शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वर्ध्यात वाढत आहेत अवैध बांधकाम, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 17:22 IST

तक्रारी देऊन कारवाई नाही : अधिकाऱ्यांवर नेमका कोणाचा दबाव?

लोकमत न्यूज नेटवर्क हिंगणघाट : शहरामध्ये नगरपरिषदेच्या अंतर्गत येत असलेल्या अनेक प्रभागांमध्ये अवैध बांधकामांना ऊत आलेला आहे. अनेक वेळा या अवैध बांधकामासंदर्भात तक्रार देऊन सुद्धा कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे रहदारीला व शहरातील विकासकामांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. शहरातील अवैध बांधकाम पाडण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

हिंगणघाट शहरामध्ये अनेक असे प्रभाग आहेत त्या प्रभागामध्ये घर बांधताना रीतसर नगर परिषदेची परवानगी घेतली जात असते परंतु परवानगी घेतल्यानंतर घर बांधकामाच्या वेळेस घर मालकाची मर्यादित जागेच्या व्यतिरिक्त उरलेल्या काही शिल्लक जागेवर नजर असते. घराचे बांधकाम करीत असताना मोकळ्या जागेत बांधकाम केले जात आहे. त्यामुळे गावातील डेव्हलपमेंट योग्य त्या पद्धतीने होत नाही. सोबतच विकासकामे करते वेळी मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. सोबतच घरासमोरील नालीचा भाग अरुंद केला जात आहे. त्याचप्रमाणे जवळजवळ काही प्रभागांमध्ये छोटे रस्ते असल्यामुळे समोर घराचे बांधकाम वाढवण्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अवैध बांधकामामुळे वाद निर्माण होत आहेत. त्यामुळे नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी करण्याची मागणी होत आहे. 

शहरातील कचऱ्याची समस्या कायम शहरातील अनेक नागरिकांनी आपल्या घराजवळील नाल्यावर अवैध बांधकाम केले आहे. त्यामुळे नगर परिषदेच्या आरोग्य विभागाला प्रभागांमध्ये नाली साफसफाई करतेवेळी अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शहरातील नाले साफसफाईची गंभीर समस्या बनली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या समस्यांकडे लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

तक्रारी देऊनही कारवाई नाही शहरातील होत असलेल्या अवैध बांधकामसंबंधी नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना तक्रारी देऊन सुद्धा तक्रारीची दखल घेतली जात नाही. तात्पुरत्या स्वरूपात कारवाई करून थंड बस्त्यात टाकण्यात येते. अशा वेळी नागरिकांच्या दबावाखाली कारवाई केलीच तर कुठल्यातरी वरिष्ठ व्यक्तीचा फोन संबंधित विभागाला येतो व अवैध बांधकामाबद्दलची कारवाई थांबविली जाते, असे चित्र शहरात दिसत आहे. 

टॅग्स :wardha-acवर्धा