शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणात यायचे असते तर कधीच आलो असतो

By admin | Updated: October 25, 2015 02:05 IST

शेतकरी आत्महत्या करताहेत, त्यांना मदत करायचे काम मी हाती घेतले आहे. यात शासन काय करतेय, याचा विचार मी करीत नाही.

नाना पाटेकर : शासनाला ‘सॉफ्ट कॉर्नर’ नाहीवर्धा : शेतकरी आत्महत्या करताहेत, त्यांना मदत करायचे काम मी हाती घेतले आहे. यात शासन काय करतेय, याचा विचार मी करीत नाही. शासनाकडे मागण्यापेक्षा आपल्याला जे करता येते ते करायचे, असे ठरविले आहे. यात शासनाला सॉफ्ट कॉर्नर देण्याचा प्रश्नच नाही. मला राजकारणात यायचे असते तर कधीच आलो असतो; पण ते करायचे नाही. माणूस म्हणून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचं दु:ख वाटून घेण्याचा प्रयत्न करीत असल्याची ग्वाही नाम फाऊंडेशनचे नाना पाटेकर यांनी दिली.शेतकरी आत्महत्या या सदोष आर्थिक धोरणांचा परिपाक आहे. यात शेतकऱ्यांना मदत करून शासनाला सॉफ्ट कॉर्नर तर दिला जात नाही ना, या प्रश्नावर पत्रकार परिषदेत नाना उत्तर देत होते. अगदी मुद्यालाच हात घातल्याने थोडे वैतागून पाटेकर यांनी भूमिका स्पष्ट केली. मकरंद अनासपुरे यांनीही हे काम आताच करीत नाही तर यापूर्वीही शेतकरी कुटुंबांना मदत केल्याचे सांगितले. सरकार मोठं आहे. ते देतील तेव्हा मिळेल, आपल्याला काय करता येऊ शकते, याचा विचार नामच्या माध्यमातून केला जात असल्याचेही नानांनी सांगितले. सध्या नाम लहान आहे. तीनच महिन्यांपूर्वी या कामाला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांना हळूहळू हात घालणार आहे. हा किती लांब प्रवास आहे, हे माहिती नाही. यासाठी काही पुरस्कार नको की देवत्वही नको. माणूस म्हणून माणसांची मदत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याने नाना पाटेकर यांनी सांगितले. नामने दोंदलगाव, गोगलगाव या गावांत जलसंधारणाची कामे सुरू केली असून ती ८० टक्के पूर्ण झालीत. वर्धा जिल्ह्यातील आमला येथेही पाण्याचा तुटवडा आहे. तेथे काम सुरू झाले आहे. गावात किती बदल करता येऊ शकतो, हे पाहणार आहे. गावातील बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न केले जाणार आहे. गावातील विधवा, परित्यक्त्या यांच्यासाठी काही लघुउद्योगांची व्यवस्था होते काय, या दिशेनेही प्रयत्न होणार असल्याचे अनासपुरे म्हणाले. माणसांनी माणसांसाठी चालविलेला माणुसकीचा प्रयत्न म्हणजे नाम, अशी साधी, सरळ परिभाषा आमची आहे. लोकसहभागातून कामे केली जाणार आहेत. आम्ही शहरातून कामांसाठी माणसं आणणार नाही. श्रमदान करून आपले गाव आपल्यालाच बदलायचे आहे, असेही ते म्हणाले.(कार्यालय प्रतिनिधी) उत्तम पीक असतानाही हमी नाहीशनिवारी आमला या गावातील शेती पाहिली. आठ एकरामध्ये बऱ्यापैकी कपाशीचे पीक दिसत होते. यातून सुमारे ७० क्विंटल कापसाचे उत्पन्न होणार आहे; पण तेही परवडणारे नसल्याचे शेतकऱ्याने सांगितले. हे ऐकून आश्चर्य वाटले. मग, शेतकऱ्याने खर्चाचा हिशेब मांडला. एक एकराला किमान २५ हजार रुपये खर्च आहे. आठ एकराला दोन लाख रुपये आजपर्यंत खर्च झाला. ७० क्विंटल उत्पन्नातून चार हजार रुपये हमीभावाप्रमाणे दोन लाख ८० हजार रुपये मिळतील; म्हणजे वर्षभराची कमाई केवळ ८० हजार रुपये. त्यातही अन्य खर्च आहेतच. यावर मात करण्यासाठीही प्रयत्न केले जाणार असल्याचे पाटेकर यांनी सांगितले.आत्मिक समाधान मिळतेशेतकरी आत्महत्या करतात, हे विदारक आहे. त्या कुटुंबांना मदत करून आत्मिक समाधान मिळते; पण हे काम येथेच थांबणारे नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना कसा आळा घालता येईल, शेतकऱ्यांची स्थिती कशी सुधारता येईल, या दिशेने नामकडून काम केले जाणार आहे. यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक असल्याचेही नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी सांगितले.