शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वीटभट्ट्यांनी श्वास कोंडला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 05:00 IST

धुरामुळे फळबागांवरही परिणाम होत असल्याच्या तक्रारी आहेत. जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्ग, वर्धा, नांदेड महामार्गासाठी अवैध मुरूम चोरी, वाळूचे अवैध उत्खनन कमी झाले असताना अवैध वीट भट्ट्यांनी आता डोके वर काढले आहे. वर्धा तालुक्यात तब्बल ७७ वीटभट्ट्यांच्या आहे. मात्र, यासर्व वीटभट्ट्या विनापरवाना सुरू आहेत. विशेष म्हणजे कारला परिसरात वीटभट्टी चालकांचा त्रास वाढला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वाढत्या शहरीकरणामुळे बांधकामासाठी महत्त्वाचे साहित्य असलेल्या विटांच्या भट्ट्यांची संख्या वर्धा तालुक्यात दिवसेंदिवस वाढत आहे; पण वीटभट्टी मालकांकडून प्रदूषण नियंत्रणासाठीच्या नियमांना हरताळ फासण्यात येत आहे. यामुळे तालुक्यातील रहिवाशांचा श्वास कोंडला आहे. धुरामुळे फळबागांवरही परिणाम होत असल्याच्या तक्रारी आहेत. जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्ग, वर्धा, नांदेड महामार्गासाठी अवैध मुरूम चोरी, वाळूचे अवैध उत्खनन कमी झाले असताना अवैध वीट भट्ट्यांनी आता डोके वर काढले आहे. वर्धा तालुक्यात तब्बल ७७ वीटभट्ट्यांच्या आहे. मात्र, यासर्व वीटभट्ट्या विनापरवाना सुरू आहेत. विशेष म्हणजे कारला परिसरात वीटभट्टी चालकांचा त्रास वाढला आहे. समृद्धी महामार्गासाठी झालेल्या मुरूम चोरीत कोट्यवधी रुपयांचा दंड आकारला. वर्धा ते नांदेड रेल्वेमार्गातही दोन कंत्राटदारावर सुमारे २० कोटींचा दंड आकारला. अवैध वाळूचोरीला राजकीय वरदहस्त असल्याने त्यावर कारवाई झाली नाही. हे सारे असताना आता अवैध वीटभट्ट्यांचाही विषय महत्त्वाचा ठरला आहे.  खरांगणा गोडे येथील ४ वीटभट्टी चालकांनी अनेक वर्षांपूर्वी परवानगी घेतली होती. मात्र, त्याचे नूतनीकरण केले नाही. वीटभट्टीसाठी लागणारी माती शेतातून चोरी केली जाते, तर काही शेतकरी माती विकतात. त्यालाही शासकीय परवानगी आवश्यक असते. प्रदूषणाचे नियमही पाळले जात नाहीत. वीट्टभट्टीवर दारूअड्डा सुरू राहत असल्याने लगतच्या शेतकऱ्यांनाही त्रास होतो. वीटभट्टी लावण्यासाठी शेतजमीन अकृषक करणे आवश्यक असताना तेही केली जात नाही. वीटभट्टी चालकांची मनमानी वाढल्याने नागरिकांना त्रास होत आहे. महाकाळ परिसरातील वीटभट्टी चालकांनी तर रस्त्यावरच अतिक्रमण केले आहे. त्यामुळे याकडे लक्ष देत कारवाई करणे गरजेचे झाले आहे. 

 

टॅग्स :pollutionप्रदूषण