शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

रुग्णालय फुल्ल; गालफुगीच्या साथीने चिमुकले हैराण

By admin | Updated: February 17, 2016 01:38 IST

वातावरण बदलाच्या काळात विषाणूजन्य आजार डोकेवर काढतात. सद्य:स्थितीत गालफुगी हा आजार बळावला असून

वर्धा : वातावरण बदलाच्या काळात विषाणूजन्य आजार डोकेवर काढतात. सद्य:स्थितीत गालफुगी हा आजार बळावला असून रुग्णसंख्येत वाढ होत आहे. प्रामुख्याने या विषाणंूची लागण लहान मुलांना अधिक प्रमाणात होत असल्याने बाह्य रूग्ण विभागात गत काही दिवसांपासून असे रूग्ण वाढत आहे. हा संसर्गजन्य आजार असल्याने वेळीच उपाययोजना करून आजार पसरविण्यास प्रतिबंध करणे गरजेचे ठरत आहे.गालफुगी या आजाराची लागण झालेल्या रुग्णाला ताप येतो. यासह पोटदुखी, उलटी होणे, जेवण कमी होणे, अशी लक्षणे आढळतात. शून्य ते दहा वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये हा आजार आढळतो. सध्या दमट वातावरण असल्याने विषाणूंच्या वाढ होत आहे. परिणामी विषाणूजन्य आजार बळावतात. हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहुल लागत आहे. त्यामुळे या काळात हे विषाणू फोफावत आहे. या आजारामुळे रुग्णाच्या जीवितास धोका नसतो. तरी शरीराच्या अपयांवर दुरगामी परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळीच उपचार करणे महत्त्चाचे ठरते. रुग्णाला वेळीच उपचार न मिळाल्यास विषाणूंचा प्रकोप वाढू शकतो. स्वादुपिंड, अंडाशय आणि मेंदुवर परिणाम होऊन भविष्यात व्याधी जडण्याचा धोका असतो. या आजाराची लक्षणे आढळताच डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावेत. त्यामुळे आजारावर नियंत्रण मिळविता येते. हा संसर्गजन्य आजार असून श्वासावाटे अथवा थुंकीवाटे याचा प्रसार होतो. रुग्णाला सार्वजनिकस्थळी घेऊन जाणे टाळावे. चार पाच दिवस घरीच आराम केल्यास रुग्णाला आराम होतो.(रूथानिक प्रतिनिधी)आजाराची लक्षणे४गालफुगी हा विषाणूजन्य आजार आहे. या आजाराच्या विषाणुची लागण झाल्यावर रूग्णाला ताप येतो. कानाच्या मागे गाठ येते. पॅरॉटीड या ग्रंथीवर हे विषाणू परिणाम करतात. साधारणत: चार ते पाच दिवसांपर्यंत या आजाराचा प्रभाव असतो. विषाणूंचा प्रभाव वाढताच रूग्ण तापाने फणफणतो. पोटदुखी, उलट्या होतात. कानाजवळील गाठीची वाढ होऊन गालावर सुजन येत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.प्रतिबंधात्मक उपाय४रूग्णांमध्ये या आजाराची लक्षणे आढळल्यास सार्वजनिक स्थळी पाठवू नये. या आजाराचे प्रमाण मुख्यत्वे लहान मुलांमध्ये आढळत असल्याने चार-पाच दिवस मुलांना शाळेत पाठवू नये. ४वेळीच उपचार करून घ्यावेत. यामुळे रुग्णाला होणाऱ्या शारीरिक बाधांपासून बचाव करता येतो. संसर्गजन्य आजार असल्याने गर्दीच्या स्थळी जाणे टाळावे. यामुळे इतरांना आजाराची लागण होणार नाही. शिवाय या आजाराचे प्रमाण लहान मुलांमध्ये अधिक असल्याने मुलांना शाळेत, शिकवणी वर्गाला न पाठवता घरीच आराम करू द्यावा, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले.वातावरण बदलाच्या काळात विषाणूजन्य आजार बळावतात. सध्या गालफुगी आजाराचे रुग्ण वाढत आहे. या काळात पालकांनी विशेष खबरदारी घेत मुलांना सार्वजनिक स्थळी घेवून जाणे टाळावे, तसेच आजारासंबंधी लक्षणे आढळल्यास त्वरीत उपचार करून घ्यावेत.- डॉ. सचिन पावडे, बालरोग तज्ज्ञ, वर्धा