शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
3
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
4
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
5
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
6
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
7
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
8
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
9
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
10
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
11
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
12
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
13
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
14
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
15
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
16
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
17
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
18
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
19
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
20
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."

काँग्रेसने गांधी चरित्राचे आत्मचिंतन करून कार्य केल्यास त्यांचे भविष्य चांगले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 13:19 IST

काँग्रेसने गांधी चरित्राचे आत्मचिंतन करून तसूभर जरी काम केल्यास काँग्रेसचे भविष्य चांगले राहील, अशी टीका पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

ठळक मुद्देभाजपची गांधी संकल्प यात्रा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांवर कृती करून सरकार चालवित असल्याचा देखावाच काँग्रेसने केला. त्यामुळेच सध्या त्यांचे हे हाल झाले आहेत. गांधींच्या विचारावर त्यांनी कधीच सरकार चालविले नाही. महात्मा गांधी हे केवळ काँगे्रसचे नसून देशासह जगाकरिता आदर्श आहेत. काँग्रेसने गांधी चरित्राचे आत्मचिंतन करून तसूभर जरी काम केल्यास काँग्रेसचे भविष्य चांगले राहील, अशी टीका पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.भारतीय जनता पार्टीच्यावतीने गांधी जयंतीचे औचित्य साधून वर्धा शहरातून गांधी संकल्प यात्रा काढण्यात आली. या यात्रेची सांगता सिव्हील लाईन भागातील महात्मा गांधी पुतळा परिसरात झाली. यावेळी ना. बावनकुळे यांनी काँग्रेसच्या सेवा दलाच्यावतीने काढण्यात आलेल्या शांतीचा संदेश देणाऱ्या पदयात्रेच्या माध्यमातून टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले. समाजातील शेवटच्या घटकासाठी सरकारच्या पदाचा वापर आम्ही करण्याचा संकल्प या यात्रेच्या निमित्ताने केल्याचे याप्रसंगी ना. बावनकुळे यांनी स्पष्ट केले. या संकल्प यात्रेत खा. रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर, माजी आमदार दादाराव केचे, नगराध्यक्ष अतुल तराळे, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शिरीष गोडे, माधव कोटस्थाने, माजी खासदार विजय मुडे, अर्चना वानखेडे, न.प. उपाध्यक्ष प्रदीपसिंग ठाकूर, नगरसेवक निलेश किटे, जयंत सालोडकर, पवन राऊत, मिलिंद भेंडे, शरद आडे, वरुण पाठक, वंदना भूते यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी