शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंनी ज्याची सुपारी घेतली, त्याची वाजवावी तर लागेलच! जयंत पाटलांनी काढला फडणवीसांचा जुना व्हिडीओ
2
'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्यूत्तर; किनी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण
3
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
4
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा, आनंदाचा दिवस
5
बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता
6
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
7
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
8
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
9
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
10
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
11
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे
12
सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर; पुष्करसिंह धामी यांची टीका
13
४ जूनला भाजपा जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल: शशी थरूर, देशभरात हवा बदलल्याचा दावा
14
मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले
15
चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
16
पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले
17
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
18
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
19
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
20
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 

एसटी महामंडळाच्या १५०० कर्मचाऱ्यांवर उपासमारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 5:00 AM

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे परिवहन महामंडळाच्या एसटीचीही चाके जागीच थांबली होती. त्यामुळे महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडाले. याचा कर्मचाऱ्यांच्या वेतनावरही परिणाम झाला. आधीच कर्मचाऱ्यांना महामंडळाकडून तुटपुंजे वेतन दिले जाते. त्यातही कोरोनामुळे महामंडळाचे उत्पन्न बंद झाल्याने काही काळ कर्मचाऱ्यांना विनावेतनच राहावे लागले.

ठळक मुद्देदोन महिन्यांचे वेतन थकीत : वर्धा विभागातील स्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धा विभागांतर्गत कार्यरत १५०० कर्मचाऱ्यांचे वेतन मागील दोन महिन्यांपासून थकीत आहे. कोरोनामुळे आधीच संकटात असलेल्या कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ ओढवली आहे.कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे परिवहन महामंडळाच्या एसटीचीही चाके जागीच थांबली होती. त्यामुळे महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडाले. याचा कर्मचाऱ्यांच्या वेतनावरही परिणाम झाला. आधीच कर्मचाऱ्यांना महामंडळाकडून तुटपुंजे वेतन दिले जाते. त्यातही कोरोनामुळे महामंडळाचे उत्पन्न बंद झाल्याने काही काळ कर्मचाऱ्यांना विनावेतनच राहावे लागले.साडेचार-पाच महिन्यांच्या कालावधीनंतर जून महिन्यात जिल्हांतर्गत एसटीच्या मोजक्याच फेऱ्या सुरू झाल्या. दरम्यानच्या काळातही कर्मचाऱ्याना ५० टक्के म्हणजये निम्मेच वेतन देण्यात आले. त्यामुळे चालक, वाहक व इतर कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा मोठा सामना करावा लागला. पंधरवड्यापूर्वी एसटीची पूर्णक्षमतेने वाहतूक सुरू झाली आहे. मात्र, प्रवाशांचा प्रतिसाद अद्याप अल्पच आहे. त्यामुळे वर्धा विभागांतर्गत कार्यरत १५०० कर्मचाऱ्यांना ॲागस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांचे अद्याप वेतन न मिळाल्याने आर्थिक चणचण सोसावी लागत आहे. महामंडळानी वेतनाचा प्रश्न तातडीने निकाली काढत होणारी आर्थिक ओढाताण थांबवावी, अशी मागणी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे.उत्पन्नवाढीसाठी कर्मचाऱ्यांवर दबाव?कोरोना महामारीमुळे प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरविली. त्यामुळे महामंडळ तोट्यात आले आहे. परिणामी सद्यस्थितीत एसटी उत्पन्नवाढीसाठी दबाव आणला जात असल्याची माहिती एका चालकाने नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर दिली. तोट्याचे कारण दर्शवून अथवा कमी उत्पन्नाचे कारण पुढे करून वेतन प्रलंबित ठेवणे, अनियमितता असणे तसेच वेतनासोबत कर्ज कपातीमुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या हातात तोकडी रक्कम पडणार आहे. त्यामुळे एसटी कामगार चिंताग्रस्त आहेत. हीच परिस्थिती कायम राहिली तर उपजीविका कुणाच्या भरवशावर करावी, असा प्रश्न कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.वेतनावर महिन्याकाठी सव्वादोन कोटींचा खर्चवर्धा विभागांतर्गत वर्ध्यासह, आर्वी, पुलगाव, हिंगणघाट आणि तळेगाव (श्यामजीपंत) हे पाच आगार आहेत. या संपूर्ण आगारात १५०० च्या जवळपास कर्मचारी कार्यरत आहेत. कर्मचाऱ्यांच्या वेतनावर महिन्याकाठी महामंडळाकडून २ कोटी २५ लाखांचा खर्च होतो. मात्र, प्रवाशांनी पाठ फिरविल्याने अद्याप महामंडळ तोट्यात असल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याचा प्रश्न महामंडळापुढे निर्माण झाला असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून बोलले जात आहे.माता-पित्यांची फरपटअनेक एसटी कर्मचाऱ्यांकडे वयोवृद्ध माता-पिता असून त्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी कर्मचार्यांवरच आहे. वेतनाअभावी वयोवृद्ध माता-पित्यांचा औषधोपचार आणि नियमित तपासण्यांचा खर्च कोठून करावा, हा यक्ष प्रश्न त्यांच्यापुढे आहे.

टॅग्स :state transportएसटी