शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

जिल्हा बँक खातेदाराच्या आशा पल्लवित

By admin | Updated: October 15, 2015 02:28 IST

नाबार्डच्या अहवालानुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ७ टक्के भांडवल पर्याप्तता (सीआरएआर) साध्य करण्यासाठी ५० कोटी ३७ लाख रुपयांचे अर्थसाह्य गरजेचे होते.

वर्धा : नाबार्डच्या अहवालानुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ७ टक्के भांडवल पर्याप्तता (सीआरएआर) साध्य करण्यासाठी ५० कोटी ३७ लाख रुपयांचे अर्थसाह्य गरजेचे होते. पैकी २०१५-१६ या वर्षात काही अर्थसाह्य उपलब्ध केले आहे. उर्वरित अर्थसाह्य देण्याच्या शासनाच्या निर्णयाने खातेदारांच्या आशा पल्लवित झाल्या. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने रिझर्व्ह बॅँकेच्या निकषांची पूर्तता न केल्याने परवाना दिला नव्हता. परिणामी, पीककर्ज देणे अशक्य होते. बॅँकींग परवाना प्राप्तीसाठी जिल्हा बँकांना भांडवल पर्याप्तता साध्य करणे गरजेचे होते. त्यासाठी शासनाने मार्च २०१५ मध्ये ११० कोटी रुपये दिले. जूनमधील नाबार्डच्या तपासणीत बँकेला ५० कोटी ३७ लाख रुपये गरजेचे असल्याचे लक्षात आले. शासनाने नागपूर, बुलडाणा व वर्धा या बँकांना ६५ कोटी ९८ लाख २०१५-१६ या वर्षात उपलब्ध केले असून उर्वरित ७९ कोटी ११ लाख रूपये मंजूर केले. परिणामी, बँकेला पीक कर्ज देणे शक्य होणार आहे; पण नवीन ठेवी स्वीकारण्यास रिझर्व्ह बॅँकेने निर्बंध घातले आहेत.(कार्यालय प्रतिनिधी)