शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

बिजिंगमधून वर्धेत आलेल्या १३ विद्यार्थिनींवर ठेवली पाळत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 05:00 IST

महात्मा गांधी आंतराष्ट्रीय विद्यापीठात २ फेबु्रवारीला १३ विद्यार्थिनी शिक्षणासाठी चीन येथील बिजिंग येथून आल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली. त्यानंतर या विद्यार्थ्यांना तातडीने आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले. शिवाय त्यांच्या रक्ताचे आणि घशातील द्रवाचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.

ठळक मुद्दे१४ दिवस वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लक्ष ठेऊन ‘कोरोना निगेटिव्ह’ची केली पुष्टी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग धास्तावले आहे. इतकेच नव्हे तर आतापर्यंत जगात तब्बल ७१ हजार ३३० व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे तर १ हजार ७७५ व्यक्तींचा कोरोनाने बळी घेतल्याचे वास्तव आहे. याच पार्श्वभूमीवर चीन येथील बिजिंग येथून वर्धा येथील हिंदी विद्यापीठात शिक्षणासाठी आलेल्या १३ विद्यार्थिनींवर सलग १४ दिवस लक्ष ठेऊन त्यांना कोरोनाची लागण झाली नसल्याची पुष्टी आरोग्य विभागातील तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली आहे.महात्मा गांधी आंतराष्ट्रीय विद्यापीठात २ फेबु्रवारीला १३ विद्यार्थिनी शिक्षणासाठी चीन येथील बिजिंग येथून आल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली. त्यानंतर या विद्यार्थ्यांना तातडीने आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले. शिवाय त्यांच्या रक्ताचे आणि घशातील द्रवाचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. यासह चीन मधून आलेल्या या विद्यार्थिनींना कोरोनाची लागन तर झालेली नाही तसेच लागन झाली असेल्यास हा आजार पसरू नये म्हणून दक्षता घेण्यात आली. तब्बल १४ दिवस या विद्यार्थ्यांना वैद्यकीय अधिकाºयांच्या निघरानीत आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले होते. सर्वबाजू तपासल्यानंतर या विद्यार्थ्यांना कोरोनाची लागन नसल्याचे पुढे आले असल्याचे सांगण्यात आले.बिजिंग येथील काही विद्यार्थिनी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठात शिक्षणासाठी आल्याची माहिती मिळताच त्यांना आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले. शिवाय त्यांना सलग १४ दिवस वैद्यकीय अधिकाºयांच्या निघरानीत ठेऊन त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. शिवाय त्यांच्या रक्तासह घशातील द्रवाचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले. सध्या त्यांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला असून नागरिकांनीही घाबरू नये.- डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा.ताप, खोकला, श्वासोश्वासास अडथळा निर्माण होणे ही कोरोना विषाणू संसर्गाची प्राथमिक लक्षणे आहेत. असे असले तरी वर्धा जिल्ह्यात नव्हे तर राज्यात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण पॉझिटीव्ह आढळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही.- डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.कोरोना संसर्गाची लक्षणेताप, खोकला, श्वासोश्वासास अडथळा निर्माण होणे ही कोरोना विषाणू संसर्गाची प्राथमिक लक्षणे आहेत. चीन मध्ये या संसर्ग जन्य आजारामुळे हाहाकार माजला असला तरी भारतात अद्यापही त्याचा अतिरेक झालेला नाही. शिवाय राज्यात एकही रुग्ण पॉझिटीव्ह आढळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनीही घाबरण्याचे कारण नसल्याचे म्हणने आरोग्य विभागाचे आहे.

टॅग्स :corona virusकोरोना