शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

शेतात करपू लागली तुरीची झाडं, आर्वी तालुक्यात ५० गावे प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 16:48 IST

आर्वी तालुक्यातील ५० गावांतील तूर पिकावर या अज्ञात रोगाचे आक्रमण झाल्याने ऐन भरात येणारे तूर पीक धोक्यात आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. खरीप हंगामात अतिपावसाने सोयाबीन पीक हातचे गेले.

ठळक मुद्देढगाळ वातावरणाने तूर पिकांवर संकट

वर्धा : गेल्या १५ दिवसांपासून आर्वीसह तालुक्यातील दमट धुक्याच्या वातावरणामुळे रब्बी हंगामातील तूर पीक धोक्यात आले. यावर अज्ञात रोगाच्या आक्रमणाने तूर पीक उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. या रोगामुळे उभे तूर पीक जागीच वाळले असून, शेंगा भरण्याच्या अवस्थेतच तुरीवर हे संकट ओढावल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे

आर्वी तालुक्यातील ५० गावांतील तूर पिकावर या अज्ञात रोगाचे आक्रमण झाल्याने ऐन भरात येणारे तूर पीक धोक्यात आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. खरीप हंगामात अतिपावसाने सोयाबीन पीक हातचे गेले. यात रब्बी हंगामातील नगदी पीक म्हणून ओळखले जाते; परंतु या अज्ञात रोगाने शेतकऱ्यांचे तूर पीक पूर्णतः वाळून गेल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आल्याचे चित्र आहे. गेल्या महिनाभरापासून वातावरण दमट व ढगाळ असल्याने तुरीला मिळणाऱ्या उन्हाअभावी त्यातच सतत बदलणाऱ्या वातावरणाचा फटका बसल्याने रब्बी हंगामाचे तूर पीक या नैसर्गिक संकटात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी आहे. 

तुरीचे पंचनामे करून त्वरित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या

आर्वी तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागात तूर पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशी उपटून टाकली आहे.  आता तूरही वाळत चालली असून शेंगा धरलेल्या आहेत. त्याचे फार उत्पन्न होण्याची आशा मावळली आहे. त्यामुळे शासनाने मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. 

संपूर्ण जिल्ह्यात उभ्या तूर पिकावर रोग आला असून शेंगावर आलेले तुरीचे पीक वाळत चालले आहे. शेतकऱ्यांच्या हातात आलेले तुरीचे पीक पूर्णतः हातचे गेलेले आहे. या नैसर्गिक संकटामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांसामोर जगण्यामरण्याचे प्रश्न तयार झाले आहे. शासनाने कृषी विभागामार्फत त्वरित तूर पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे.

जंगली श्वापदानी तुरीचे पीक केले नष्ट

पूनम अनिल देशमुख यांचे रोहना शिवारात शेत आहे. त्यांनी खरिपाची माडी तूर पीक पेरले होते. १५ ते २० दिवसात पीक कापणीला येणार होते. अशातच रात्री जंगली श्वापदानी घुडघुस घालून संपूर्ण तीन एकरातील तुरीचे पीक मोडून नष्ट केले. यात शेतकऱ्याचे २० ते २२ पोते तुरीचे नुकसान झाले आहे. 

टॅग्स :agricultureशेतीweatherहवामानFarmerशेतकरी