शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
3
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
4
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
5
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
6
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
7
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
8
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
9
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
10
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
11
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
12
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
13
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
14
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
15
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
16
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
17
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
18
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
19
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
20
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?

गेल्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील १७४ मतदान केंद्रांवर ५० टक्केही मतदान नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 19:10 IST

सर्वाधिक मतदान केंद्र वर्धा शहरात, त्या खालोखाल देवळी, हिंगणघाट, आर्वीचा समावेश

चेतन बेले, वर्धा: लोकसभा मतदारसंघात सन २०१९ च्या निवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झालेल्या १७४ मतदान केंद्रांचा समावेश आहे. यात सर्वाधिक कमी मतदान वर्धा शहरातलग असलेल्या १२८ मतदार केंद्रांवर झाले होते. तर त्यापाठोपाठ देवळी हिंगणघाट आणि आर्वीचा समावेश आहे.

मतदानाची टक्केवारी ६५ टक्यांपर्यंत वाढावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मायक्रो प्लॅनिंग करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. मागील लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात ११ लाख ४९ हजार ९५८ मतदार होते. या निवडणुकीत १७४ मतदान केंद्रावर ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले. यात बऱ्याच गावांत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात आला होता.

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक विभागाकडून मायक्रो प्लॅनिंग करण्यात आले होते. यात मतदारयादी शुद्धीकरण, गृहभेटी देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. गावागावांत पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली, तर महाविद्यालयांमध्ये मतदार नोंदणी शिबिर राबविण्यात आले. तोंडावर असलेल्या लोकसभा निवडणुकीत सर्वच मतदान केंद्रांवर किमान ६५ ते ७० टक्के तरी मतदान व्हावे, यासाठी अधिकाऱ्यांचा प्रयत्न सुरू आहे.

निवडणुकीवेळी त्या गावातील मतदार नेमके कोठे जातात, मतदानाला का येत नाहीत, त्यामागील कारणांचा शोध घेण्यात आला. ग्रामीण क्षेत्राच्या तुलनेत शहर मतदारांमध्ये केवळ आणि केवळ नागरिकांची उदासीनता असल्याचे दिसून आले आहे.

लोकसभा निवडणुकीत टक्का वाढेना- लोकसभा २०१९ च्या निवडणुकीत जिल्ह्यातील वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर ५० ते ८७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्कच बजावला नाही. पाच वर्षांतून एकदा निवडणूक येते, तरीदेखील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा स्थानिक निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा व लोकसभा निवडणुकीवेळीच मतदानाची टक्केवारी कमी का राहते, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

१७ हजार नवमतदारांची नोंदणी- पूर्वी वर्षातून एकदाच मतदान नोंदणी करता येत होती. मात्र यात बदल करीत वर्षातून ३ वेळा नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे महाविद्यालयात नवमतदारांसाठी नोंदणी शिबिर राबवीत यात १७ हजार ४२७ नवमतदारांची नोंदणी केली आहे. शिवाय वर्षभरात १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या मतदारांची नोंदणी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

२९ हजार ७०९ मतदार गळाले- २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात ११ लाख ४९ हजार ९५८ मतदार होते. मतदार शुद्धीकरणात दुबार मतदार आणि हयात नसलेल्या व्यक्तींची नावे वगळण्यात आली. यात मृत्यू प्रमाणपत्राच्या आधारावर तब्बल २८ हजार ४०० तर दुबार नोंदणी असलेल्या १ हजार ३०९ असे एकूण २९ हजार ७०९ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत.

१०.८९ लाख मतदार- मतदार शुद्धीकरण यादी तयार करण्यासाठी गतवर्षी जिल्ह्यात जुलै, ऑगस्ट महिन्यात १३० बीएलओच्या माध्यमातून जिल्ह्यात ३ लाख ९ हजार ८४६ गृहभेटी देण्यात आल्या. यात दुबार नोंदणी असलेल्या मतदारांना ऐच्छिक एका ठिकणी मतदान करण्याचा अधिकार कायम ठेवत यादीतून नाव वगळण्यात आले. जुने व नवीन असे जिल्ह्यात सध्या १० लाख ८९ हजार १७४ मतदारांची नोंद आहे.

ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी क्षेत्रातील मतदारांत मतदान करण्यात उदासीनता दिसून येत आहे. सर्वाधिक वर्धालगत असून काही मतदान केंद्रावर १३ टक्के मतदानाची नोंद घेण्यात आली होती. त्यामुळे तोंडावर असलेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय सरासरीपेक्षा जास्त मतदान व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहे.- अनिल गावित, उपजिल्हाधिकारी, निवडणूक वर्धा.

मतदान कमी असणारी विधानसभानिहाय मतदान केंद्र

आर्वी - १३देवळी- २१हिंगणघाट- १४वर्धा - १२८

टॅग्स :Votingमतदानlok sabhaलोकसभा