्रीट लाइटसह अन्य विकासाची कामे करण्यात आली. मात्र मुख्य गाव यातून वगळण्यात आले. बापूंच्या स्वप्नातील गावाची संकल्पना राबविता अली असती मात्र तसे केले नाही. खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य असे सर्व असतानाही शासकीय यंत्रांना विकास करू शकली नाही. त्यामुळे गावात मूलभूत समस्या अजूनही कायम आहे. यामुळे गाव मागेच राहिल्याचे शल्य आहे. या अनुषंगाने गावातील समस्या मार्गी लावण्यासाठी गावात बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी नाना अणकर, रूपेश कडू. दिलीप शेंद्रे, संजय चव्हाण, सुशील कोल्हे, अभय ताकसांडे, नीलेश तिजारे, संजय देशमुख, मुन्ना शेख, संजय गवई, सुरेंद्र कांबळे, विजय नेहारे, सुधाकर शेंडे, विशाल कांबळे, गजानन ताकसांडे, त्र्यंबक नेहारे इ. सह युवा वर्ग उपस्थित राहून चर्चेत सहभागी झाले. 

वेळप्रसंगी सत्याग्रहाचे उपसणार हत्यारगावातील समस्या मार्गी लावणे प्रमुख काम असून या समस्यांवर विचारमंथन करण्यासाठी गावातील हनुमान मंदिर देवस्थान येथे रविवारी २० रोजी बैठक पार पडली. यात मेडिकल चौकातील सौंदर्याकरण, स्वच्छतागृह, रस्त्यावरील दुकानदारांना पर्यायी जागा, पाणंद रस्ते, स्मशानभूमी, देवस्थान, स्वच्छता, नाला, अरुंद पुलामुळे शेतात जाणारे पाणी, जीर्ण जलकुंभ, जिल्हा परिषद शाळेचे मैदान इ. विषयांवर चर्चा करीत लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत आणि शासकीय यंत्रांना यांच्याशी पत्रव्यवहार मार्गी लावण्यासंदर्भात एकमत झाले. पत्रव्यवहाराने विषय मार्गी न लागल्यास वेळप्रसंगी सत्याग्रहाचे हत्यार उपसणार असल्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. 

 

टॅग्स :wardha-acवर्धा