शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

शेतात करपू लागली तुरीची झाडं, आर्वी तालुक्यात ५० गावे प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 16:48 IST

आर्वी तालुक्यातील ५० गावांतील तूर पिकावर या अज्ञात रोगाचे आक्रमण झाल्याने ऐन भरात येणारे तूर पीक धोक्यात आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. खरीप हंगामात अतिपावसाने सोयाबीन पीक हातचे गेले.

ठळक मुद्देढगाळ वातावरणाने तूर पिकांवर संकट

वर्धा : गेल्या १५ दिवसांपासून आर्वीसह तालुक्यातील दमट धुक्याच्या वातावरणामुळे रब्बी हंगामातील तूर पीक धोक्यात आले. यावर अज्ञात रोगाच्या आक्रमणाने तूर पीक उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. या रोगामुळे उभे तूर पीक जागीच वाळले असून, शेंगा भरण्याच्या अवस्थेतच तुरीवर हे संकट ओढावल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे

आर्वी तालुक्यातील ५० गावांतील तूर पिकावर या अज्ञात रोगाचे आक्रमण झाल्याने ऐन भरात येणारे तूर पीक धोक्यात आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. खरीप हंगामात अतिपावसाने सोयाबीन पीक हातचे गेले. यात रब्बी हंगामातील नगदी पीक म्हणून ओळखले जाते; परंतु या अज्ञात रोगाने शेतकऱ्यांचे तूर पीक पूर्णतः वाळून गेल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आल्याचे चित्र आहे. गेल्या महिनाभरापासून वातावरण दमट व ढगाळ असल्याने तुरीला मिळणाऱ्या उन्हाअभावी त्यातच सतत बदलणाऱ्या वातावरणाचा फटका बसल्याने रब्बी हंगामाचे तूर पीक या नैसर्गिक संकटात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी आहे. 

तुरीचे पंचनामे करून त्वरित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या

आर्वी तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागात तूर पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशी उपटून टाकली आहे.  आता तूरही वाळत चालली असून शेंगा धरलेल्या आहेत. त्याचे फार उत्पन्न होण्याची आशा मावळली आहे. त्यामुळे शासनाने मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. 

संपूर्ण जिल्ह्यात उभ्या तूर पिकावर रोग आला असून शेंगावर आलेले तुरीचे पीक वाळत चालले आहे. शेतकऱ्यांच्या हातात आलेले तुरीचे पीक पूर्णतः हातचे गेलेले आहे. या नैसर्गिक संकटामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांसामोर जगण्यामरण्याचे प्रश्न तयार झाले आहे. शासनाने कृषी विभागामार्फत त्वरित तूर पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे.

जंगली श्वापदानी तुरीचे पीक केले नष्ट

पूनम अनिल देशमुख यांचे रोहना शिवारात शेत आहे. त्यांनी खरिपाची माडी तूर पीक पेरले होते. १५ ते २० दिवसात पीक कापणीला येणार होते. अशातच रात्री जंगली श्वापदानी घुडघुस घालून संपूर्ण तीन एकरातील तुरीचे पीक मोडून नष्ट केले. यात शेतकऱ्याचे २० ते २२ पोते तुरीचे नुकसान झाले आहे. 

टॅग्स :agricultureशेतीweatherहवामानFarmerशेतकरी