शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

प्रखर उष्णतामानाचा पशुपक्ष्यांना फटका; चिमण्यांचा होतोय मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 11:25 IST

एप्रिल महिन्याच्या मध्यातच उष्णतामान प्रचंड वाढले असून पाऱ्याने ४४ अंश सेल्सियस इतका टप्पा गाठला आहे. मानवाला झळा असह्य होत असतानाच पशुपक्ष्यांनाही पाण्याअभावी मृत्युमुखी पडावे लागत आहे.

ठळक मुद्देपक्ष्यांकरिता पाणीपात्र ठेवण्याचे पक्षिप्रेमींचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : एप्रिल महिन्याच्या मध्यातच उष्णतामान प्रचंड वाढले असून पाऱ्याने ४४ अंश सेल्सियस इतका टप्पा गाठला आहे. मानवाला झळा असह्य होत असतानाच पशुपक्ष्यांनाही पाण्याअभावी मृत्युमुखी पडावे लागत आहे. उन्हाची दाहकता इतकी आहे की त्याच्या तडाख्यामुळे चिमण्यांचा मृत्यू होत आहे. झडशी परिसरात उन्हामुळे काही चिमण्या दगावत असल्याचे चित्र आहे.चिमण्यांकरिता काही नागरिकांनी आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये कृत्रिम घरटी निर्माण केली आहे. तर काही ठिकाणी त्यांच्या तृष्णा-तृप्तीकरिता डब्यामध्ये पाणी ठेवण्यात आले आहे. अशा प्रकारचे सहकार्य सर्व नागरिकांना करावे लागणार आहे. तरच निसर्गाचा समतोल राखता येईल.उन्हामुळे दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. याचा फटका मानवासह पशुपक्ष्यांना बसू लागला आहे. अधिक तापमान चिमण्यांसारख्या इवल्याशा जिवांना सहन होत नाही. उष्णतामान वाढताच चिमण्यांचा मृत्यू होत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी पुढाकार घेत चिमण्यांकरिता आपल्या घराच्या आवारात घरटे ठेवणे गरजेचे आहे.याशिवाय मातीच्या भांड्यात पानी व तांदळाचे दाणे टाकल्यास त्यांना जीवनदान मिळू शकेल. दिवसेंदिवस होणारी झाडांची कत्तल पाहता त्यांचा अधिवास नष्ट झाला आहे. शिवाय उच्दाबाच्या वीजवाहिनी आणि मोठमोठे मोबाईल, टॉवर उभारण्यात आल्याने पक्ष्यांचे जीवन धोक्यात आले आहे.एप्रिलमध्येच मे हिटचा नागरिकांना प्रत्यय येत आहे. त्यापूर्वी पक्षी मृत्युमुखी पडत आहेत. पक्ष्यांच्या संवर्धनासाठी नागरिकांसोबतच पक्षिमित्रांनी पुढाकार घ्यावा, तरच चिमण्यांचे अस्तित्व दिसेल, असे बोलले जात आहे.

टॅग्स :Waterपाणी