शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

फुकटच्या रेशनचा लाभ घ्याल तर शासकीय कर्मचाऱ्यांच्या अंगलट येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 17:29 IST

कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार, शोधमोहीम सुरू : केवायसी करणे बंधनकारक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत स्वस्त धान्याचा लाभ गरीब, गरजूंना दिला जातो. कोणताही शासकीय कर्मचारी या धान्याचा लाभ घेऊ शकत नाही. शासकीय कर्मचारी असतानाही स्वस्त धान्याचा लाभ घेत असेल तर आणि ते निदर्शनास आले तर त्या कर्मचाऱ्यावर कारवाई केली जाऊ शकते. यासंदर्भात पुरवठा विभागाने पडताळणी सुरू केली असून, केवायसी पूर्ण झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस येऊ शकतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आताच धान्यावरील अधिकार सोडणे गरजेचे आहे. 

वर्धा जिल्ह्यात एकूण २ लाख ९५ हजार ३४२ शिधापत्रिकाधारक आहेत. यामध्ये अंत्योदय योजनेचे ५० हजार २२७ व प्राधान्य गटातील २ लाख ४५ हजार ११५ शिधापत्रिकाधारकांचा समावेश आहे. जिल्हा पुरवठा विभागाकडून तपासणी केली जाते. 

लाभार्थी वंचित राहतातकाही ठिकाणी विभागाला अंधारात ठेवून गरज नसलेले लाभार्थीही धान्याची उचल करतात. त्यामुळे आता कार्डधारकांना ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. विशेषतः एखाद्या लाभार्थ्याचे निधन झाले असेल तर त्याचे नाव त्यातून वगळण्यात येणे गरजचे आहे. मात्र, काही वेळा ते महिनोमहिने वगळल्या जात नाही. यामुळे मात्र गरजू लाभार्थी धान्यापासून वंचित राहतात.

ई-केवायसी करणे आवश्यक स्वस्त धान्य दुकानातून धान्याची उचल करण्यासाठी रेशन कार्डधारकांना २८ फेब्रुवारीपर्यंत ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आतापर्यंत जवळपास ७० टक्के रेशन कार्डधारकांनी ई-केवायसी पूर्ण केली, तर अद्याप ३० टक्के रेशन कार्डधारक शिल्लक असून त्यांनी तातडीने ई-केवायसी करून घेणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांना रेशन कार्डवर धान्याचा लाभ घेता येणार नाही.

अनेकांचे कार्ड केले रद्दजिल्ह्यात मागील दोन वर्षांमध्ये अनेकांचे रेशन कार्ड रद्द करण्यात आले आहे. स्वस्त धान्याचा कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याला लाभ घेता येत नाही. हे धान्य केवळ गरिबांसाठी आहे. असे असतानाही कुणी रेशनच्या धान्याची उचल करीत असेल तर नियमानुसार त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी धान्य घेणे सोडून देणे आवश्यक आहे.

११ लाख ३९ हजार १४२ लाभार्थ्यांना मिळते रेशनचे धान्यजिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये एकूण २ लाख २५ हजार ३४२ रेशन कार्डधारक असून, त्यावर ११ लाख ३९ हजार १४२ लाभार्थी आहेत. त्यांना दरमहा सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे धान्याचे वितरण केले जाते. 

टॅग्स :wardha-pcवर्धा