शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भदाडीच्या पुरात पीक गेलं वाहून; शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं, वीज तार तोंडात घेऊन जीवन संपवलं

By महेश सायखेडे | Updated: August 20, 2022 13:03 IST

अंकुरलेल्या पिकाची बऱ्यापैकी वाढ होत असतानाच अतिवृष्टीमुळे भदाडी नदीच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली.

वर्धा - यंदा अतिवृष्टीमुळे वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. याच नुकसानीची सुरुवातीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नंतर केंद्रीय पथक तर शुक्रवारी राज्याचे कृषी मंत्री अब्दूल सत्तार यांनी पाहणी केली. हवालदील शेतकऱ्यांना शासकीय मदतीची प्रतीक्षा असल्याच्या पार्श्वभूमीवर भदाडी नदीच्या पुरात पीक खरडून गेलेल्या एका शेतकऱ्याने थेट विद्युत तार तोंडात घेऊन जीवनयात्रा संपविल्याचे पुढे आले आहे. गणेश श्रावण माडेकर (३६) रा. पढेगाव असे मृत्यूस कवटाळलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

सावंगी (मेघे) पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या पढेगाव या गावातील रहिवासी शेतकरी गणेश माडेकर यांच्याकडे साडेसहा एकर शेती आहे. त्यांनी यंदाच्या वर्षी तूर, सोयाबीन व कपाशी पिकाची लागवड केली. अंकुरलेल्या पिकाची बऱ्यापैकी वाढ होत असतानाच अतिवृष्टीमुळे भदाडी नदीच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली. भदाडीच्या पुरामुळे गणेश माडेकर याच्या शेतातील संपूर्ण पीक खरडून गेल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. उपमुख्यमंत्र्यांसह केंद्रीय पथक वर्धा जिल्ह्यात दाखल होत वर्धा जिल्ह्यातील विविध भागातील नुकसानीची पाहणी केल्याने लवकरच शासकीय मदत आपल्यालाही मिळेल अशी आशा या शेतकऱ्याला होती. पण राजकीय पुढाऱ्यांकडून केवळ आश्वासनेच दिली जात असल्याचे लक्षात आल्याने हवालदील शेतकरी गणेश यांचे मनोधैर्य खचले. अशातच गणेश यांनी प्रवाहित वीज तार तोंडात धरून आपली जीवनयात्रा संपविली. या प्रकरणी सावंगी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे.

'या' भागातील शेत पिकांना बसलाय भदाडीच्या पुराचा फटका

भदाडी नदीच्या पुराचा वर्धा तालुक्यातील पढेगाव,सेलसुरा, चिकणी, जामनी, निमगाव, दहेगाव आदी भागातील शेत पिकांना चांगलाच फटका बसला आहे. या भागातील नुकसानीचे पंचनामे व सर्वेक्षण करण्यात आले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदतीची प्रतीक्षा आहे.

पढेगावावर पसरली शोककळा

वीज तार तोंडात घेऊन जीवन यात्रा संपविणाऱ्या शेतकरी गणेश माडेकर याच्या पश्चात पत्नी, आठ वर्षीय मुलगा, सहा वर्षीय मुलगी तसेच वयोवृद्ध आई-वडिल असा आप्त परिवार आहे. गणेशच्या आत्महत्येमुळे माडेकर कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून पढेगावावर शोककळाच पसरली आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसagricultureशेती