शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

ऐतिहासिक भोसलेकालीन विहीर घाणीच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 00:30 IST

येथील जुन्यावस्तीतील रामदरा वॉर्ड क्र. ४ मध्ये भोसलेकालीन ऐतीहासिक विहीर आहे. परंतु त्याला सध्या अस्वच्छतेचा विळखा असून त्याकडे ग्रा. पं. प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. ग्रा.पं. प्रशासनाने हा परिसर व विहीर स्वच्छ केल्यास भविष्यातील जलसंकटावर मात करता येऊ शकते,

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : पाणी समस्येवर मात होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पं.) : येथील जुन्यावस्तीतील रामदरा वॉर्ड क्र. ४ मध्ये भोसलेकालीन ऐतीहासिक विहीर आहे.परंतु त्याला सध्या अस्वच्छतेचा विळखा असून त्याकडे ग्रा. पं. प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. ग्रा.पं. प्रशासनाने हा परिसर व विहीर स्वच्छ केल्यास भविष्यातील जलसंकटावर मात करता येऊ शकते, असे बोलले जात असून त्याकडे संबंधितांनी लक्ष देण्याची मागणी आहे.मागील वर्षी सदर विहिरीचे तोंड बांधुन त्यावर लोखंडी जाळी बसविण्यात आली. परंतु, विहिरीच्या तळापर्यंत जाण्यासाठी असलेल्या पायऱ्यांच्या आवारात सध्या घाणीने कळस गाठला आहे. यंदाच्या वर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने घागर-घागर पाण्यासाठी भटकंतीच करावी लागणार आहे. असे असताना गावातील भोसले कालीन विहिरीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने ग्रा.पं.च्या कार्यप्रणालीवरच प्रश्न उपस्थित केले जात आहे. सदर विहीर नदीच्या काठा लगत असून विहिरीतील पाणी उन्हाळ्यातही पाहिजे तसे खोल जात नसल्याचे गावातील वयोवृद्ध सांगतात. ग्रा. पं. प्रशासनाने भविष्यातील जलसमस्या लक्षात घेवून सदर विहीर स्वच्छ करून विहिरीचा परिसरही स्वच्छ करावा, अशी मागणी गावातील सुजान नागरिकांची आहे.श्यामजीपंत महाराजांचा इतिहासअनेक वर्षा इतिहास असलेल्या या भोसलेकालीन विहीर वजा वास्तुला श्यामजीपंत महाराज यांचा इतिहास जुळला आहे. यामुळे गावाला श्यामजीपंताचे तळेगांव अशी ओळख असल्याचे गावातील वयोवृद्ध सांगतात. या विहिरीचे जतन करून सदर परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात यावे, अशी मागणी आहे.

टॅग्स :Waterपाणी