शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

चार वर्षांत यंदा सर्वाधिक पीककर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 05:00 IST

दरवर्षीप्रमाणे २०२०-२१ या हंगामाकरिता जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत आणि ग्रामीण अशा एकूण १४३ बँकांना खरिपामध्ये ९२५ कोटीचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले. यंदा कर्जमाफीची घोषणा झाल्याने जिल्ह्यातील ५० हजार ३७८ शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला. त्यांना ४४६ कोटी ७१ लाखांची कर्जमाफी देण्यात आली.

ठळक मुद्देकर्जमाफीचा परिणाम : खरिपात ६४.१५ टक्के उद्दिष्टपूर्ती, ५८ हजार ७१७ शेतकऱ्यांना मिळाला लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांना खरीप व रबी हंगामाकरिता पीककर्ज उपलब्ध करुन देण्यास नेहमीच बँकांकडून टाळाटाळ केली जाते. त्यामुळे शेतकºयांना सावकरापुढे हात पसरावे लागत असल्याने त्यातून त्यांची सुटका अशक्य होते. कर्जाचा वाढता डोंगर लक्षात घेता शासनाने यावर्षी महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना अंमलात आणली. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याने त्यांचा सातबारा कोरा होताच नव्याने पीककर्ज घेण्यासाठी ते पात्र ठरले. परिणामी गेल्या चार वर्षाच्या तुलनेत यंदा पीककर्ज वाटपाचा टक्का वाढून तो ६४.१५ वर पोहोचला आहे.शेतकऱ्यांना दरवर्षीच निसर्ग कोप आणि शेतमालाला मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे आर्थिक संकटाशी दोन हात करावे लागतात. गेल्या तीन वर्षांपासून शेतकरी अस्मानी-सुलतानी संकटाचा सामना करीत आल्याने बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यास शेतकरी असमर्थ ठरला. त्यामुळे बँकांची थकबाकी राहिल्याने नवीन पीककर्ज मिळण्याचे मार्ग बंद झाले.दरवर्षीप्रमाणे २०२०-२१ या हंगामाकरिता जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत आणि ग्रामीण अशा एकूण १४३ बँकांना खरिपामध्ये ९२५ कोटीचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले. यंदा कर्जमाफीची घोषणा झाल्याने जिल्ह्यातील ५० हजार ३७८ शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला. त्यांना ४४६ कोटी ७१ लाखांची कर्जमाफी देण्यात आली.तसेच १० हजार ४४७ शेतकऱ्यांच्या पीककर्जाचे पुणर्गठण करुन त्यांना १२७ कोटी २७ लाख रुपयांचा लाभ देण्यात आला. यावर्षी खरिपाकरिता आतापर्यंत ५८ हजार ७१७ शेतकऱ्यांना ५९३ कोटी ३५ लाख रुपयांचे पीककर्ज देण्यात आले आहे. यावर्षीही सुरुवातीपासून कोरोनाकाळ, अतिवृष्टी, परतीचा पाऊस आणि किडीचा प्रादुर्भाव असल्याने शेतकºयांवर संकटाची गडद छाया कायम आहे.कापसाचा पेरा कमी झाल्याने कर्ज वाटपाची रक्कमही घटलीकापूस हे नगदी पीक असल्याने कापसाच्या पेऱ्याचा अंदाज घेऊनच दरवर्षी पीककर्ज वाटपाच्या उद्दिष्टे ठरविले जातात. एका कापूस उत्पादकाला अंदाजे १ लाख २० हजार रुपयांप्रमाणे पीककर्जाची रक्कम निश्चित केली जाते. मात्र, यावर्षी ३० हजार हेक्टरने कपाशीचे क्षेत्र कमी झाल्याने एका खातेधारकाला १ लाख ८०० रुपयेप्रमाणे कर्ज वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे मागिलवर्षी ९८० कोटीचे उद्दिष्ट असताना यावर्षी ते कमी करुन ९२५ कोटी करण्यात आले आहे.रब्बीकरिता १०४ कोटींचे उद्दिष्टखरिपात शेतकऱ्यांना मोठा फटका बसल्याने रबी पिकांतून चांगले उत्पन्न अपेक्षित आहे. शेतकऱ्यांनी रबीची तयारी सुरु केली असून रबी करिता बँकांना १०३ कोटी ९६ लाखांच्या पीककर्जाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. अद्याप एकाही बँककडून रबीकरिता पीककर्ज वाटप झालेले नाहीत. बँकांनी शेतकऱ्यांची अडवणूक न करता पीककर्ज देण्याची गरज आहे.कर्जमाफीमुळे निश्चितच यावर्षी पीककर्ज वाटपाचा टक्का वाढला आहे. जिल्ह्यातील बँकांना यावर्षी ९२५ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. आतापर्यंत ५९३ कोटी ३५ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप झाले असून हा आकड आणखी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या तीन वर्षाच्या तुलनेत यावर्षी सर्वाधिक कर्जवाटप झाले आहे.गौतम वालदे, जिल्हा उपनिबंधक, वर्धा

टॅग्स :Crop Loanपीक कर्जFarmerशेतकरी