शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

एसटी महामंडळाच्या १५०० कर्मचाऱ्यांवर उपासमारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 05:00 IST

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे परिवहन महामंडळाच्या एसटीचीही चाके जागीच थांबली होती. त्यामुळे महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडाले. याचा कर्मचाऱ्यांच्या वेतनावरही परिणाम झाला. आधीच कर्मचाऱ्यांना महामंडळाकडून तुटपुंजे वेतन दिले जाते. त्यातही कोरोनामुळे महामंडळाचे उत्पन्न बंद झाल्याने काही काळ कर्मचाऱ्यांना विनावेतनच राहावे लागले.

ठळक मुद्देदोन महिन्यांचे वेतन थकीत : वर्धा विभागातील स्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धा विभागांतर्गत कार्यरत १५०० कर्मचाऱ्यांचे वेतन मागील दोन महिन्यांपासून थकीत आहे. कोरोनामुळे आधीच संकटात असलेल्या कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ ओढवली आहे.कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे परिवहन महामंडळाच्या एसटीचीही चाके जागीच थांबली होती. त्यामुळे महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडाले. याचा कर्मचाऱ्यांच्या वेतनावरही परिणाम झाला. आधीच कर्मचाऱ्यांना महामंडळाकडून तुटपुंजे वेतन दिले जाते. त्यातही कोरोनामुळे महामंडळाचे उत्पन्न बंद झाल्याने काही काळ कर्मचाऱ्यांना विनावेतनच राहावे लागले.साडेचार-पाच महिन्यांच्या कालावधीनंतर जून महिन्यात जिल्हांतर्गत एसटीच्या मोजक्याच फेऱ्या सुरू झाल्या. दरम्यानच्या काळातही कर्मचाऱ्याना ५० टक्के म्हणजये निम्मेच वेतन देण्यात आले. त्यामुळे चालक, वाहक व इतर कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा मोठा सामना करावा लागला. पंधरवड्यापूर्वी एसटीची पूर्णक्षमतेने वाहतूक सुरू झाली आहे. मात्र, प्रवाशांचा प्रतिसाद अद्याप अल्पच आहे. त्यामुळे वर्धा विभागांतर्गत कार्यरत १५०० कर्मचाऱ्यांना ॲागस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांचे अद्याप वेतन न मिळाल्याने आर्थिक चणचण सोसावी लागत आहे. महामंडळानी वेतनाचा प्रश्न तातडीने निकाली काढत होणारी आर्थिक ओढाताण थांबवावी, अशी मागणी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे.उत्पन्नवाढीसाठी कर्मचाऱ्यांवर दबाव?कोरोना महामारीमुळे प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरविली. त्यामुळे महामंडळ तोट्यात आले आहे. परिणामी सद्यस्थितीत एसटी उत्पन्नवाढीसाठी दबाव आणला जात असल्याची माहिती एका चालकाने नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर दिली. तोट्याचे कारण दर्शवून अथवा कमी उत्पन्नाचे कारण पुढे करून वेतन प्रलंबित ठेवणे, अनियमितता असणे तसेच वेतनासोबत कर्ज कपातीमुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या हातात तोकडी रक्कम पडणार आहे. त्यामुळे एसटी कामगार चिंताग्रस्त आहेत. हीच परिस्थिती कायम राहिली तर उपजीविका कुणाच्या भरवशावर करावी, असा प्रश्न कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.वेतनावर महिन्याकाठी सव्वादोन कोटींचा खर्चवर्धा विभागांतर्गत वर्ध्यासह, आर्वी, पुलगाव, हिंगणघाट आणि तळेगाव (श्यामजीपंत) हे पाच आगार आहेत. या संपूर्ण आगारात १५०० च्या जवळपास कर्मचारी कार्यरत आहेत. कर्मचाऱ्यांच्या वेतनावर महिन्याकाठी महामंडळाकडून २ कोटी २५ लाखांचा खर्च होतो. मात्र, प्रवाशांनी पाठ फिरविल्याने अद्याप महामंडळ तोट्यात असल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याचा प्रश्न महामंडळापुढे निर्माण झाला असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून बोलले जात आहे.माता-पित्यांची फरपटअनेक एसटी कर्मचाऱ्यांकडे वयोवृद्ध माता-पिता असून त्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी कर्मचार्यांवरच आहे. वेतनाअभावी वयोवृद्ध माता-पित्यांचा औषधोपचार आणि नियमित तपासण्यांचा खर्च कोठून करावा, हा यक्ष प्रश्न त्यांच्यापुढे आहे.

टॅग्स :state transportएसटी