शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

शेकडो हेक्टरवरील तूर पीक करपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2021 05:00 IST

अनेकांनी कपाशीच्या पिकातच तुरीची लागवड केल्यानंतर सुरुवातीला दिमाखात असणाऱ्या कपाशीच्या पिकावर बोंडअळी आली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कपाशीच्या पिकावर अनेकवेळा फवारणी करून बोंडअळी कमी होत नाही, तोच हिरव्यागार असलेल्या तुरीच्या झाडांना शेंगा पकडणे सुरू होताच गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे अनेकांच्या शेतातील तुरीचे पीक करपणे सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी लावलेले पैसेही निघणे कठीण झाल्याने शेतकरी चिंतातूर आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी :  मागील वर्षीप्रमाणे यंदाही सततच्या ढगाळ वातावरणामुळे शेकडो हेक्टरमधील तुरीचे पीक करपणे सुरू झाले आहे. सुरुवातीला तुरीचे पीक चांगलेच बहरलेले असल्याने यावर्षी तुरीचे उत्पादन चांगल्याप्रमाणे होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. त्यामुळे चांगले खत व फवारणी केली; परंतु गेल्या काही दिवसांपासून सतत ढगाळ वातावरणामुळे तूर पिकावर मर राेगाने आक्रमण केल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तालुक्यात शेकडो शेतकऱ्यांनी आपापल्या परीने शेतात तूर पिकाची पेरणी केली होती. अनेकांनी कपाशीच्या पिकातच तुरीची लागवड केल्यानंतर सुरुवातीला दिमाखात असणाऱ्या कपाशीच्या पिकावर बोंडअळी आली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कपाशीच्या पिकावर अनेकवेळा फवारणी करून बोंडअळी कमी होत नाही, तोच हिरव्यागार असलेल्या तुरीच्या झाडांना शेंगा पकडणे सुरू होताच गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे अनेकांच्या शेतातील तुरीचे पीक करपणे सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी लावलेले पैसेही निघणे कठीण झाल्याने शेतकरी चिंतातूर आहे.शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पूर्वीच्या पिकावर खर्च करून आता आपल्याला तुरीचे पीक चांगले होणार, या आशेत होते; मात्र अनेक परिसरात अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे तुरीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. दुसरीकडे परिसरामध्ये वन्यप्राण्यांचा धुमाकूळ सुरू असून, हाती आलेले पीक उद्ध्वस्त करीत असल्याचे दिसून येत आहे.

वातावरणाचा गव्हावर परिणाम

- गिरड : वातावरणाचा हरभरा व गव्हाच्या पिकावर परिणाम झाला आहे. गत पंधरा दिवसापासून वातावरणात बदल झाला असून ,ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे . बदलत्या वातावरणाचा तूर हरभरा व गव्हावर परिणाम झाल्याने शेतकरी वर्ग चिंतातुर आहे . सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाल्याने कापूस , सोयाबीन तूर आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले . यानंतर रब्बी हंगाम साथ देईल म्हणत शेतकऱ्यांनी गहू हरभरा ज्वारी  पिके घेतली पण सध्या स्थितीत हवामानात बदल झाला आहे . गट पंधरा दिवसांपासून धुई व ढगाळ वातावरण तयार होत आहे . यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर अळ्याचा प्रादुर्भाव झाला आहे . परिसरातील गिरड , मोहगाव , पिपरी , धोंडगाव , पिंपळगाव , ताडगाव , केसलापार भागातील शेतकऱ्यांनी रब्बी पिके मोठ्या प्रमाणात घेतली आहे . 

वीजपुरवठा खंडित करणे सुरूच  - मागील काही दिवसांपासून महावितरण कंपनीच्या थकीत बिलापोटी वीज खंडित करण्याची मोहीम सुरू केली आहे . परिसरातील शेतकरी आधीच रोगराई पडत असल्याने चिंतातुर आहे . अशा परिस्थितीत रब्बी हंगामातील पिकांना पाणी कसे द्यावे असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे . तात्पुरते काही प्रमाणात बिलाचे पैसे घेऊन सूट द्यावी अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहे

सध्या ढगाळ वातावरण असल्याने हाती आलेल्या तुरीच्या पिकावर पाणी फिरणार की काय, अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. हजारो रुपये खर्च करून तुरीचे पीक फवारणी व अनेक प्रकारची खते देऊन तयार केली. हिरव्यागार तुरीच्या झाडांना चांगल्याप्रमाणे तुरीच्या शेंगा पकडणे सुरू झाले होते. मात्र, ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने तुरीचे पीक होणार की नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.- विशाल बोके, शेतकरी, वाठोडा.

 

टॅग्स :agricultureशेती