शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पुलगाव शहर किती काळ उपेक्षित राहणार

By admin | Updated: May 12, 2017 00:58 IST

देशाच्या संरक्षणाची मोठी जबाबदारी सांभाळणारा आशिया खंडातील मोठा दारूगोळा भांडार येथे आहे.

संतप्त शहरवासीयांचा सवाल : प्रलंबित समस्यांकडे शासन, प्रशासनाचे दुर्लक्ष लोकमत न्यूज नेटवर्क पुलगाव : देशाच्या संरक्षणाची मोठी जबाबदारी सांभाळणारा आशिया खंडातील मोठा दारूगोळा भांडार येथे आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील शहर, नाचणगाव येथे असणारे वैभवशाली भोसलेकालीन वैभवाची साक्ष देणारी ऐतिहासिक वास्तू आहे. बंद पडलेला वस्त्रोद्योग असून पुलगाव तहसीलचा प्रश्न ताटकळत आहे. हे सर्व प्रश्न सुटत नसल्याने पुलगाव शहर आणखी किती काळ उपेक्षित राहणार, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. तालुक्यातील सर्वात मोठे शहर म्हणून गणल्या गेलेले पुलगाव व लगतचे भासलेकालीन इतिहासाची साक्ष देणारे नाचणगाव या गावाची लोकसंख्या जवळपास ६० हजारांवर आहे. इंग्रज राजवटीत या परिसराचे महत्त्व इंग्रजी शासनाला कळले म्हणून त्यांनी शहरा नजीकचे कवठा (रेल्वे) या गावात जिल्ह्याचे स्थान देऊन सोरटा येथे पोलीस ठाणे दिले. १८६५ च्या दरम्यान वर्धा नदीवर मोठा रेल्वे पूल बांधून या गावाला ब्रीज टाऊन पुलाचे गाव पुलगाव, असे नाव दिले. इंग्रजी सत्ता असताना या शहरातून त्यांनी पुलगाव-आर्वी नॅरोगेज मार्ग सुरू करून दळणवळणाचा मार्ग खुला केला. १८८९ साली नागपूरच्या बुटी परिवाराने या शहरात पुलगाव कॉटन मिल या वस्त्रोद्योगाची स्थापना केली. पूढे १९०२ मध्ये पुलगाव नगर परिषदेची स्थापना झाली. शहराची भौगोलिक स्थिती पाहता १९४२ साली आशिया खंडातील सर्वात मोठ्या केंद्रीय दारूगोळा भांडाराची स्थापना करण्यात आल्यानंतर या शहराला विकासाची गती आली. यामुळे दिल्लीच्या गोलियन कंपनीद्वारे विदर्भ सुपर फॉस्फेट या खत कारखान्याची स्थापना करून शेकडोंना रोजगार मिळवून दिला; पण मागील दोन दशकात राजकीयदृष्ट्या संवेदनशील शहराकडे राजकीय नेत्यांनी पाठ फिरविली व या शहराच्या विकासाला खीळ बसली. विदर्भ सुपर फॉस्फेट खत कारखाना बंद पडला. तो बिलासपूर फर्टिलाईझर कपंनीद्वारे विकत घेत पुन्हा २०० कामगारांना रोजगार मिळाला असला तरी आज हा कारखानाही बंद पडण्याचे मार्गावर आहे. ३५०० कामगारांना रोजगार देणारा पुलगाव कॉटन मिल २००३ मध्ये बंद पडला. दशकापूर्वी तोच वस्त्रोद्योग जयभारत टेक्सटाईल्स नावाने नव्याने सुरू होऊन जवळपास ४०० युवकांना रोजगार मिळाला असला तरी आर्थिकदृष्ट्या डबघाईस आला आहे. एक दशकापुर्वी पुलगाव-आर्वी रेल्वे गाडी बंद झाली. ती सुरू करणे दूरच; पण १० वर्षांपासून नवजीवन व ओखापूरी एक्स्प्रेसला पुलगाव रेल्वे स्थानकावर थांबा देण्याची मागणी प्रलंबित आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.