शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
4
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
5
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
6
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
7
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
8
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
9
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
10
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
11
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
12
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
13
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
14
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
15
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
16
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
17
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
18
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
19
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
20
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?

जिल्हा बँक खातेदाराच्या आशा पल्लवित

By admin | Updated: October 15, 2015 02:28 IST

नाबार्डच्या अहवालानुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ७ टक्के भांडवल पर्याप्तता (सीआरएआर) साध्य करण्यासाठी ५० कोटी ३७ लाख रुपयांचे अर्थसाह्य गरजेचे होते.

वर्धा : नाबार्डच्या अहवालानुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ७ टक्के भांडवल पर्याप्तता (सीआरएआर) साध्य करण्यासाठी ५० कोटी ३७ लाख रुपयांचे अर्थसाह्य गरजेचे होते. पैकी २०१५-१६ या वर्षात काही अर्थसाह्य उपलब्ध केले आहे. उर्वरित अर्थसाह्य देण्याच्या शासनाच्या निर्णयाने खातेदारांच्या आशा पल्लवित झाल्या. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने रिझर्व्ह बॅँकेच्या निकषांची पूर्तता न केल्याने परवाना दिला नव्हता. परिणामी, पीककर्ज देणे अशक्य होते. बॅँकींग परवाना प्राप्तीसाठी जिल्हा बँकांना भांडवल पर्याप्तता साध्य करणे गरजेचे होते. त्यासाठी शासनाने मार्च २०१५ मध्ये ११० कोटी रुपये दिले. जूनमधील नाबार्डच्या तपासणीत बँकेला ५० कोटी ३७ लाख रुपये गरजेचे असल्याचे लक्षात आले. शासनाने नागपूर, बुलडाणा व वर्धा या बँकांना ६५ कोटी ९८ लाख २०१५-१६ या वर्षात उपलब्ध केले असून उर्वरित ७९ कोटी ११ लाख रूपये मंजूर केले. परिणामी, बँकेला पीक कर्ज देणे शक्य होणार आहे; पण नवीन ठेवी स्वीकारण्यास रिझर्व्ह बॅँकेने निर्बंध घातले आहेत.(कार्यालय प्रतिनिधी)