शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

राजकारणात यायचे असते तर कधीच आलो असतो

By admin | Updated: October 25, 2015 02:05 IST

शेतकरी आत्महत्या करताहेत, त्यांना मदत करायचे काम मी हाती घेतले आहे. यात शासन काय करतेय, याचा विचार मी करीत नाही.

नाना पाटेकर : शासनाला ‘सॉफ्ट कॉर्नर’ नाहीवर्धा : शेतकरी आत्महत्या करताहेत, त्यांना मदत करायचे काम मी हाती घेतले आहे. यात शासन काय करतेय, याचा विचार मी करीत नाही. शासनाकडे मागण्यापेक्षा आपल्याला जे करता येते ते करायचे, असे ठरविले आहे. यात शासनाला सॉफ्ट कॉर्नर देण्याचा प्रश्नच नाही. मला राजकारणात यायचे असते तर कधीच आलो असतो; पण ते करायचे नाही. माणूस म्हणून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचं दु:ख वाटून घेण्याचा प्रयत्न करीत असल्याची ग्वाही नाम फाऊंडेशनचे नाना पाटेकर यांनी दिली.शेतकरी आत्महत्या या सदोष आर्थिक धोरणांचा परिपाक आहे. यात शेतकऱ्यांना मदत करून शासनाला सॉफ्ट कॉर्नर तर दिला जात नाही ना, या प्रश्नावर पत्रकार परिषदेत नाना उत्तर देत होते. अगदी मुद्यालाच हात घातल्याने थोडे वैतागून पाटेकर यांनी भूमिका स्पष्ट केली. मकरंद अनासपुरे यांनीही हे काम आताच करीत नाही तर यापूर्वीही शेतकरी कुटुंबांना मदत केल्याचे सांगितले. सरकार मोठं आहे. ते देतील तेव्हा मिळेल, आपल्याला काय करता येऊ शकते, याचा विचार नामच्या माध्यमातून केला जात असल्याचेही नानांनी सांगितले. सध्या नाम लहान आहे. तीनच महिन्यांपूर्वी या कामाला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांना हळूहळू हात घालणार आहे. हा किती लांब प्रवास आहे, हे माहिती नाही. यासाठी काही पुरस्कार नको की देवत्वही नको. माणूस म्हणून माणसांची मदत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याने नाना पाटेकर यांनी सांगितले. नामने दोंदलगाव, गोगलगाव या गावांत जलसंधारणाची कामे सुरू केली असून ती ८० टक्के पूर्ण झालीत. वर्धा जिल्ह्यातील आमला येथेही पाण्याचा तुटवडा आहे. तेथे काम सुरू झाले आहे. गावात किती बदल करता येऊ शकतो, हे पाहणार आहे. गावातील बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न केले जाणार आहे. गावातील विधवा, परित्यक्त्या यांच्यासाठी काही लघुउद्योगांची व्यवस्था होते काय, या दिशेनेही प्रयत्न होणार असल्याचे अनासपुरे म्हणाले. माणसांनी माणसांसाठी चालविलेला माणुसकीचा प्रयत्न म्हणजे नाम, अशी साधी, सरळ परिभाषा आमची आहे. लोकसहभागातून कामे केली जाणार आहेत. आम्ही शहरातून कामांसाठी माणसं आणणार नाही. श्रमदान करून आपले गाव आपल्यालाच बदलायचे आहे, असेही ते म्हणाले.(कार्यालय प्रतिनिधी) उत्तम पीक असतानाही हमी नाहीशनिवारी आमला या गावातील शेती पाहिली. आठ एकरामध्ये बऱ्यापैकी कपाशीचे पीक दिसत होते. यातून सुमारे ७० क्विंटल कापसाचे उत्पन्न होणार आहे; पण तेही परवडणारे नसल्याचे शेतकऱ्याने सांगितले. हे ऐकून आश्चर्य वाटले. मग, शेतकऱ्याने खर्चाचा हिशेब मांडला. एक एकराला किमान २५ हजार रुपये खर्च आहे. आठ एकराला दोन लाख रुपये आजपर्यंत खर्च झाला. ७० क्विंटल उत्पन्नातून चार हजार रुपये हमीभावाप्रमाणे दोन लाख ८० हजार रुपये मिळतील; म्हणजे वर्षभराची कमाई केवळ ८० हजार रुपये. त्यातही अन्य खर्च आहेतच. यावर मात करण्यासाठीही प्रयत्न केले जाणार असल्याचे पाटेकर यांनी सांगितले.आत्मिक समाधान मिळतेशेतकरी आत्महत्या करतात, हे विदारक आहे. त्या कुटुंबांना मदत करून आत्मिक समाधान मिळते; पण हे काम येथेच थांबणारे नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना कसा आळा घालता येईल, शेतकऱ्यांची स्थिती कशी सुधारता येईल, या दिशेने नामकडून काम केले जाणार आहे. यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक असल्याचेही नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी सांगितले.