शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पाण्याअभावी वाळल्या संत्राबागा खरिपाकरिता मजुरांकडून काढणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 22:10 IST

मागील दोन-तीन वर्षांपासून पर्जन्यमानात झालेली घट व गेल्या हंगामात झालेला अल्प पाऊस यामुळे भूजल पातळी खालावली. विहिरी, कूपनलिका कोरड्या झाल्याने कष्टाने तयार केलेल्या व जगण्याचा आधार असलेल्या संत्रा बागा डोळ्यादेखत वाळल्याने बागायतदार आर्थिक संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देकारंजा तालुका : आर्थिक मदत देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसेलगाव (लवणे) : मागील दोन-तीन वर्षांपासून पर्जन्यमानात झालेली घट व गेल्या हंगामात झालेला अल्प पाऊस यामुळे भूजल पातळी खालावली. विहिरी, कूपनलिका कोरड्या झाल्याने कष्टाने तयार केलेल्या व जगण्याचा आधार असलेल्या संत्रा बागा डोळ्यादेखत वाळल्याने बागायतदार आर्थिक संकटात सापडला आहे. वाळलेल्या संत्रा व बागायतधारकांना आर्थिक मदतीची मागणी होत आहे.कारंजा तालुक्यात संत्रा बागा मोठ्या प्रमाणात आहेत. त्या संत्रा बागा जीवनाचा आधार ठरत होत्या. परंतु, यावर्षीच्या दुष्काळी परिस्थितीत वाढलेले तापमान, त्यामुळे झळांच्या प्रमाणात झालेली वाढ व लांबणीवर पडलेला पावसाळा यामुळे अधिक प्रमाणात संत्रा बागा वाळल्या आहेत.त्या वाळलेल्या बागा काढल्याशिवाय खरीप पिकांची लागवड करता येत नाही. त्यामुळे आर्थिक झळ सोसून संत्रा बागांची काढणी करून धुऱ्यावर ढीग लावल्या जात आहे. तालुक्यात सगळीकडे बागा वाळल्याने सरपणालाही कुणी तयार नाही. त्यामुळे बागायतदारांनी सरपणाचे ढीग धुºयावर रचून ठेवल्याचे दिसत आहेत. संत्रा बागा तयार करण्यासाठी सहा-सात वर्षांचा काळ लागतो. तसेच त्या जमिनीतून अल्प उत्पन्न हाती येत असते आणि यावर्षीच्या दुष्काळाने केलेल्या मेहनतीवर पाणी फेरल्याने जड अंतकरणाने बागांवर जेसीबी चालवावा लागला. त्यामुळे बागायतदार हताश झाले आहेत. आधीच निसर्गरूपी संकटाने त्रस्त असलेल्या शेतकरी वर्गाला शासनाने आर्थिक मदत देऊन बागायतधारकांना भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.माझ्या शेतात ७०० संत्रा झाडे होती. त्यांना तयार करण्यासाठी ७ वर्षे लागली. परंतु विहिर कोरडी झाल्याने सर्वच्या सर्व झाडे वाळली. ती झाडे काढण्यासाठी ३५ हजार रूपये खर्च करावा लागला, अशा दुहेरी संकटात सापडले आहे. आम्हाला शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे.- मधुकर हिंगवे, बागायतदार, सेलगाव (लवणे).

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती