शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
3
IPO मध्ये १ लाख गुंतवले, आता त्याचे राहिले फक्त ₹३,२००; कसं मोठ्या आयपीओंनी बनवलं गुंतवणुकदारांना कंगाल
4
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
5
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
6
“यालाही हनी ट्रॅप म्हणायचे का?”; फोटोला फोटोने उत्तर, ठाकरे गटाच्या आरोपावर भाजपाचा पलटवार
7
सोने, चांदी, बिटकॉइन स्वस्त होणार? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा दावा; वॉरेन बफेही 'त्या' क्षणाची वाट पाहतायेत?
8
एअर इंडियाच्या बोईंग जेटच्या फ्युएल कंट्रोल स्विचची तपासणी पूर्ण; समोर आली महत्त्वाची माहिती
9
Video - स्टंटगिरी! हिरो बनण्याच्या नादात मर्सिडीज थेट समुद्रात नेली, दलदलीत अडकली अन्..
10
अकोला: शेतातून घरी परत असतानाच काळाची झडप, पित्यासह मुलगा पुरात गेला वाहून; मुलाचा मृतदेह सापडला
11
"राज्याला भिकारी म्हणून त्यांनी कळस गाठलाय"; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांना विनंती
12
घटस्फोटीत महिलेशी फेसबुकवर मैत्री, भेटायला बोलावून बलात्कार, अंधेरीतील घटना!
13
"आता हे अचानक 'हशणार, बशणार' हे कुठून आलं?", अभिनेत्रीचा 'पुणे'करांना सवाल
14
Shravan 2025: श्रावणात 'या' राशींवर होणार महादेवाची कृपा; बरसणार सुखाच्या श्रावणसरी!
15
'सभागृहाचं कामकाज संपलं होतं, हे विधान धडधडीत खोटं'; रोहित पवारांनी कोकाटेंचे आणखी दोन व्हिडीओ केले पोस्ट
16
Deep Amavasya 2025: 'या' सोप्या टिप्स कामी येतील, तेलातुपाचे दिवे लख्ख उजळतील!
17
'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं
18
सचिनजींना भेदता आलं नव्हतं 'महाभारत'चं चक्रव्यूह, 'कोण होणार करोडपती'मध्ये दिलेलं चुकीचं उत्तर, पाहा व्हिडीओ
19
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
20
मुख्यमंत्री नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी

पाण्याअभावी वाळल्या संत्राबागा खरिपाकरिता मजुरांकडून काढणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 22:10 IST

मागील दोन-तीन वर्षांपासून पर्जन्यमानात झालेली घट व गेल्या हंगामात झालेला अल्प पाऊस यामुळे भूजल पातळी खालावली. विहिरी, कूपनलिका कोरड्या झाल्याने कष्टाने तयार केलेल्या व जगण्याचा आधार असलेल्या संत्रा बागा डोळ्यादेखत वाळल्याने बागायतदार आर्थिक संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देकारंजा तालुका : आर्थिक मदत देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसेलगाव (लवणे) : मागील दोन-तीन वर्षांपासून पर्जन्यमानात झालेली घट व गेल्या हंगामात झालेला अल्प पाऊस यामुळे भूजल पातळी खालावली. विहिरी, कूपनलिका कोरड्या झाल्याने कष्टाने तयार केलेल्या व जगण्याचा आधार असलेल्या संत्रा बागा डोळ्यादेखत वाळल्याने बागायतदार आर्थिक संकटात सापडला आहे. वाळलेल्या संत्रा व बागायतधारकांना आर्थिक मदतीची मागणी होत आहे.कारंजा तालुक्यात संत्रा बागा मोठ्या प्रमाणात आहेत. त्या संत्रा बागा जीवनाचा आधार ठरत होत्या. परंतु, यावर्षीच्या दुष्काळी परिस्थितीत वाढलेले तापमान, त्यामुळे झळांच्या प्रमाणात झालेली वाढ व लांबणीवर पडलेला पावसाळा यामुळे अधिक प्रमाणात संत्रा बागा वाळल्या आहेत.त्या वाळलेल्या बागा काढल्याशिवाय खरीप पिकांची लागवड करता येत नाही. त्यामुळे आर्थिक झळ सोसून संत्रा बागांची काढणी करून धुऱ्यावर ढीग लावल्या जात आहे. तालुक्यात सगळीकडे बागा वाळल्याने सरपणालाही कुणी तयार नाही. त्यामुळे बागायतदारांनी सरपणाचे ढीग धुºयावर रचून ठेवल्याचे दिसत आहेत. संत्रा बागा तयार करण्यासाठी सहा-सात वर्षांचा काळ लागतो. तसेच त्या जमिनीतून अल्प उत्पन्न हाती येत असते आणि यावर्षीच्या दुष्काळाने केलेल्या मेहनतीवर पाणी फेरल्याने जड अंतकरणाने बागांवर जेसीबी चालवावा लागला. त्यामुळे बागायतदार हताश झाले आहेत. आधीच निसर्गरूपी संकटाने त्रस्त असलेल्या शेतकरी वर्गाला शासनाने आर्थिक मदत देऊन बागायतधारकांना भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.माझ्या शेतात ७०० संत्रा झाडे होती. त्यांना तयार करण्यासाठी ७ वर्षे लागली. परंतु विहिर कोरडी झाल्याने सर्वच्या सर्व झाडे वाळली. ती झाडे काढण्यासाठी ३५ हजार रूपये खर्च करावा लागला, अशा दुहेरी संकटात सापडले आहे. आम्हाला शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे.- मधुकर हिंगवे, बागायतदार, सेलगाव (लवणे).

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती