शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादन व हमीभाव कमी असताना उत्पन्न दुप्पट कसे होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 23:46 IST

शेतमालाचे उत्पादन कमी व त्यांचे बाजारभावही कमी असताना सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होईल. हा संपूर्ण प्रकार म्हणजे केंद्र व राज्य सरकारची एक लोणकढी थाप असल्याचे प्रतिपादन शेतकरी नेते विजय जावंधीया यांनी केले.

ठळक मुद्देविजय जावंधिया : शेतकरी व शेतमजुरांच्या मेळाव्यात मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : शेतमालाचे उत्पादन कमी व त्यांचे बाजारभावही कमी असताना सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होईल. हा संपूर्ण प्रकार म्हणजे केंद्र व राज्य सरकारची एक लोणकढी थाप असल्याचे प्रतिपादन शेतकरी नेते विजय जावंधीया यांनी केले. ते येथील शेतकरी व शेतमजूरांच्या मेळाव्यात अध्यक्षीय मार्गदर्शन करताना बोलत होते.रोहणा येथील युवा शेतकरी मंचच्यावतीने शेतकरी व शेतमजूरांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर साहित्यिक तथा लेखक डॉ. वासुदेव डहाके, सरपंच सुनील वाघ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.जावंधिया पुढे म्हणाले, सरकारने मुक्त अर्थव्यवस्था सन १९९७ पासून स्वीकारताना शेतकरी आपला माल आंतरराष्ट्रीय बाजारात नेवून चांगले भाव मिळवू शकतो, असे स्वप्न दाखविले. परंतु, कोणताच शेतकरी आपला शेतमाल तेथपर्यंत नेवू शकला नाही. परिणामी, उत्पादक शेतकरी कर्जबाजारी झाला. अन् मधले दलाल व मालामाल झाले आहेत. त्यातच शेतकºयांच्या आत्महत्या सुरू झाल्या. या थांबावयाचे नाव घेत नाही. आंतराष्ट्रीय बाजारात सध्या साखेरेचे भाव २४ रूपये प्रती किलो असताना आपल्याला साखर ४० ते ४२ रूपये भावाने घ्यावी लागत आहे. यासाठी शरद पवार विविध आयुधाचा वापर करीत शासनावर दबाव टाकतात. शिवाय कापसाचा भाव न परवडणारा असताना त्यासाठी आपण काहीच कां करीत नाही, असा सवाल त्यांनी यावेळी राष्ट्रीवादीला केला.शेतमालाचे भाव पडत असताना सरकारला सबसिडी मागणे हा शेतकऱ्यांचा हक्क आहे, ती भिक नाही. या गोष्टी युवा शेतकºयांनी समजून घेवून आता आपल्या मागण्यांची व आंदोलनाची दिशा बदलवणे गरजेचे आहे. कर्मचाऱ्यांसाठी दर १० वर्षांनी वेतन आयोगाचा विचार होतो. पाचव्या वेतन आयोगात शासनातील चपराश्याला पगार २ हजार ५०० रूपये होता. तो सहाव्या वेतन आयोगात ७ हजार झाला. तर दहा वर्षांनी कर्मचऱ्यांचा पगार तिप्पट होत असताना सन १९७४ मध्ये गव्हाचा भाव ७४ रूपये प्रती क्विंटल होता. कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीच्या वेगाने गव्हाचा भाव. वाढला असता तर तो सन २०१४ मध्ये सहा हजार प्रती क्विंटल गव्हाला पाहिजे होता; पण आज २०१८ मध्येही गव्हाला १ हजार ५०० ते १ हजार ७०० रूपयेच भाव मिळत आहे. याचा अभ्यास युवा शेतकऱ्यांनी करून यासाठी लढा उभारणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.एकेकाळी आमच्या सोबत कापसाला ७ हजार रूपये भाव मागणारे आजचे राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल सध्या शेतमालाचे हमीभाव शेतकऱ्यांना फायद्यात आणणारे असल्याचे सांगतात. तेव्हा सत्ता मिळाली की, लोकप्रतिनिधी देखील शेतकऱ्यांना कसे विसरतात हे शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी उपस्थितांच्या लक्षात आणून दिले. मेळाव्याचे संचालन युवा शेतकरी हितेंद्र बोबडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार भारत शेंडे याने मानले. मेळाव्याला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.सत्ताधाऱ्यांवर ओढले ताशेरेयेथील शेतकरी व शेतमजुरांच्या मेळाव्यात शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी सत्ताधाऱ्यांवर चांगलेच ताशेरे ओढले. यावेळी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांसह शेतमजुरांना शासनाने दिलेली विविध आश्वासने कशी शेतकऱ्यांच्याच विरोधात जातात याची माहिती उदाहरणे देत दिली. शिवाय त्यांनी शेतकऱ्यांनी व शेतमजुरांनी एकत्र येण्याचे आवाहन केले.