शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

काँग्रेसने गांधी चरित्राचे आत्मचिंतन करून कार्य केल्यास त्यांचे भविष्य चांगले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 13:19 IST

काँग्रेसने गांधी चरित्राचे आत्मचिंतन करून तसूभर जरी काम केल्यास काँग्रेसचे भविष्य चांगले राहील, अशी टीका पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

ठळक मुद्देभाजपची गांधी संकल्प यात्रा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांवर कृती करून सरकार चालवित असल्याचा देखावाच काँग्रेसने केला. त्यामुळेच सध्या त्यांचे हे हाल झाले आहेत. गांधींच्या विचारावर त्यांनी कधीच सरकार चालविले नाही. महात्मा गांधी हे केवळ काँगे्रसचे नसून देशासह जगाकरिता आदर्श आहेत. काँग्रेसने गांधी चरित्राचे आत्मचिंतन करून तसूभर जरी काम केल्यास काँग्रेसचे भविष्य चांगले राहील, अशी टीका पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.भारतीय जनता पार्टीच्यावतीने गांधी जयंतीचे औचित्य साधून वर्धा शहरातून गांधी संकल्प यात्रा काढण्यात आली. या यात्रेची सांगता सिव्हील लाईन भागातील महात्मा गांधी पुतळा परिसरात झाली. यावेळी ना. बावनकुळे यांनी काँग्रेसच्या सेवा दलाच्यावतीने काढण्यात आलेल्या शांतीचा संदेश देणाऱ्या पदयात्रेच्या माध्यमातून टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले. समाजातील शेवटच्या घटकासाठी सरकारच्या पदाचा वापर आम्ही करण्याचा संकल्प या यात्रेच्या निमित्ताने केल्याचे याप्रसंगी ना. बावनकुळे यांनी स्पष्ट केले. या संकल्प यात्रेत खा. रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर, माजी आमदार दादाराव केचे, नगराध्यक्ष अतुल तराळे, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शिरीष गोडे, माधव कोटस्थाने, माजी खासदार विजय मुडे, अर्चना वानखेडे, न.प. उपाध्यक्ष प्रदीपसिंग ठाकूर, नगरसेवक निलेश किटे, जयंत सालोडकर, पवन राऊत, मिलिंद भेंडे, शरद आडे, वरुण पाठक, वंदना भूते यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी