शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

चार मंडळांत जणू 'ढगफुटी' तर नऊ मंडळांत 'अतिवृष्टी'; २४ तासांत जिल्ह्यात ५०.७ मिमी पावसाची नाेंद 

By महेश सायखेडे | Updated: July 22, 2023 21:00 IST

एकूणच सततच्या पावसामुळे जिल्ह्यावर पूरस्थितीचे संकट ओढवत दहा रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

वर्धा : मागील काही दिवसांपासून हुलकावणी देणारा वरुणराजा सध्या जिल्ह्यात जणू मुक्कामी आहे. मागील २४ तासांत जिल्ह्यात ५०.७ मि.मी. पाऊस झाला असून, चार महसूल मंडळांत ढगफुटीसदृश, तर नऊ मंडळांत अतिवृष्टी झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. एकूणच सततच्या पावसामुळे जिल्ह्यावर पूरस्थितीचे संकट ओढवत दहा रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.मागील २४ तासांत कुठे संततधार तर कुठे मुसळधार जोर कायम ठेवलेला पाऊस शनिवारी थांबून-थांबून जिल्ह्यातील आठही तालुक्यांत कायम होता. सततच्या पावसामुळे नदी व नाल्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली असून जिल्ह्यावर पूरस्थितीचे संकट ओढवले. पुलावरून पाणी वाहत असल्याने सात जिल्हा प्रमुख मार्ग तर तीन राज्य मार्गांवरील वाहतूक पूर्णत: बंद झाली होती. वाहतूक बंद झालेल्या जिल्हा प्रमुख मार्गांत मार्ग क्रमांक २४, ७३, १३, ६८, ४९, ४८, ४८ अ तर राज्य मार्ग ३२२, ३२९ व ०७ चा समावेश असल्याचे सांगण्यात आले.कुठल्या तालुक्यातील किती मार्गावरील वाहतूक बंद?हिंगणघाट : ०८वर्धा : ०१देवळी : ०१कुठल्या मंडळांत अतिवृष्टी?* देवळी तालुक्यातील विजयगोपाल, भिडी, अंधोरी तर हिंगणघाट तालुक्यातील वडनेर, शिरसगाव, पोहणा, वर्धा तालुक्यातील वर्धा, वायफड तसेच कारंजा तालुक्यातील कन्नमवारग्राम महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.* वेगळे पाॅइंट *विजयगोपाल : ७३.३ मि.मी.भिडी : ८१.५ मि.मी.अंधोरी : ८०.३ मि.मी.वडनेर : ६६.८ मि.मी.शिरसगाव : ७६.० मि.मी.पोहणा : ८०.८ मि.मी.वर्धा : ६७.० मि.मी.वायफड : ६६.५ मि.मी.कन्नमवारग्राम : ७५.५ मि.मी.कुठल्या मंडळांत ढगफुटीसदृश?* देवळी तालुक्यातील देवळी, पुलगाव, गिरोली तर हिंगणघाट तालुक्यातील कानगाव या एकूण चार महसूल मंडळात मागील २४ तासांत ढगफुटीसदृश पाऊस झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.* वेगळे पाॅईंट *देवळी : ९८.३ मि.मी.पुलगाव : ९५.८ मि.मी.गिरोली : ११८.० मि.मी.कानगाव : ११६.५ मि.मी.

नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारासततच्या पावसामुळे नदी व नाल्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. शिवाय जिल्ह्यातील काही जलाशयांतून पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात नद्यांच्या काठांवर तब्बल २१४ गावे असून त्यांच्यावर जिल्हा आणि तालुका प्रशासनाचा वॉच आहे.

दोन प्रकल्पांतून होतोय पाण्याचा विसर्ग* सततच्या पावसामुळे पाणीपातळीत चांगलीच वाढ होत पोथरा आणि लालनाला या दोन प्रकल्पांतून सध्या पाण्याचा विसर्ग होत आहे.* डोंगरगाव आणि पंचधारा हे दोन प्रकल्प ओव्हर फ्लोच्या उंबरठ्यावर आहेत. पाऊस कायम असल्याने हे दोन्ही प्रकल्प कधीही फुल्ल होत पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होण्याची शक्यता आहे.

कुठल्या तालुक्यात किती पावसाची नोंदआर्वी : ३८.४ मि.मी.कारंजा : ४८.० मि.मी.आष्टी : ३६.५ मि.मी.वर्धा : ६१.२ मि.मी.सेलू : ३९.७ मि.मी.देवळी : ९१.४ मि.मी.हिंगणघाट : ६३.२ मि.मी.समुद्रपूर : २३.१ मि.मी.

नागझरी नाल्यावरील पुल गेला वाहूनवर्धा तालुक्यातील पवनार-सेवाग्राम रोडवर नागझरी नाल्यावरील पूल पावसामुळे पूर्णपणे वाहून गेला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव बॅरिकेटिंग करून वाहतूक बंद करण्यात आली आहे.लोकवर्गणीतून बांधलेल्या पुलाच्या दोन्ही बाजू खचल्यासेलू तालुक्यातील धानोली (मेघे)-बेळगाव या गावांना जोडणाऱ्या लोकवर्गणीतून बांधलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूकडील भाग वाहून गेला आहे. या मार्गावरून फारशी वाहतूक होत नसली तरी मार्गाचा वापर शेतकरी व मजूर मुख्यत्वे करतात. पर्यायी मार्ग ३०० मीटर अंतरावर महामार्गावरून उपलब्ध आहे. 

टॅग्स :Rainपाऊस