शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध
3
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
4
"इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
5
पहलगाम म्हणजे काश्मीराचा स्वर्ग; हिरव्यागार दऱ्या आणि खळकळणाऱ्या नद्या; पर्यटक का करतात हजारो खर्च?
6
हॉटेल बाहेर बसलेले, गोळी लागली,अर्धा तास मदत मिळाली नाही;पुण्यातील पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं?
7
Terrorist Attack: महाजन श्रीनगरला रवाना, तीन मंत्री विमानतळावर; मुख्यमंत्री कार्यालयाने काय माहिती दिली?
8
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
9
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
10
Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
11
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
12
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
13
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
14
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
15
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
16
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
17
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
18
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
19
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
20
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी

हिंगणघाटकर जागविणार ‘ब्रिटिश’ अधिकाऱ्याच्या स्मृती; वर्धा जिल्ह्यात तब्बल १३ वर्षे होते वास्तव्यास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 12:12 IST

कर्नल विल्यम लॅम्बटन यांचा स्मृतिदिन समाधिस्थळी होणार साजरा

वर्धा : ग्रेट ट्रिग्नामेट्रिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे जनक कर्नल विल्यम लॅम्बटन या ऐतिहासिक पुरुषाचे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात तब्बल १३ वर्षे वास्तव्य होते. इतकेच नव्हे तर त्यांनी अखेरचा श्वासही हिंगणघाट शहरातच घेतला. त्यांच्या मृत्यूला २० जानेवारी २०२३ रोजी २०० वर्षे पूर्ण होत असल्याने त्यांचे महान कार्य लक्षात घेता हिंगणघाटातील त्यांच्या समाधिस्थळी त्यांचा स्मृतिदिन साजरा करणार आहे.

कर्नल विल्यम लॅम्बटन यांचा जन्म १७५३ मध्ये उत्तर यॉर्कशायरमधील नॉर्थ अलर्टनजवळ क्रासबेग्रेंज येथे शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी भारतीय सर्वेक्षणाची सुरुवात चेन्नईजवळच्या सेंट थॉमस पर्वतापासून १० एप्रिल १८०२ मध्ये केली होती. ते सर्वेक्षण इतिहासातील सर्वांत मोठे साहसी, महत्त्वाकांक्षी आणि गणितीयदृष्ट्या अत्यंत किचकट असे व्यक्तिमत्त्व होते. हिंगणघाट येथे १३ वर्षे वास्तव्यास असताना वयाच्या ७० व्या वर्षी २० जानेवारी १८२३ रोजी येथे अनपेक्षितरीत्या त्यांचा मृत्यू झाला. आजवर त्यांची समाधी दुर्लक्षित होती. मात्र, त्यांचे महान कार्य लक्षात घेता शहरातील दुर्लक्षित ऐतिहासिक ठेव्याचे जतन व्हावे, तसेच त्यांची माहिती राष्ट्रीयस्तरावर पोहोचविण्यासाठी शहरातील सामाजिक संस्था, लोक प्रसारक मंडळ, निसर्ग साथी फाउंडेशन, पर्यावरण संस्था, वणा नदी संवर्धन या संस्थांनी पुढाकार घेऊन नगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने विविध कार्यक्रम राबवून त्यांचा स्मृतिदिन साजरा करणार आहे.

जनजागृतीसाठी निघाली होती सायकल रॅली

कर्नल विल्यम लॅम्बटन यांच्या द्विशताब्दी समारोहानिमित्त जनजागृती व्हावी यासाठी शहरातून सायकल रॅली काढण्यात आली. शहरातील मुख्य मार्गाने फिरून त्यांच्या स्मृतिस्थळावरील समाधीला गुलाबपुष्प अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. रॅलीत विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी व लोकप्रतिनिधी तसेच समाजसेवकांची उपस्थिती होती.

दुर्लक्षित समाधिस्थळाचा जागतिक स्तरावर करणार प्रसार : कुणावार

कर्नल विल्यम लॅम्बटन यांचे कार्य सदैव स्मरणात राहणारे आहे. याची माहिती जिल्हाभर नव्हे, तर राष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कर्नल विल्यम यांच्या द्विशताब्दी कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार रामदास तडस, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना निमंत्रित करणार आहे. त्यासाठी विविध समित्या गठित केल्या जाणार आहेत, असे आमदार समीर कुणावार यांनी सांगितले.

टॅग्स :SocialसामाजिकHinganghatहिंगणघाटwardha-acवर्धा