शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

वर्ध्यात वाढत आहेत अवैध बांधकाम, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 17:22 IST

तक्रारी देऊन कारवाई नाही : अधिकाऱ्यांवर नेमका कोणाचा दबाव?

लोकमत न्यूज नेटवर्क हिंगणघाट : शहरामध्ये नगरपरिषदेच्या अंतर्गत येत असलेल्या अनेक प्रभागांमध्ये अवैध बांधकामांना ऊत आलेला आहे. अनेक वेळा या अवैध बांधकामासंदर्भात तक्रार देऊन सुद्धा कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे रहदारीला व शहरातील विकासकामांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. शहरातील अवैध बांधकाम पाडण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

हिंगणघाट शहरामध्ये अनेक असे प्रभाग आहेत त्या प्रभागामध्ये घर बांधताना रीतसर नगर परिषदेची परवानगी घेतली जात असते परंतु परवानगी घेतल्यानंतर घर बांधकामाच्या वेळेस घर मालकाची मर्यादित जागेच्या व्यतिरिक्त उरलेल्या काही शिल्लक जागेवर नजर असते. घराचे बांधकाम करीत असताना मोकळ्या जागेत बांधकाम केले जात आहे. त्यामुळे गावातील डेव्हलपमेंट योग्य त्या पद्धतीने होत नाही. सोबतच विकासकामे करते वेळी मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. सोबतच घरासमोरील नालीचा भाग अरुंद केला जात आहे. त्याचप्रमाणे जवळजवळ काही प्रभागांमध्ये छोटे रस्ते असल्यामुळे समोर घराचे बांधकाम वाढवण्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अवैध बांधकामामुळे वाद निर्माण होत आहेत. त्यामुळे नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी करण्याची मागणी होत आहे. 

शहरातील कचऱ्याची समस्या कायम शहरातील अनेक नागरिकांनी आपल्या घराजवळील नाल्यावर अवैध बांधकाम केले आहे. त्यामुळे नगर परिषदेच्या आरोग्य विभागाला प्रभागांमध्ये नाली साफसफाई करतेवेळी अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शहरातील नाले साफसफाईची गंभीर समस्या बनली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या समस्यांकडे लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

तक्रारी देऊनही कारवाई नाही शहरातील होत असलेल्या अवैध बांधकामसंबंधी नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना तक्रारी देऊन सुद्धा तक्रारीची दखल घेतली जात नाही. तात्पुरत्या स्वरूपात कारवाई करून थंड बस्त्यात टाकण्यात येते. अशा वेळी नागरिकांच्या दबावाखाली कारवाई केलीच तर कुठल्यातरी वरिष्ठ व्यक्तीचा फोन संबंधित विभागाला येतो व अवैध बांधकामाबद्दलची कारवाई थांबविली जाते, असे चित्र शहरात दिसत आहे. 

टॅग्स :wardha-acवर्धा