शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Election 2026: अर्ज माघारीसाठी ५०-६० लाखांचं आमिष, विरोधी उमेदवारांच्या घरच्यांवरही दबाव; मनसेचा खळबळजनक आरोप
2
'हिंसक निदर्शनांमध्ये अमेरिका इराणमध्ये घुसण्यास तयार'; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा
3
KDMC Election 2026: डोंबिवलीत मनसेला धक्का, शहराध्यक्षाने अचानक अर्ज घेतला मागे; भाजपा उमेदवार बिनविरोध विजयी
4
Rahul Gandhi : "पाणी नाही, विष वाटलं, प्रशासन कुंभकर्णासारखं झोपेत"; राहुल गांधी आक्रमक, विचारले संतप्त सवाल
5
मनसेच्या बंडखोर उमेदवार अनिशा माजगावकर नॉट रिचेबल! खासदाराच्या मुलीविरोधात मैदानात 
6
Thane Municipal Election 2026: ठाण्यात एकनाथ शिंदेंचा मोठा धमाका! शिवसेनेचे पाच नगरसेवक बिनविरोध विजयी
7
पाकिस्तानच्या हाती लागला मोठा खजिना; देशाची गरिबी दूर होणार? पीएम शरीफ म्हणाले...
8
एकटी पाहून घरात घुसला, बळजबरी करू लागला, तरुणीने कुऱ्हाड उचलली आणि...
9
KFC आणि Pizza Hut च्या पॅरेंट कंपन्यांचं होणार मेगा मर्जर; McDonald’s आणि Domino’s चं टेन्शन वाढणार
10
मुंबईत मनसेला खिंडार, एकाचवेळी ११ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे; भाजपात प्रवेश, कारण काय?
11
NPS मध्ये ऐतिहासिक सुधारणा: बँका स्थापन करू शकतील पेन्शन फंड, शुल्क आणि पैसे काढण्याचे नियमही बदलले
12
नाशिकमध्ये अर्ज मागे घेताना भाजपाच्या दोन उमेदवारांमध्ये हाणामारी, निवडणूक कार्यालयासमोरच भिडले
13
'तुम्ही दहशत पसरवली, तर भारत गप्प बसणार नाही', जयशंकर यांचा पाकिस्तानवर निशाणा
14
इराणमध्ये सत्ता उलथवून टाकण्याचा प्रयत्न, १०० बंदुका जप्त; खामेनींच्या सैन्याने सादर केले पुरावे
15
दशकभराच्या प्रवासाचा अखेर! टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार; चाहत्यांना मोठा धक्का
16
Gold Silver Price Today: २०२६ मध्येही सोन्या-चांदीची चमक कायम; चांदी ५६५६ रुपयांनी महागली, सोन्यातही जोरदार तेजी
17
'पाकिस्तानला उखडून टाका, आम्ही भारताबरोबर'; 'पाक'मधून कोणत्या नेत्याने लिहिले परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना ओपन लेटर?
18
Health Tips: तरुणांमध्ये कॅन्सर वाढण्याची ५ धक्कादायक कारणं; डॉक्टरांनी सांगितले तातडीचे उपाय
19
"ज्यांच्यामुळे श्वास गुदमरत होता, ते आता च्यवनप्राश देताहेत का?" आशिष शेलारांचा राज ठाकरेंना सवाल
20
भाजपा नगरसेवकाच्या मुलाची गुंडगिरी; पोलिसाला मारली कानाखाली, संतप्त जमावाने दिला चोप
Daily Top 2Weekly Top 5

शेतात करपू लागली तुरीची झाडं, आर्वी तालुक्यात ५० गावे प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 16:48 IST

आर्वी तालुक्यातील ५० गावांतील तूर पिकावर या अज्ञात रोगाचे आक्रमण झाल्याने ऐन भरात येणारे तूर पीक धोक्यात आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. खरीप हंगामात अतिपावसाने सोयाबीन पीक हातचे गेले.

ठळक मुद्देढगाळ वातावरणाने तूर पिकांवर संकट

वर्धा : गेल्या १५ दिवसांपासून आर्वीसह तालुक्यातील दमट धुक्याच्या वातावरणामुळे रब्बी हंगामातील तूर पीक धोक्यात आले. यावर अज्ञात रोगाच्या आक्रमणाने तूर पीक उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. या रोगामुळे उभे तूर पीक जागीच वाळले असून, शेंगा भरण्याच्या अवस्थेतच तुरीवर हे संकट ओढावल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे

आर्वी तालुक्यातील ५० गावांतील तूर पिकावर या अज्ञात रोगाचे आक्रमण झाल्याने ऐन भरात येणारे तूर पीक धोक्यात आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. खरीप हंगामात अतिपावसाने सोयाबीन पीक हातचे गेले. यात रब्बी हंगामातील नगदी पीक म्हणून ओळखले जाते; परंतु या अज्ञात रोगाने शेतकऱ्यांचे तूर पीक पूर्णतः वाळून गेल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आल्याचे चित्र आहे. गेल्या महिनाभरापासून वातावरण दमट व ढगाळ असल्याने तुरीला मिळणाऱ्या उन्हाअभावी त्यातच सतत बदलणाऱ्या वातावरणाचा फटका बसल्याने रब्बी हंगामाचे तूर पीक या नैसर्गिक संकटात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी आहे. 

तुरीचे पंचनामे करून त्वरित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या

आर्वी तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागात तूर पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशी उपटून टाकली आहे.  आता तूरही वाळत चालली असून शेंगा धरलेल्या आहेत. त्याचे फार उत्पन्न होण्याची आशा मावळली आहे. त्यामुळे शासनाने मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. 

संपूर्ण जिल्ह्यात उभ्या तूर पिकावर रोग आला असून शेंगावर आलेले तुरीचे पीक वाळत चालले आहे. शेतकऱ्यांच्या हातात आलेले तुरीचे पीक पूर्णतः हातचे गेलेले आहे. या नैसर्गिक संकटामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांसामोर जगण्यामरण्याचे प्रश्न तयार झाले आहे. शासनाने कृषी विभागामार्फत त्वरित तूर पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे.

जंगली श्वापदानी तुरीचे पीक केले नष्ट

पूनम अनिल देशमुख यांचे रोहना शिवारात शेत आहे. त्यांनी खरिपाची माडी तूर पीक पेरले होते. १५ ते २० दिवसात पीक कापणीला येणार होते. अशातच रात्री जंगली श्वापदानी घुडघुस घालून संपूर्ण तीन एकरातील तुरीचे पीक मोडून नष्ट केले. यात शेतकऱ्याचे २० ते २२ पोते तुरीचे नुकसान झाले आहे. 

टॅग्स :agricultureशेतीweatherहवामानFarmerशेतकरी