शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

अवैध प्रवासी वाहतुकीने जिल्हा त्रस्त

By admin | Updated: March 27, 2017 01:11 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी आणि रेल्वेचे जाळे जिल्ह्याची जमेची बाजू आहे.

जीवघेण्या कसरतीकडे दुर्लक्ष : बसफेऱ्यांचा अभावही कारणीभूतवर्धा : राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी आणि रेल्वेचे जाळे जिल्ह्याची जमेची बाजू आहे. असे असले तरी जिल्ह्यातील जीवघेणी अवैध प्रवासी वाहतूक कमी होताना दिसत नाही. प्रत्येक मार्गावर अवैध प्रवासी वाहतूक होत असल्याचे पाहावयास मिळते. प्रवासी कोंबून होणारी ही वाहतूक अपघातास कारणीभूत ठरत आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तथा वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे. वर्धा जिल्ह्यात बहुतांश मार्गांवर अवैध प्रवासी वाहतूक केली जाते. ही वाहतूक काळी-पिवळी, ट्रॅक्स, मिनी ट्रॅव्हल्स, आॅटोच्या माध्यमातून होत असल्याचे दिसते. यात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून नियमांचे उल्लंघन केले जाते. शिवाय प्रवाशांना उद्धट वागणूक देत त्यांच्या अगतिकतेचा फायदा घेतला जात असल्याचे अनेक मार्गांवर पाहावयास मिळते. या अवैध वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून प्रवाशांनाही नाहक त्रास सहन करावा लागतो. या प्रकारांवर आळा घालण्यासाठी आरटीओ व वाहतूक पोलिसांनी कार्यवाही करणेच गरजेचे झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)कारंजा (घा.), आष्टी व राळेगावकडे सर्वाधिक अवैध प्रवासी वाहतूकबसफेऱ्यांच्या अभाव असल्यास अवैध प्रवासी वाहतुकीमध्ये वाढ होत असल्याचे सर्वश्रूत आहे. परिणामी, कारंजा (घा.), आष्टी (शहीद) आणि कानगाव, राळेगावकडे जाणाऱ्या मार्गावर सर्वाधिक अवैध प्रवासी वाहतूक होत असल्याचे दिसून येते. शिवाय देवळी, पुलगाव, आर्वी, हिंगणघाट, मांडगाव, समुद्रपूर तसेच सेलू या राज्यमार्गांसह ग्रामीण मार्गांवरही मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक वाढल्याचे दिसून येत आहे. कारंजा (घा.) हा वर्धा जिल्ह्यातील तालुका आहे; पण तो नागपूर- अमरावती मार्गावर असल्याने येथे वर्धा जिल्हास्थळावरून बसफेऱ्या कमी आहेत. असाच प्रकार आष्टी (श.) तालुका व पुलगाव शहरासोबत घडतो. या मार्गांवर बसफेऱ्या कमी असल्याने अवैध प्रवासी वाहतूक वाढली आहे. पुलगाव ते आर्वी, वर्धा ते राळेगाव, वर्धा ते हिंगणघाट, वर्धा ते कारंजा, आर्वी-तळेगाव ते आष्टी तथा कारंजा तालुक्यात सर्वच मार्गांवर अवैध प्रवासी वाहतूक फोफावली असून अपघातही वाढत आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे आहे.