शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

बिजिंगमधून वर्धेत आलेल्या १३ विद्यार्थिनींवर ठेवली पाळत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 05:00 IST

महात्मा गांधी आंतराष्ट्रीय विद्यापीठात २ फेबु्रवारीला १३ विद्यार्थिनी शिक्षणासाठी चीन येथील बिजिंग येथून आल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली. त्यानंतर या विद्यार्थ्यांना तातडीने आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले. शिवाय त्यांच्या रक्ताचे आणि घशातील द्रवाचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.

ठळक मुद्दे१४ दिवस वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लक्ष ठेऊन ‘कोरोना निगेटिव्ह’ची केली पुष्टी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग धास्तावले आहे. इतकेच नव्हे तर आतापर्यंत जगात तब्बल ७१ हजार ३३० व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे तर १ हजार ७७५ व्यक्तींचा कोरोनाने बळी घेतल्याचे वास्तव आहे. याच पार्श्वभूमीवर चीन येथील बिजिंग येथून वर्धा येथील हिंदी विद्यापीठात शिक्षणासाठी आलेल्या १३ विद्यार्थिनींवर सलग १४ दिवस लक्ष ठेऊन त्यांना कोरोनाची लागण झाली नसल्याची पुष्टी आरोग्य विभागातील तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली आहे.महात्मा गांधी आंतराष्ट्रीय विद्यापीठात २ फेबु्रवारीला १३ विद्यार्थिनी शिक्षणासाठी चीन येथील बिजिंग येथून आल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली. त्यानंतर या विद्यार्थ्यांना तातडीने आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले. शिवाय त्यांच्या रक्ताचे आणि घशातील द्रवाचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. यासह चीन मधून आलेल्या या विद्यार्थिनींना कोरोनाची लागन तर झालेली नाही तसेच लागन झाली असेल्यास हा आजार पसरू नये म्हणून दक्षता घेण्यात आली. तब्बल १४ दिवस या विद्यार्थ्यांना वैद्यकीय अधिकाºयांच्या निघरानीत आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले होते. सर्वबाजू तपासल्यानंतर या विद्यार्थ्यांना कोरोनाची लागन नसल्याचे पुढे आले असल्याचे सांगण्यात आले.बिजिंग येथील काही विद्यार्थिनी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठात शिक्षणासाठी आल्याची माहिती मिळताच त्यांना आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले. शिवाय त्यांना सलग १४ दिवस वैद्यकीय अधिकाºयांच्या निघरानीत ठेऊन त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. शिवाय त्यांच्या रक्तासह घशातील द्रवाचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले. सध्या त्यांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला असून नागरिकांनीही घाबरू नये.- डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा.ताप, खोकला, श्वासोश्वासास अडथळा निर्माण होणे ही कोरोना विषाणू संसर्गाची प्राथमिक लक्षणे आहेत. असे असले तरी वर्धा जिल्ह्यात नव्हे तर राज्यात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण पॉझिटीव्ह आढळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही.- डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.कोरोना संसर्गाची लक्षणेताप, खोकला, श्वासोश्वासास अडथळा निर्माण होणे ही कोरोना विषाणू संसर्गाची प्राथमिक लक्षणे आहेत. चीन मध्ये या संसर्ग जन्य आजारामुळे हाहाकार माजला असला तरी भारतात अद्यापही त्याचा अतिरेक झालेला नाही. शिवाय राज्यात एकही रुग्ण पॉझिटीव्ह आढळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनीही घाबरण्याचे कारण नसल्याचे म्हणने आरोग्य विभागाचे आहे.

टॅग्स :corona virusकोरोना