शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

चार मंडळांत जणू 'ढगफुटी' तर नऊ मंडळांत 'अतिवृष्टी'; २४ तासांत जिल्ह्यात ५०.७ मिमी पावसाची नाेंद 

By महेश सायखेडे | Updated: July 22, 2023 21:00 IST

एकूणच सततच्या पावसामुळे जिल्ह्यावर पूरस्थितीचे संकट ओढवत दहा रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

वर्धा : मागील काही दिवसांपासून हुलकावणी देणारा वरुणराजा सध्या जिल्ह्यात जणू मुक्कामी आहे. मागील २४ तासांत जिल्ह्यात ५०.७ मि.मी. पाऊस झाला असून, चार महसूल मंडळांत ढगफुटीसदृश, तर नऊ मंडळांत अतिवृष्टी झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. एकूणच सततच्या पावसामुळे जिल्ह्यावर पूरस्थितीचे संकट ओढवत दहा रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.मागील २४ तासांत कुठे संततधार तर कुठे मुसळधार जोर कायम ठेवलेला पाऊस शनिवारी थांबून-थांबून जिल्ह्यातील आठही तालुक्यांत कायम होता. सततच्या पावसामुळे नदी व नाल्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली असून जिल्ह्यावर पूरस्थितीचे संकट ओढवले. पुलावरून पाणी वाहत असल्याने सात जिल्हा प्रमुख मार्ग तर तीन राज्य मार्गांवरील वाहतूक पूर्णत: बंद झाली होती. वाहतूक बंद झालेल्या जिल्हा प्रमुख मार्गांत मार्ग क्रमांक २४, ७३, १३, ६८, ४९, ४८, ४८ अ तर राज्य मार्ग ३२२, ३२९ व ०७ चा समावेश असल्याचे सांगण्यात आले.कुठल्या तालुक्यातील किती मार्गावरील वाहतूक बंद?हिंगणघाट : ०८वर्धा : ०१देवळी : ०१कुठल्या मंडळांत अतिवृष्टी?* देवळी तालुक्यातील विजयगोपाल, भिडी, अंधोरी तर हिंगणघाट तालुक्यातील वडनेर, शिरसगाव, पोहणा, वर्धा तालुक्यातील वर्धा, वायफड तसेच कारंजा तालुक्यातील कन्नमवारग्राम महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.* वेगळे पाॅइंट *विजयगोपाल : ७३.३ मि.मी.भिडी : ८१.५ मि.मी.अंधोरी : ८०.३ मि.मी.वडनेर : ६६.८ मि.मी.शिरसगाव : ७६.० मि.मी.पोहणा : ८०.८ मि.मी.वर्धा : ६७.० मि.मी.वायफड : ६६.५ मि.मी.कन्नमवारग्राम : ७५.५ मि.मी.कुठल्या मंडळांत ढगफुटीसदृश?* देवळी तालुक्यातील देवळी, पुलगाव, गिरोली तर हिंगणघाट तालुक्यातील कानगाव या एकूण चार महसूल मंडळात मागील २४ तासांत ढगफुटीसदृश पाऊस झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.* वेगळे पाॅईंट *देवळी : ९८.३ मि.मी.पुलगाव : ९५.८ मि.मी.गिरोली : ११८.० मि.मी.कानगाव : ११६.५ मि.मी.

नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारासततच्या पावसामुळे नदी व नाल्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. शिवाय जिल्ह्यातील काही जलाशयांतून पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात नद्यांच्या काठांवर तब्बल २१४ गावे असून त्यांच्यावर जिल्हा आणि तालुका प्रशासनाचा वॉच आहे.

दोन प्रकल्पांतून होतोय पाण्याचा विसर्ग* सततच्या पावसामुळे पाणीपातळीत चांगलीच वाढ होत पोथरा आणि लालनाला या दोन प्रकल्पांतून सध्या पाण्याचा विसर्ग होत आहे.* डोंगरगाव आणि पंचधारा हे दोन प्रकल्प ओव्हर फ्लोच्या उंबरठ्यावर आहेत. पाऊस कायम असल्याने हे दोन्ही प्रकल्प कधीही फुल्ल होत पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होण्याची शक्यता आहे.

कुठल्या तालुक्यात किती पावसाची नोंदआर्वी : ३८.४ मि.मी.कारंजा : ४८.० मि.मी.आष्टी : ३६.५ मि.मी.वर्धा : ६१.२ मि.मी.सेलू : ३९.७ मि.मी.देवळी : ९१.४ मि.मी.हिंगणघाट : ६३.२ मि.मी.समुद्रपूर : २३.१ मि.मी.

नागझरी नाल्यावरील पुल गेला वाहूनवर्धा तालुक्यातील पवनार-सेवाग्राम रोडवर नागझरी नाल्यावरील पूल पावसामुळे पूर्णपणे वाहून गेला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव बॅरिकेटिंग करून वाहतूक बंद करण्यात आली आहे.लोकवर्गणीतून बांधलेल्या पुलाच्या दोन्ही बाजू खचल्यासेलू तालुक्यातील धानोली (मेघे)-बेळगाव या गावांना जोडणाऱ्या लोकवर्गणीतून बांधलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूकडील भाग वाहून गेला आहे. या मार्गावरून फारशी वाहतूक होत नसली तरी मार्गाचा वापर शेतकरी व मजूर मुख्यत्वे करतात. पर्यायी मार्ग ३०० मीटर अंतरावर महामार्गावरून उपलब्ध आहे. 

टॅग्स :Rainपाऊस