शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

पाण्याअभावी वाळल्या संत्राबागा खरिपाकरिता मजुरांकडून काढणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 22:10 IST

मागील दोन-तीन वर्षांपासून पर्जन्यमानात झालेली घट व गेल्या हंगामात झालेला अल्प पाऊस यामुळे भूजल पातळी खालावली. विहिरी, कूपनलिका कोरड्या झाल्याने कष्टाने तयार केलेल्या व जगण्याचा आधार असलेल्या संत्रा बागा डोळ्यादेखत वाळल्याने बागायतदार आर्थिक संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देकारंजा तालुका : आर्थिक मदत देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसेलगाव (लवणे) : मागील दोन-तीन वर्षांपासून पर्जन्यमानात झालेली घट व गेल्या हंगामात झालेला अल्प पाऊस यामुळे भूजल पातळी खालावली. विहिरी, कूपनलिका कोरड्या झाल्याने कष्टाने तयार केलेल्या व जगण्याचा आधार असलेल्या संत्रा बागा डोळ्यादेखत वाळल्याने बागायतदार आर्थिक संकटात सापडला आहे. वाळलेल्या संत्रा व बागायतधारकांना आर्थिक मदतीची मागणी होत आहे.कारंजा तालुक्यात संत्रा बागा मोठ्या प्रमाणात आहेत. त्या संत्रा बागा जीवनाचा आधार ठरत होत्या. परंतु, यावर्षीच्या दुष्काळी परिस्थितीत वाढलेले तापमान, त्यामुळे झळांच्या प्रमाणात झालेली वाढ व लांबणीवर पडलेला पावसाळा यामुळे अधिक प्रमाणात संत्रा बागा वाळल्या आहेत.त्या वाळलेल्या बागा काढल्याशिवाय खरीप पिकांची लागवड करता येत नाही. त्यामुळे आर्थिक झळ सोसून संत्रा बागांची काढणी करून धुऱ्यावर ढीग लावल्या जात आहे. तालुक्यात सगळीकडे बागा वाळल्याने सरपणालाही कुणी तयार नाही. त्यामुळे बागायतदारांनी सरपणाचे ढीग धुºयावर रचून ठेवल्याचे दिसत आहेत. संत्रा बागा तयार करण्यासाठी सहा-सात वर्षांचा काळ लागतो. तसेच त्या जमिनीतून अल्प उत्पन्न हाती येत असते आणि यावर्षीच्या दुष्काळाने केलेल्या मेहनतीवर पाणी फेरल्याने जड अंतकरणाने बागांवर जेसीबी चालवावा लागला. त्यामुळे बागायतदार हताश झाले आहेत. आधीच निसर्गरूपी संकटाने त्रस्त असलेल्या शेतकरी वर्गाला शासनाने आर्थिक मदत देऊन बागायतधारकांना भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.माझ्या शेतात ७०० संत्रा झाडे होती. त्यांना तयार करण्यासाठी ७ वर्षे लागली. परंतु विहिर कोरडी झाल्याने सर्वच्या सर्व झाडे वाळली. ती झाडे काढण्यासाठी ३५ हजार रूपये खर्च करावा लागला, अशा दुहेरी संकटात सापडले आहे. आम्हाला शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे.- मधुकर हिंगवे, बागायतदार, सेलगाव (लवणे).

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती