शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

कर्जमाफ ीच्या अध्यादेशाची होळी

By admin | Updated: June 22, 2017 00:03 IST

कर्जमाफीला तत्वत: व निकषांच्या आधारे मान्यता, बी-बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना दहा हजार रुपये तातडीचे कर्ज देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

काँग्रेसचे आंदोलन : चांदूरबाजार, तिवसा, अंजनगाव व दर्यापुरात कार्यकर्ते एकवटले अमरावती : कर्जमाफीला तत्वत: व निकषांच्या आधारे मान्यता, बी-बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना दहा हजार रुपये तातडीचे कर्ज देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तसा अध्यादेश शासनाने काढला आहे. ही शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक असून सरकारने कर्जमाफ ीचा केवळ ‘फ ार्स’ चालविल्याचा आरोप करीत काँग्रेसने तिवसा, चांदूरबाजार, दर्यापूर व अंजनगावात बुधवारी आंदोलन केले. कर्जमाफीचा जीआर जाळून शासन निर्णयाचा निषेध नोंदविण्यात आला. तिवसा : तालुका काँग्रेसच्यावतीने तहसील प्रशासकीय इमारत परिसरात आंदोलन करून शासनाच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला. भाजप शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप करीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शासनविरोधी घोषणा दिल्यात. बँकेने अद्याप शेतकऱ्यांना पीककर्ज दिलेले नाही. सुकाणू समितीच्या बैठकी सुरूच आहेत. शेतकरी संप थांबावा, यासाठी केवळ घोषणाबाजी केली जात असल्याचा आरोप यावेळी केला. तिवसा येथे नाफेडमार्फत अनेक शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले असून तूर खरेदी झालेली नाही. अनेक शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळाले नाहीत, असा आरोपही करण्यात आला. यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष मुकुंद देशमुख, दिलीप काळबांडे, वैभव वानखडे, सागर राऊत, रामदास मेहत्रे, नरेंद्र विघ्ने, दीपक पावडे, उपस्थित होते.चांदूरबाजार : येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. शासनाने कर्जमाफी व तत्काळ दहा हजार रूपये देण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, या निर्णयातील अटी व निकषांमुळे सर्वसाधारण व गरीब शेतकरी यापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे शासननिर्णयाचा विरोध करण्यासाठी तहसील कार्यालयासमोर शासन निर्णयाची होळी करण्यात आली. सोबतच एक निषेध निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी बाजार समिती सभापती अरविंद लंगोटे, शिवाजी बंड, किशोर देशमुख, बाबूभाई इनामदार, बाबूराव जवंजाळ, छोटू देशमुख, विलास गांजरे, भय्या काळे, विशाल बेले, प्रवीण वाघमारे, नंदू भोयर,संजय म्हाला, प्रमोद घुलक्षे नजीम बेग, भाई देशमुख यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.दर्यापूर : तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने उपविभागीय अधिकारी व तहसीलदार अमोल कुंभार यांना शासनाच्या अध्यादेशाचे निवेदन देत तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर शासनाच्या जीआरची होळी करण्यात आली. यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष सुधाकर भारसाकळे, बाळासाहेब हिंगणीकर, अभिजीत देवके, सुनील गावंडे बबनराव देशमुख, शशांक धर्माळे, साहेबराव बदे, राजिकभाई, राजू वानखडे, अविनाश ठाकरे, केशव भडांगे, दिलीप चव्हाण उपस्थित होते.अंजनगाव सुर्जी : येथील तहसील कार्यालयासमोर तालुकाध्यक्ष राजेंद्र आडे यांच्या नेतृत्वात शासनाच्या अध्यादेशाची होळी करण्यात आली. हरिभाऊ बहिरे, सत्यविजय निपाने, हिम्मत ढोक, विनोद देशमुख, मुरलीधर तुरखडे, सुभाष चौखंडे, ज्ञानेश्वर मुरतकर, दिलीप देशमुख, रवि बोंदरे, फरहाज भाई, एकनाथ निचळ, नितीन निमकाळे, प्रफु ल्ल ढोक, दीपक हरणे, राहुल पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.