शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

अंधश्रद्धा समाजासाठी घातकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 23:13 IST

देशाला पूढे जायचे असेल तर समाज प्रयत्नवादी असणे गरजेचा आहे; पण आज दैववादाचे स्तोम वाढविले जात आहे. यातून अंधश्रद्धांना खतपाणी मिळत असल्याने अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज आहे. अंधश्रद्धा समाजासाठी घातकच आहे, .....

ठळक मुद्देअंनिसच्या महावक्तृत्व स्पर्धेतील सूर : सुनील सुर्वे ठरला महाविजेता

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशाला पूढे जायचे असेल तर समाज प्रयत्नवादी असणे गरजेचा आहे; पण आज दैववादाचे स्तोम वाढविले जात आहे. यातून अंधश्रद्धांना खतपाणी मिळत असल्याने अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज आहे. अंधश्रद्धा समाजासाठी घातकच आहे, असा सूर युवा जागृती अभिमान २०१७-१८ अंतर्गत अ.भा. अंनिस व रा.से.यो वर्धा जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महावक्तृत्व स्पर्धेच्या वर्धा जिल्हास्तरीय अंतिम फेरीत युवादिनी उमटला.गो.से. वाणिज्य महाविद्यालयात आयोजित अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज विषयावर आयोजित महावक्तृत स्पर्धेच्या जिल्हास्तरीय अंतिम फेरीत ही तरुणाई वेगळे दाखले देत, वैविध्यपूर्ण वक्तृत्व शैली वापरत बेधडक बोलत होती. या स्पर्धेत सुनील सुर्वे अनिकेत महाविद्यालय वर्धा हा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. द्वितीय निहाल मून न्यू आर्टस कॉलेज वर्धा, तृतीय क्रमांक वैष्णवी कोठारे दिपचंद चौधरी ज्युनिअर कॉलेज सेलू यांनी पटकाविला. मधुरा मुळे गो.से. वाणिज्य महाविद्यालय वर्धा हिला विशेष प्रोत्साहनपर पुरस्कार जाहीर करण्यात आला.अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज विषयावर वर्धा, नागपूर, भंडारा या तीन जिल्ह्यांत महाविद्यालय- तालुका-जिल्हा अशा तीन स्तरावर ही स्पर्धा घेण्यात आली. युवादिनी तीनही जिल्ह्यात अंतिम फेरी घेण्यात आली असून वर्धा येथे आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धेचे उदघाटन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तथा जादूटोणा विरोधी कायदा दक्षता अधिकारी पराग पोटे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अब्दुल बारी तर अतिथी म्हणून सेलूचे ठाणेदार निलेश ब्राह्मणे, रासेयो जिल्हा समन्वयक प्रा.डॉ. धनंजय सोनटक्के, संजय इंगळे तिगावकर, अ.भा. अंनिसचे जिल्हाध्यक्ष हरिष इथापे, राज्य युवा संघटक पंकज वंजारे, जिल्हा सचिव निलेश गुल्हाणे, महिला संघटक प्रा. सुचिता ठाकरे, प्रा. किशोर वानखेडे, तालुका संघटक रवी पुणसे, मोहित सहारे, स्पर्धा संयोजक आशिष नंदनवार तथा तालुका युवा संघटक उपस्थित होते.महावकृत्त्व स्पर्धेतील दुसºया फेरीतून तालुका स्तरावरून प्रथम, द्वितीय, तृतीय विजेते सुनील सुर्वे, प्रिया वाडेकर, निहाल मून, मधुरा मुळे वर्धा, शुभम सोरते, ज्योती डफ, सोनम मेंढे समुद्रपूर, संकेत जगदाळे, साक्षी पाटील, मदिमा इक्तिकर आर्वी, नीलिमा कांबळे, कोमल गोमासे, निपील ढोरे, सुरेश घायवट देवळी, वैष्णवी कोठारे, स्वप्ना ढाले, कोमल माहुरे, समीक्षा लटारे, सागर हलगे सेलू, प्रज्वल कडू, कोमल खवशी, कांचन बसेने, चेतन डोंगरे कारंजा, निकीता बोंद्रे, स्वाती टिपले, दर्शन तळहांडे आष्टी हे तालुकास्तरावरून जिल्हास्तरासाठी पात्र ठरले होते.दोन महिने या स्पर्धेच्या प्रथम व द्वितीय फेरी विविध महाविद्यालयात घेण्यात आल्याने जनमानसात उत्सुकता वाढली होती. स्पर्धकांसाठी ही स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली. स्पर्धेचे परीक्षण प्रा. किशोर वानखेडे, निलेश गुल्हाणे यांनी केले. सर्व सहभागी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पुस्तके व प्रमाणपत्र देण्यात आले. विजेत्या स्पर्धकांना वर्धा स्मशानभूमीत होळी पौर्णिमेला लोकजागर होलिकोत्सवात पुरस्कार देण्यात येणार आहे. स्पर्धेचे प्रास्ताविक प्रा.डॉ. धनंजय सोनटक्के यांनी केले. संचालन अ.भा. अंनिस गो.से. वाणिज्य महाविद्यालय शाखा सचिव खुशाल भट यांनी केले तर आभार वर्धा ता. संघटक रवी पुणसे यांनी मानले. स्पर्धेला भूषण मसने, अमय पिसे, अभिजीत निनावे, स्नेहल भुजाडे, अजय वरवाडे, अक्षय चेके, प्रफूल्ल प्रधान, आशिष मोडक, सतीश इंगोले, प्रशांत नेपटे, आकाश जयस्वाल, अजय इंगोले, विद्या राईकवार, दादा मून, प्रा. एकनाथ मुरकूटे, प्रा. वैभव पिंपळे, प्रा. अभिजीत पाटील, राजकुमार तिरभाने आदींनी सहकार्य केले.