शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर हिंदी साहित्यिकांची छाप 

By नरेश डोंगरे | Updated: February 3, 2023 19:44 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर हिंदी साहित्यिकांची छाप पाहायला मिळाली. 

वर्धा : येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आजच्या पहिल्या दिवशी हिंदी साहित्यिकांनी आपले जबरदस्त भाषा आणि वक्तृत्व कौशल्य प्रदर्शित करून अमिट छाप उमटवली. गांधी-बापूच्या भूमीत आज ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा जागर सुरू झाला. देशातील अनेक नामवंत साहित्यिक, कवी आणि गझलकार या संमेलनात सहभागी झाले आहेत. या संमेलनाचा उद्घाटन सोहळा पार पडला. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दीपक केसरकर, संमेलनाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, मावळते संमेलनाध्यक्ष भारत सासणे आणि अन्य मान्यवरांसह डॉ. विश्वनाथप्रसाद तिवारी तसेच डॉ कुमार विश्वास हे दोन ख्यातनाम हिंदी साहित्यिक सुद्धा हजर होते.

संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात अनेकांनी भाषणे केली. मात्र, या उद्घाटन सोहळ्यात हिंदीत भाषण  करणाऱ्या डॉ तिवारी आणि डॉ विश्वास या दोघांची बातच काही और असल्याचे श्रोत्यांनी प्रचंड दाद देऊन अधोरेखित केले.  तिवारी यांनी आपल्या भाषणातून देशात रामायण आणि महाभारत या दोनच भाषा असल्याचे नमूद केले. भाषा आणि शब्द नसते तर जग अंध अपंगा सारखे झाले असते, असेही ते म्हटले. मराठी भाषिक ज्या गर्वाने त्यांच्या भाषेचा गौरव करतात ते माझ्यासाठी आश्चर्यकारक असल्याचाही उल्लेख त्यांनी केला. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर, महादेवी वर्मा आणि अशाच विख्यात साहित्यिकांच्या साहित्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून त्यांनी भाषेचे महत्त्व पटवून दिले. भाषेला लेखक कशा पद्धतीने समृद्ध करतात आणि त्यामुळे भाषेसोबतच व्यक्तीही कसा ऊर्जावान बनतो त्याचाही दाखला त्यांनी दिला. त्यानंतर झालेले कुमार विश्वास यांचेही भाषण कमालीचे भाव खाऊन गेले सर्वांचीच नाराजीकुमार विश्वास यांना आयोजकांनी केवळ पाच मिनिटे दिली, ही बाब उपस्थित साहित्यिक, कवी, गझलकार अन सामान्य श्रोत्यांनाही खटकली. ती अनेकांनी बोलून दाखवली. एकूणच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनपर सोहळ्याच्या मंचावर तिवारी तसेच विश्वास यांनी हिंदी भाषेतून समृद्ध वक्तव्य करून आपली छाप सोडली. 

 

 

टॅग्स :wardha-acवर्धाMarathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन