शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

शासनाची 'कर्जमुक्ती' नावालाच; 'प्रोत्साहन' ही अजून रखडलेलेच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 16:53 IST

पाच वर्षे उलटली : सव्वा सात हजार शेतकरी लाभापासून वंचितच

चेतन बेले लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शेतपिकांसाठी घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड करू न शकलेल्या तसेच नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, प्रोत्साहनपर लाभ योजना अमलात आणली होती. या योजनेंतर्गत जिल्ह्यात ५४ हजार ९४१ शेतकरी पात्र ठरले. परंतु, १ हजार ४७६ शेतकऱ्यांना अजूनपर्यंत याचा लाभ मिळालेला नाही. कर्जमुक्ती योजना व प्रोत्साहन अनुदानाचे असे सात हजार २५० शेतकरी गत पाच वर्षांपासून दोन्ही योजनांच्या लाभापासून वंचित आहेत. 

राज्य शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दिलासा देताना सन २०१९ मध्ये कर्जमाफी घोषित केली. या योजनेसाठी जिल्ह्यात ५८ हजार ८९५ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी ५४ हजार ९४१ शेतकरी पात्र ठरले. या शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक देत ५३ हजार ४६५ शेतकऱ्यांच्या खात्यावरील ४७१ कोटी ३६ लाख रुपये माफ करण्यात आले होते. मात्र, पात्र ठरलेल्या एक हजार ४७६ शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी मिळालेली नाही. 

नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना सुरू केली होती. यासाठी जिल्ह्यात १४ हजार २६४ शेतकऱ्यांनी अर्ज केले. यापैकी ३ हजार ४७५ शेतकरी अपात्र ठरले तर ५ हजार १५ शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभाची २४ कोटी ४१ लाख रुपयांची रक्कम देण्यात आली. मात्र, उर्वरित पाच हजार ७७४ शेतकऱ्यांना अजूनही लाभ मिळालेला नाही. कागदपत्रांचा अभाव तसेच बँक खात्याशी संबंधित अडचणी, आदी कारणांमुळे पाच वर्षे उलटूनही कर्जमुक्ती योजनेंतर्गत कर्जमाफीचा लाभ संबंधित शेतकऱ्यांना मिळालेला नाही. विद्यमान सरकारचा पाच वर्षांचा कालावधी ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये संपुष्टात येणार आहे. निवडणूका जाहीर होण्यापूर्वी या संदर्भात निर्णय घेतील का, याकडे लक्ष लागले आहे. 

काय आहेत अडचणी?राज्य शासनाने पाच वर्षापूर्वी केलेली कर्जमाफी योजना व नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलेला प्रोत्साहन अनुदानाचा लाभ अजून- पर्यंत मिळालेला नाही. अनेक शेतकऱ्यांचे बँक खाते आधारशी संलग्न नाही. तसेच काही शेतकऱ्यांचे व्हेरिफिकेशन झालेले नाही. काही शेतकऱ्यांनी त्रुटींची पूर्तता केलेली नाही. यासह कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदानाचा विविध अडचणींमुळे शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही.

प्रोत्साहन योजनेला शासनाकडून गती सन २०१८-१९ अथवा २०१९-२० या वर्षात पीक कर्ज घेतलेल्या व त्याची पूर्णतः परतफेड केली अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन योजना सुरू केली होती. गत पाच वर्षात बंद असलेल्या या योजनेला उभारी देत ही योजना सुरू करण्यात आली आहे. गत तीन महिन्यांत सात शेतकऱ्यांचे आधार व्हेरिफिकेशन, ई-केवायसी झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात प्रोत्साहन अनुदानाची रक्कम वळती करण्यात आली आहे. 

टॅग्स :wardha-acवर्धा