शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वितरिकांच्या सफाईकडे दुर्लक्ष

By admin | Updated: November 15, 2014 01:59 IST

बोर प्रकल्पांतर्गत येणाऱ्या वितरिका व पाटसऱ्यांची साफसफाई केली नसताना रब्बी हंगामासाठी सोडलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागला आहे़

घोराड : बोर प्रकल्पांतर्गत येणाऱ्या वितरिका व पाटसऱ्यांची साफसफाई केली नसताना रब्बी हंगामासाठी सोडलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागला आहे़ संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने परिसरातील शेतकरी संताप व्यक्त होत आहे.२४८ कि़मी़ च्या असलेल्या वितरिकांमध्ये मोठमोठी झाडेझुडपे वाढली आहे. सायपनची दुरूस्तीही करण्यात आली नाही. वितरिकांची गाळामुळे झालेले खोलीकरण करण्यातही पाटबंधारे विभागाने कर्तव्यदक्षता दाखविली नाही. प्रत्येकाच्या शेतापर्यंत जाणाऱ्या पाटसऱ्या कित्येक वर्षापासून दुरूस्तीच्या प्रतिक्षेत असताना आपल्या शेतात पाणी पाझरून पिकांची हानी होऊ नये याची काळजी शेतकऱ्यांनाच घ्यावी लागत आहे़पांदण रस्त्याला आडव्या गेलेल्या पाटसऱ्यांवरील सिमेंटच्या पायल्या गत काही वर्षापासून फुटल्या असल्याने बहुतांश ठिकाणी कसरत करावी लागत आहे़ ५० वर्षाच्या झालेल्या बोरप्रकल्पाच्या वितरिका, सायपन, पाटसऱ्याची कायम स्वरूपी दुरूस्ती आदींकडे कुणीही पाठपुरावा केला नसल्याने कर्मचाऱ्यांची कमतरता हे कारण पुढे करून रात्र व दिवस पाळीत पाण्याचे नियोजन योग्य रितीने होण्यास कुणीही कर्मचारी वितरिकेवर फिरकत नाही़१२ नोव्हेंबरला रब्बी हंगामाच्या ओलितासाठी बोर प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून कंत्राटी व रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या भरवश्यावर आता देखरेखीची मदार येणार असल्याचे सांगितले जात आहे़ काही ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने कामे केली असली तरी ती पूर्णपणे करण्यात आली नसल्याची ओरड आहे़गत काही वर्षांअगोदर प्रत्येक वितरिकेवर शेतकऱ्यांमधून पाणी वापर संस्था स्थापन करण्यात आल्या होत्या़ एक दोन वर्ष या संस्थानी उत्तमरित्या वितरिकांची साफसफाई करून पाणी नियोजन केले. मोठ्या प्रमाणात होणारा पाण्याचा अपव्यय रोखण्यात यशही आले. या संस्थांना कामासाठी निधी दिला जात होता़ पण काही वर्षापासून या पाणी वापर संस्था नावालाच राहिल्या आहे़ त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असून नदी नाल्याला पाण्याचा ओघ वाढत आहे़शेतकऱ्यांनी तक्रार केल्यानंतरही तक्रारीची दखल घेण्यासाठी तक्रारदाराला प्रतीक्षा करावी लागत असल्याचे त्रस्त शेतकरी गुणवंत राऊत यांनी सांगितले़ रबी हंगाम सुरू असून ओलितासाठी पाण्याची अत्यंत गरज आहे. तरंतु पाटसऱ्या फुटल्याने शेतकरी वर्गाला पाहिजे त्या प्रमाणात पाणी मिळत नाही. त्यामुळे पाटबंधारे विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)