शहरं
Join us  
Trending Stories
1
'जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद ठेचून काढा', गृहमंत्री अमित शाह यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश
2
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
3
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
4
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
5
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
6
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
7
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
8
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
9
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
10
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
11
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
12
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
13
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
14
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
15
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
16
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
17
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
18
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
19
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
20
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...

जिल्ह्यातील पाणीटंचाईवर तत्काळ उपाययोजना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 11:43 PM

सध्यास्थितीत धरणांच्या पाण्याची पातळी लक्षात घेता वर्धा व लगतच्या गावांत भविष्यात पाण्याचे भीषण संकट उद्भवण्याची शक्यता आहे. या दुष्काळ सदृष्य परिस्थितीवर मात करण्याकरिता योग्य उपाययोजना करण्यात यावी,

ठळक मुद्दे युवा सोशल फोरमची मागणी : सदाशिव खोत यांना निवेदनातून साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सध्यास्थितीत धरणांच्या पाण्याची पातळी लक्षात घेता वर्धा व लगतच्या गावांत भविष्यात पाण्याचे भीषण संकट उद्भवण्याची शक्यता आहे. या दुष्काळ सदृष्य परिस्थितीवर मात करण्याकरिता योग्य उपाययोजना करण्यात यावी,अशी मागणी ना. सदाशिव खोत यांना सादर केलेल्या निवेदनातून युवा सोशल फोरम व राष्ट्रसेवा दलाच्यावतीने करण्यात आली आहे.गत ५० वर्षांत दरडोई पाण्याची उपलब्धता एक तृतीयांशाने कमी होत आहे. पावसाच्या प्रमाणात वर्षागणिक होत चाललेल्या घट यामुळे दरवर्षी वर्धा जिल्ह्यातील अनेक गावे दुष्काळाच्या छायेत असतात. वर्धा शहराला बोर प्रकल्प व धाम प्रकल्प महाकाळी येथून पाणी पुरवठा केल्या होतो. जानेवारी महिन्यातच बोर प्रकल्पात ४४.५७ टक्के व धाम प्रकल्प महाकाळी येथे ६१.६२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्याचप्रमाणे पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात घट होत आहे. भविष्यात जल संकटाची तीव्रता किती भीषण असेल याची कल्पना न केलेली बरी. भविष्यातील या जलसंकटाचा फटका नागरिकांना सहन करावा लागणार आहे. भविष्यातील परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध पाण्याचे कालबद्ध नियोजन करणे व त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. त्याबाबत आतापासूनच योग्य पावले उचलण्याची गरज आहे. नागरिकांना मुबलग पाणी मिळावे यासाठी नियोजन करून त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना युवा सोशल फोरमचे अध्यक्ष सुधीर पांगुळ, राष्ट्रसेवा दलाचे जिल्हा संगठक अविनाश सोमनाथे, नितेश पाटील, सचिन कोटंबकार, प्रकाश गायकवाड, एकनाथ डहाके, गोलू पाखडे, विवेक तळवेकर, मिलिंद मोहोड यांच्यासह युवा सोशल फोरम तसेच राष्ट्रसेवा दलचे कार्यकर्ते उपस्थित होते.